शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रेगडी धरण तळाला, चिचडोह घटला; मामा तलावांचाही घसा कोरडा झाला !

By गेापाल लाजुरकर | Updated: May 31, 2024 22:40 IST

गडचिरोली जिल्ह्यात ३८ टक्केच पाणीसाठा : महिनाभरात ६ टक्क्यांनी घट

गडचिरोली : पावसाळा तोंडावर असतानाच उन्हाची काहिलीही दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच जलस्त्रोतातील पाणी झपाट्याने घटत आहे. जिल्ह्यातील २०० वर गावांमध्ये सध्या पाण्याची टंचाई आहे. प्रमुख प्रकल्पही कोरडे पडत असून रेगडी व चिचडोह प्रकल्पातील पाणीसाठा प्रचंड घटलेला आहे. सध्या जिल्ह्यात ३८.४१५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत.

जिल्ह्यात वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेज तर रेगडीजवळ दिना नदीवर दिना प्रकल्प आहे. जिल्ह्यात मोठे धरण नाही. दिना धरणाचेही पाणी पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात शेतीला व रब्बी हंगामात पिकांनासुद्धा सोडले जाते. सध्या या प्रकल्पातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली आहे. जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीला गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडले जाते. त्यामुळे चामोर्शीजवळ बांधलेल्या चिचडोह धरणात पुरेसा पाणीसाठा असतो; परंतु यावर्षी पाणी टंचाईमुळे धरणाच्या खालील भागात पाणी सोडले जात असल्याने गेल्या महिनाभरात येथील जलसाठा निम्म्याहून घटला. या नदीवरून कार्यान्वित करण्यात आलेल्या पाणीपुरवठा नळयोजना प्रभावित झाल्या आहेत. गेल्या महिनाभरात मामा तलाव व लघु प्रकल्प कोरडे झाल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मिळून एकूण ६ टक्के पाणीसाठ्यात घट झाली.

१०.७९०दशलक्ष घन मीटर पाणी रेगडी जलाशयात

चामोर्शी तालुक्याच्या रेगडी येथील दिना प्रकल्पात सध्या १५.९७ टक्के तर १०.७९० -दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील बहुतांश तलाव कोरडेठाक आहेत.

माजी मालगुजारी तलाव आटले

पाटबंधारे विभागाअंतर्गत जिल्ह्यात १५ माजी मालगुजारी तलाव आहेत. यामध्ये घोट, तळोधी, हिरापूर, येलगूर, रावणवाडी, कसारी, विसोरा, बोळधा, वडेगाव, गडचिरोली, राजगट्टा, धानोरा, वडधा, बोदली आदी गावांतील तलावांचा समावेश आहे. यातील काही तलाव आटले आहेत तर काही तलाव आटण्याच्या मार्गावर आहेत.

लघुप्रकल्पांनीही गाठली पातळी

लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत ९ लघुप्रकल्प आहेत. यात येंगलखेडा, कोसरी, कुनघाडा, अनखोडा, लगाम, अमरादी, कमलापूर, पेंटीपाका, येर्रावागू आदींचा समावेश आहे. या प्रकल्पांनीही पातळी गाठली आहे.

चिचडोह बॅरेजमधील पाणीसाठा १४ टक्क्यांनी घटला

वैनगंगा नदीवर चामोर्शी शहरानजीक बांधलेल्या चिचडोह बॅरेजमध्ये महिनाभरापूर्वी ५०.९३१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. आता ४२.१७७ पाणीसाठा उपलब्ध आहे. तर येथील पाण्याची मागील टक्केवारी ८२.१२४ हून घटून ६८ वर आली. महिनाभरात तब्बल १४ टक्क्यांनी पाणीसाठा घटला.

जिल्ह्यातील प्रकल्प, पाणीसाठ्याची स्थिती (द.घ.मी)

प्रकल्प :  संकल्पित साठा : सध्याचा साठा : टक्केवारी

मोठे : ६७.५४० : १०.७९०: १५.९७६

मध्यम : ६२.०१७ : ४२.१७७ : ६८.००९

लघु प्रकल्प : २६.७१० : ७.०६३ : २६.४४३

एकूण : १५६.२६७ : ६०.०३० : ३८.४१५

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली