शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

रेगडी धरण तळाला, चिचडोह घटला; मामा तलावांचाही घसा कोरडा झाला !

By गेापाल लाजुरकर | Updated: May 31, 2024 22:40 IST

गडचिरोली जिल्ह्यात ३८ टक्केच पाणीसाठा : महिनाभरात ६ टक्क्यांनी घट

गडचिरोली : पावसाळा तोंडावर असतानाच उन्हाची काहिलीही दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच जलस्त्रोतातील पाणी झपाट्याने घटत आहे. जिल्ह्यातील २०० वर गावांमध्ये सध्या पाण्याची टंचाई आहे. प्रमुख प्रकल्पही कोरडे पडत असून रेगडी व चिचडोह प्रकल्पातील पाणीसाठा प्रचंड घटलेला आहे. सध्या जिल्ह्यात ३८.४१५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत.

जिल्ह्यात वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेज तर रेगडीजवळ दिना नदीवर दिना प्रकल्प आहे. जिल्ह्यात मोठे धरण नाही. दिना धरणाचेही पाणी पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात शेतीला व रब्बी हंगामात पिकांनासुद्धा सोडले जाते. सध्या या प्रकल्पातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली आहे. जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीला गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडले जाते. त्यामुळे चामोर्शीजवळ बांधलेल्या चिचडोह धरणात पुरेसा पाणीसाठा असतो; परंतु यावर्षी पाणी टंचाईमुळे धरणाच्या खालील भागात पाणी सोडले जात असल्याने गेल्या महिनाभरात येथील जलसाठा निम्म्याहून घटला. या नदीवरून कार्यान्वित करण्यात आलेल्या पाणीपुरवठा नळयोजना प्रभावित झाल्या आहेत. गेल्या महिनाभरात मामा तलाव व लघु प्रकल्प कोरडे झाल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मिळून एकूण ६ टक्के पाणीसाठ्यात घट झाली.

१०.७९०दशलक्ष घन मीटर पाणी रेगडी जलाशयात

चामोर्शी तालुक्याच्या रेगडी येथील दिना प्रकल्पात सध्या १५.९७ टक्के तर १०.७९० -दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील बहुतांश तलाव कोरडेठाक आहेत.

माजी मालगुजारी तलाव आटले

पाटबंधारे विभागाअंतर्गत जिल्ह्यात १५ माजी मालगुजारी तलाव आहेत. यामध्ये घोट, तळोधी, हिरापूर, येलगूर, रावणवाडी, कसारी, विसोरा, बोळधा, वडेगाव, गडचिरोली, राजगट्टा, धानोरा, वडधा, बोदली आदी गावांतील तलावांचा समावेश आहे. यातील काही तलाव आटले आहेत तर काही तलाव आटण्याच्या मार्गावर आहेत.

लघुप्रकल्पांनीही गाठली पातळी

लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत ९ लघुप्रकल्प आहेत. यात येंगलखेडा, कोसरी, कुनघाडा, अनखोडा, लगाम, अमरादी, कमलापूर, पेंटीपाका, येर्रावागू आदींचा समावेश आहे. या प्रकल्पांनीही पातळी गाठली आहे.

चिचडोह बॅरेजमधील पाणीसाठा १४ टक्क्यांनी घटला

वैनगंगा नदीवर चामोर्शी शहरानजीक बांधलेल्या चिचडोह बॅरेजमध्ये महिनाभरापूर्वी ५०.९३१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. आता ४२.१७७ पाणीसाठा उपलब्ध आहे. तर येथील पाण्याची मागील टक्केवारी ८२.१२४ हून घटून ६८ वर आली. महिनाभरात तब्बल १४ टक्क्यांनी पाणीसाठा घटला.

जिल्ह्यातील प्रकल्प, पाणीसाठ्याची स्थिती (द.घ.मी)

प्रकल्प :  संकल्पित साठा : सध्याचा साठा : टक्केवारी

मोठे : ६७.५४० : १०.७९०: १५.९७६

मध्यम : ६२.०१७ : ४२.१७७ : ६८.००९

लघु प्रकल्प : २६.७१० : ७.०६३ : २६.४४३

एकूण : १५६.२६७ : ६०.०३० : ३८.४१५

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली