शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

त्यांच्या अंत्यसंस्काराकडेही नातेवाईकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:28 IST

अंत्यविधीच्या निमित्ताने मृत व्यक्तीचे शेवटचे दर्शन घेता येते यासाठी सर्व कामे साेडून नातेवाईक, मित्र परिवार अंत्यविधीला उपस्थित राहतात. त्यामुळे ...

अंत्यविधीच्या निमित्ताने मृत व्यक्तीचे शेवटचे दर्शन घेता येते यासाठी सर्व कामे साेडून नातेवाईक, मित्र परिवार अंत्यविधीला उपस्थित राहतात. त्यामुळे अंत्यविधीला लग्न समारंभाप्रमाणेच गर्दी उसळते. या गर्दीतून इतरही नागरिकांना काेराेनाचा संसर्ग हाेऊ शकताे. त्यामुळे काेराेना मृताचा मृतदेह नातेवाईकांच्या हातात दिला जात नाही. मात्र मृत व्यक्तीच्या पाच नातेवाईकांना अंत्यसंस्काराचे साेपस्कार पार पाडण्यासाठी उपस्थित राहण्याची परवानी दिली जाते. बहुतांश मृतांचे नातेवाईक अंत्यंस्काराला येताताच. मात्र काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू पावलेल्या सहा मृतांच्या नातेवाईकांनी चक्क अंत्यसंस्कारास उपस्थिती दर्शविण्यास नकार दिला. यामागे संबंधित कुटुंबीयांच्या काही अडचणी नक्कीच असतील हे मान्यच करावे लागेल. अंत्यविधीला आम्ही उपस्थित राहू शकत नाही. तुम्हीच अंत्यविधी पार पाडावे असे संमतीपत्र लिहून देताना नातेवाईकांना किती दु:ख झाले असावे हे तेच सांगू शकतात.

बाॅक्स

अशी पार पाडली जाते अंत्यविधीची प्रकिया

काेराेनामुळे मृत्यू झाल्यास याबाबतची माहिती संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णालय प्रशासनामार्फत दिली जाते. अंत्यविधीच्या माध्यमातून इतर नागरिकांमध्ये काेराेनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मृतदेह नातेवाईकांच्या हातात दिला जात नाही. मात्र पाच नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. नगर परिषदेच्या शववाहिकेने मृतदेह स्मशान घाटापर्यंत पाेहाेचविल्या जाते. दाेन नातेवाईक पीपीई किट घालून अंत्यविधीचे सर्व साेपस्कार पार पाडतात. नातेवाईक जर अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार नसतील तर याबाबत त्यांना आराेग्य विभागाकडे तसे लेखी लिहून द्यावे लागते. ही बाब नगर परिषदेला कळविली जाते व नगर परिषदेचे कर्मचारीच अंत्यसंस्कार करतात. जर नातेवाईकांनी लेखी लिहून न दिल्यास संबंधित व्यक्तीचा मृतदेह शवपेटीत ठेवून दाेन ते तीन दिवस नातेवाईकांची प्रतीक्षा केली जाते. त्यानंतरही नातेवाईक न आल्यास रुग्णालय प्रशासन पाेलीस स्टेशन व नगर परिषदेला कळविते. त्यानंतर नगर परिषदेचे कर्मचारीच मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात.