शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

नियम डावलून हेलिपॅडला जमीन

By admin | Updated: June 12, 2014 00:01 IST

औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारण्यासाठी लागू असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास अ‍ॅक्टला डावलून गडचिरोली येथील औद्योगिक वसाहतीतील ४२ एकर जागा पोलीस विभागाला देण्यात आल्यामुळे

गडचिरोली : औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारण्यासाठी लागू असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास अ‍ॅक्टला डावलून गडचिरोली येथील औद्योगिक वसाहतीतील ४२ एकर जागा पोलीस विभागाला देण्यात आल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील औद्योगिक विकासाच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भविष्यात उद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे जिल्ह्यात दुसरी काय व्यवस्था आहे, असा सवाल गडचिरोली जिल्ह्यातील नोंदणीकृत नसलेल्या उद्योजकांच्या संघटनेने शासनाला केला आहे.गडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंदे नाहीत म्हणून नक्षलवाद वाढीला लागला आहे. २६ आॅगस्ट १९८२ ला निर्माण झालेल्या या जिल्ह्यात गत ३०-३२ वर्षात राज्य शासनाला कुठलाही औद्योगिक विकास करता आलेला नाही. गडचिरोली येथील औद्योगिक वसाहतीशिवाय दुसरी औद्योगिक वसाहतीही निर्माण करता आली नाही. गडचिरोली येथील औद्योगिक वसाहतीत वीज, पाणी, रस्ते व इतर पायाभूत सुविधा निर्माण करून देण्यात आल्या होत्या. त्यासाठी एमआयडीसीने कोट्यवधी रूपये खर्च केले. त्यामुळे काही औद्योगिक युनिट येथे सुरू झाले. राजकीय पुढाऱ्यांनी हस्तगत केलेले भूखंड उद्योग सुरू नसतांनाही रिकामे पडून आहेत. एमआयडीसीतील पुढाऱ्यांचे उद्योग विरहीत प्लॉट शासनाने परत घेतले नाही. गडचिरोली येथील औद्योगिक वसाहतीत १५० ते ३०० लघू उद्योजकांनी जागेसाठी अर्ज केले आहेत. याला किमान तीन वर्षाचा कालावधी लोटून गेला आहे. मात्र त्यांना अद्याप औद्योगिक वसाहतीत भूखंड वितरीत करण्यात आले नाही. त्यांचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले. मात्र गडचिरोली पोलीस प्रशासनाने महिनाभरापूर्वी केलेला अर्ज मंजूर करत त्यांना हेलीपॅडसाठी ४२ एकर जागा मंजूर करण्यात आली. गडचिरोली येथील औद्योगिक वसाहतीत जागा वितरीत करतांना एकतर उद्योग किंवा व्यावसायिक वापर वा निवासी व्यवस्था या तीन कारणांसाठी जमीन दिल्या जाऊ शकते. याशिवाय उद्योगांना मदत व्हावी म्हणून बँक, पोस्ट, वाहतूक कार्यालय या अमिनिटीसाठीही औद्योगिक वसाहतीत जागा देता येऊ शकते, अशी महाराष्ट्र औद्योगिक अ‍ॅक्टमध्ये तरतूद आहे. मात्र यासर्व तरतूदी पोलीस प्रशासनाला जमीन वितरीत करतांना धाब्यावर ठेवण्यात आल्या आहेत. तसेच औद्योगिक वसाहतीत असलेल्या गेस्ट हाऊस व एमआयडीसी कर्मचाऱ्यांचे क्वार्टरही पोलीस प्रशासनालाच वापरासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग विभागाचे येणारे अधिकारी, पाहुणे यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. उद्योजकांच्या बैठकाही घेण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. ४२ एकर जागेत हेलीपॅडच तयार होणार नसून पोलीस प्रशासनाचे अन्य कामही चालणार आहे. त्यामुळे चालु असलेल्या उद्योगांना तसेच उद्योजकांना भविष्यात अडचणी निर्माण होईल, याची भीती उद्योजकांना वाटू लागली आहे. पोलिसांची वर्दळ या भागात वाढल्याने उद्योगांना अडचणीसुद्धा येणार याची चाहूल उद्योजकांना लागून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)