शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

२४ हजार शेतकऱ्यांची पीक विम्यासाठी नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:13 IST

खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील २३ हजार ७०० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.

३१ जुलैपर्यंत मुदत : शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील २३ हजार ७०० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. संपूर्ण देशभरासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पीक विम्याची जबाबदारी रिलायन्स कंपनीवर सोपविण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी, किमान त्याचा उत्पादन खर्च भरून निघावा. या उद्देशाने पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. जवळपास सर्वच पिकांचा विमा काढला जात असला तरी गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धानाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. त्यामुळे बहुतांश शेतकरी धानाचाच विमा काढतात. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन विमा काढता येते. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा काढणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या पीक कर्जाच्या रकमेतून पीक विम्याची रक्कम वजा केली जाते. त्यामुळे त्यांना स्वतंत्र पीक विमा काढण्याची गरज पडत नाही. जे शेतकरी पीक विमा घेत नाही, अशाही शेतकऱ्यांना विमा काढता येतो. प्रती एकरी ठरविलेली रक्कम सातबारासह बँकेत जमा केल्यास पिकाचा विमा निघतो. जिल्हाभरातील २३ हजार ७०० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. यापूर्वी पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अतिशय कमी होती. मात्र कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याची सक्ती केल्याने पीक विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ३०२ सोयाबीन उत्पादकांना लाभ मागील वर्षी सोयाबीन उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा तर उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. प्रामुख्याने चामोर्शी तालुक्यात सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. याच तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी विमा काढला होता. ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले, अशा ३०२ शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात आली आहे. खरीप पिकांचा विमा काढण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१७ पर्यंत ठेवण्यात आली आहे. तलाठी, कृषी सहायक यांच्या मार्फत शेतकऱ्यांना पीक विम्याचे महत्त्व पटवून दिले जात असल्याने पीक विमा काढणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.