शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

२४ हजार शेतकऱ्यांची पीक विम्यासाठी नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:13 IST

खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील २३ हजार ७०० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.

३१ जुलैपर्यंत मुदत : शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील २३ हजार ७०० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. संपूर्ण देशभरासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पीक विम्याची जबाबदारी रिलायन्स कंपनीवर सोपविण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी, किमान त्याचा उत्पादन खर्च भरून निघावा. या उद्देशाने पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. जवळपास सर्वच पिकांचा विमा काढला जात असला तरी गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धानाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. त्यामुळे बहुतांश शेतकरी धानाचाच विमा काढतात. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन विमा काढता येते. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा काढणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या पीक कर्जाच्या रकमेतून पीक विम्याची रक्कम वजा केली जाते. त्यामुळे त्यांना स्वतंत्र पीक विमा काढण्याची गरज पडत नाही. जे शेतकरी पीक विमा घेत नाही, अशाही शेतकऱ्यांना विमा काढता येतो. प्रती एकरी ठरविलेली रक्कम सातबारासह बँकेत जमा केल्यास पिकाचा विमा निघतो. जिल्हाभरातील २३ हजार ७०० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. यापूर्वी पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अतिशय कमी होती. मात्र कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याची सक्ती केल्याने पीक विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ३०२ सोयाबीन उत्पादकांना लाभ मागील वर्षी सोयाबीन उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा तर उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. प्रामुख्याने चामोर्शी तालुक्यात सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. याच तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी विमा काढला होता. ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले, अशा ३०२ शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात आली आहे. खरीप पिकांचा विमा काढण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१७ पर्यंत ठेवण्यात आली आहे. तलाठी, कृषी सहायक यांच्या मार्फत शेतकऱ्यांना पीक विम्याचे महत्त्व पटवून दिले जात असल्याने पीक विमा काढणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.