शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

२४ हजार शेतकऱ्यांची पीक विम्यासाठी नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:13 IST

खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील २३ हजार ७०० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.

३१ जुलैपर्यंत मुदत : शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील २३ हजार ७०० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. संपूर्ण देशभरासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पीक विम्याची जबाबदारी रिलायन्स कंपनीवर सोपविण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी, किमान त्याचा उत्पादन खर्च भरून निघावा. या उद्देशाने पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. जवळपास सर्वच पिकांचा विमा काढला जात असला तरी गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धानाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. त्यामुळे बहुतांश शेतकरी धानाचाच विमा काढतात. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन विमा काढता येते. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा काढणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या पीक कर्जाच्या रकमेतून पीक विम्याची रक्कम वजा केली जाते. त्यामुळे त्यांना स्वतंत्र पीक विमा काढण्याची गरज पडत नाही. जे शेतकरी पीक विमा घेत नाही, अशाही शेतकऱ्यांना विमा काढता येतो. प्रती एकरी ठरविलेली रक्कम सातबारासह बँकेत जमा केल्यास पिकाचा विमा निघतो. जिल्हाभरातील २३ हजार ७०० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. यापूर्वी पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अतिशय कमी होती. मात्र कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याची सक्ती केल्याने पीक विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ३०२ सोयाबीन उत्पादकांना लाभ मागील वर्षी सोयाबीन उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा तर उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. प्रामुख्याने चामोर्शी तालुक्यात सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. याच तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी विमा काढला होता. ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले, अशा ३०२ शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात आली आहे. खरीप पिकांचा विमा काढण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१७ पर्यंत ठेवण्यात आली आहे. तलाठी, कृषी सहायक यांच्या मार्फत शेतकऱ्यांना पीक विम्याचे महत्त्व पटवून दिले जात असल्याने पीक विमा काढणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.