शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
4
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
5
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
6
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
7
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
8
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
9
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
10
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
11
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
12
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
13
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
14
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
15
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
16
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
17
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
18
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
19
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
20
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  

पावसासाठी वैरागडवासीयांचे भंडारेश्वराला साकडे

By admin | Updated: August 4, 2015 00:59 IST

गेल्या २०-२५ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर

वैरागड : गेल्या २०-२५ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे पावसाच्या आगमनासाठी आता सारेच जण ईश्वराची करूणा भाकत आहे. याचाच एक भाग म्हणून वैरागडवासीयांनी सोमवारी येथील भंडारेश्वर मंदिरात भजनाच्या निनादात पूजा-अर्चा करून देवाला पावसाच्या आगमनाचे साकडे घातले. दरम्यान वरूणदेवानेही नागरिकांचे आर्त हाक ऐकत कृपादृष्टी दाखविली. परिणामी पाऊस झाल्याने मंदिरात आलेल्या गावकरी ओले होऊन घरी परतले. गेल्या २०-२५ दिवसांपासून वैरागड परिसरासह जिल्ह्यात दमदार पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांचे शेतजमिनीतील धानाचे पऱ्हे करपायला लागले आहेत. तसेच अनेक भागातील रोवणीचे काम खोळंबले आहे. परिणामी पऱ्हे टाकण्यापासून तर आतापर्यंतच्या शेतीमशागतीचा खर्च कसा भरून काढायचा, या विवंचनेत जिल्हाभरातील शेतकरी सापडला आहे. निसर्गाची अवकृपा होत असल्याचे पाहून वैरागड परिसरातील शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त झाले. त्यामुळे आता भंडारेश्वराची करूणा भाकायची, असा निर्धार वैरागडवासीयांनी केला. ठरल्याप्रमाणे सोमवारी सकाळपासून वैरागडातील सर्व नागरिक भंडारेश्वर मंदिरात एकत्र जमले. ढोलकी व टाळ, मृदंगाच्या निनादात भजन करून पावसाच्या आगमनाची करूणा भाकण्यात आली. भंडारेश्वर मंदिरात सकाळी ९ वाजतापासून ते दुपारी १२ वाजतापर्यंत धार्मिक विधी चालला. आरती झाल्यानंतर महाप्रसाद वितरित करण्यात आले. यावेळी ग्रा.पं. पदाधिकारी, भंडारेश्वर देवस्थानचे पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)भंडारेश्वराचा जलाभिषेक; दुकानेही बंदभंडारेश्वर मंदिर परिसरात जमलेल्या पुरूष महिलांनी नजीकच्या खोब्रागडी नदीपात्रातील पाणी आणून भंडारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंगाचे जलाभिषेक केले. मनोभावे पूजा-अर्चा करून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हावा, अशी प्राथना केली.पावसाने दीर्घ कालावधीपासून उसंत घेतल्यामुळे वैरागडसह जिल्हाभरातील शेतकरी कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे. शेतीत उत्पादन झाले नाही तर त्याचा इतर व्यवसायावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे वैरागडवासीयांनी सोमवारी नियोजित केलेल्या भंडारेश्वर पूजा-अर्चेच्या कार्यक्रमादरम्यान गावातील सर्व व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कार्यक्रमात सहभाग दर्शविला.