शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुलाने जोडले दोन राज्यांचे संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 01:37 IST

सिरोंचानजीकच्या गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यानंतर या पुलावरून महाराष्ट्र-छत्तीसगड अशी थेट वाहतूक सुरू झाली आहे. शिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराची बसफेरी इंद्रावती नदीच्या पुलाच्या बाजूने लहानशा मार्गातून थेट छत्तीसगड राज्याकडे सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअहेरीवरून भोपालपटनमला थेट बस : महाराष्ट्र-छत्तीसगड बससेवेमुळे प्रवास सुकर

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचानजीकच्या गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यानंतर या पुलावरून महाराष्ट्र-छत्तीसगड अशी थेट वाहतूक सुरू झाली आहे. शिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराची बसफेरी इंद्रावती नदीच्या पुलाच्या बाजूने लहानशा मार्गातून थेट छत्तीसगड राज्याकडे सुरू करण्यात आली आहे. पुलाच्या बांधकामामुळे महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन राज्यातील लोकांचे संबंध चांगले जुळले आहेत.सिरोंचा तालुक्यातून तेलंगणा राज्यातील निजामाबाद व छत्तीसगड राज्यातील जगदलपूरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग करण्यात येणार आहे. गोदावरी नदीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आता छत्तीसगडच्या इंद्रावती नदीवर पुलाचे बांधकाम सध्या कासवगतीने सुरू आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या परिसरात पाणी अडवून लहानसा मार्ग काढण्यात आला असून छत्तीसगड-महाराष्ट्र अशी प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या मार्गाद्वारे राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराची बस थेट छत्तीसगडमधील भोपालपटनम येथे जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांनीही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फायदा होत आहे. या मार्गे दररोज प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. अहेरी उपविभागात यापूर्वी पातागुडमपर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पावसाळावगळता उन्हाळा व हिवाळा अशा आठ महिन्यांच्या कालावधीत सुरू असायचे. तेव्हा पावसाळ्यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता पुलाची निर्मिती झाल्याने तसेच राष्ट्रीय महामार्गाचे काम जोमात सुरू असल्याने महामंडळाची बसफेरी सुरू झाली आहे. परिणामी बसने प्रवास करीत लगतच्या राज्यात जाता येत आहे. दररोज या राष्ट्रीय महामार्गावर जवळपास २०० वाहनांचे आवागमन होत आहे.भोपालपटनमचे तिकीट ८५ रूपयेमहाराष्ट्र-छत्तीसगड तसेच महाराष्ट्र-तेलंगणा अशी वाहतूक अहेरी उपविभागातून सुरू झाली आहे. अहेरी आगाराची बस सिरोंचावरून भोपालपटनम येथेही जात आहे. सिरोंचा ते भोपालपटनम हे ६७ किमीचे अंतर असून महामंडळाच्या बस तिकीट ८५ रूपये आहे. ८५ रूपयांमध्ये सिरोंचावरून भोपालपटनमला प्रवाशांना जात येत आहे. यापूर्वी अशा प्रकारची थेट प्रवासाची सुविधा नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अहेरी उपविभागातील नागरिकांना छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात पूर्वी पायी प्रवास करावा लागत होता. आता बस सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.