शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

पावसासाठी वैरागडवासीयांचे भंडारेश्वराला साकडे

By admin | Updated: August 4, 2015 00:59 IST

गेल्या २०-२५ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर

वैरागड : गेल्या २०-२५ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे पावसाच्या आगमनासाठी आता सारेच जण ईश्वराची करूणा भाकत आहे. याचाच एक भाग म्हणून वैरागडवासीयांनी सोमवारी येथील भंडारेश्वर मंदिरात भजनाच्या निनादात पूजा-अर्चा करून देवाला पावसाच्या आगमनाचे साकडे घातले. दरम्यान वरूणदेवानेही नागरिकांचे आर्त हाक ऐकत कृपादृष्टी दाखविली. परिणामी पाऊस झाल्याने मंदिरात आलेल्या गावकरी ओले होऊन घरी परतले. गेल्या २०-२५ दिवसांपासून वैरागड परिसरासह जिल्ह्यात दमदार पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांचे शेतजमिनीतील धानाचे पऱ्हे करपायला लागले आहेत. तसेच अनेक भागातील रोवणीचे काम खोळंबले आहे. परिणामी पऱ्हे टाकण्यापासून तर आतापर्यंतच्या शेतीमशागतीचा खर्च कसा भरून काढायचा, या विवंचनेत जिल्हाभरातील शेतकरी सापडला आहे. निसर्गाची अवकृपा होत असल्याचे पाहून वैरागड परिसरातील शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त झाले. त्यामुळे आता भंडारेश्वराची करूणा भाकायची, असा निर्धार वैरागडवासीयांनी केला. ठरल्याप्रमाणे सोमवारी सकाळपासून वैरागडातील सर्व नागरिक भंडारेश्वर मंदिरात एकत्र जमले. ढोलकी व टाळ, मृदंगाच्या निनादात भजन करून पावसाच्या आगमनाची करूणा भाकण्यात आली. भंडारेश्वर मंदिरात सकाळी ९ वाजतापासून ते दुपारी १२ वाजतापर्यंत धार्मिक विधी चालला. आरती झाल्यानंतर महाप्रसाद वितरित करण्यात आले. यावेळी ग्रा.पं. पदाधिकारी, भंडारेश्वर देवस्थानचे पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)भंडारेश्वराचा जलाभिषेक; दुकानेही बंदभंडारेश्वर मंदिर परिसरात जमलेल्या पुरूष महिलांनी नजीकच्या खोब्रागडी नदीपात्रातील पाणी आणून भंडारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंगाचे जलाभिषेक केले. मनोभावे पूजा-अर्चा करून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हावा, अशी प्राथना केली.पावसाने दीर्घ कालावधीपासून उसंत घेतल्यामुळे वैरागडसह जिल्हाभरातील शेतकरी कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे. शेतीत उत्पादन झाले नाही तर त्याचा इतर व्यवसायावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे वैरागडवासीयांनी सोमवारी नियोजित केलेल्या भंडारेश्वर पूजा-अर्चेच्या कार्यक्रमादरम्यान गावातील सर्व व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कार्यक्रमात सहभाग दर्शविला.