शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

११ महिन्यांत ५४ लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: April 4, 2015 00:44 IST

विनापरवाना अवैधरित्या मुरूम, रेती, गिट्टी आदी गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे.

महसूल विभागाची कारवाई : गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकीचे ८३५ प्रकरणदिलीप दहेलकर  गडचिरोलीविनापरवाना अवैधरित्या मुरूम, रेती, गिट्टी आदी गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र असे असतानाही अनेक नागरिक स्वत:च्या स्वार्थासाठी छुप्या मार्गाने गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक करतात. या प्रकारावर आळा घालण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर पथक नियुक्ती करण्यात आले आहे. एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या ११ महिन्यांच्या कालावधीत महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी ८३५ प्रकरणात एकूण ५४ लाख तीन हजार ४१२ रूपयांचा दंड वसूल केला.जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील रेती, गिट्टी, मुरूम आदी गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची असते. तालुक्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी आपल्या क्षेत्रात धाड सत्र राबवून गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणी कारवाई करीत असतात.गडचिरोली व धानोरा तालुक्याचा समावेश असलेल्या गडचिरोली उपविभागात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडसत्र राबवून एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या ११ महिन्यांच्या कालावधीत अवैधरित्या गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीचे ३२१ प्रकरणात कारवाई केली. या प्रकरणातून संबंधित दोषी नागरिकांकडून २३ लाख १७ हजार ४८० रूपयांचा दंड वसूल केला. चामोर्शी व मुलचेरा तालुक्याचा समावेश असलेल्या चामोर्शी उपविभागात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी १०८ प्रकरणात आठ लाख ८१ हजार ८३० रूपयांचा दंड वसूलल केला. देसाईगंज व आरमोरी तालुक्याचा समावेश असलेल्या देसाईगंज उपविभागात अधिकाऱ्यांनी धाडसत्र राबवून १५८ प्रकरणात कारवाई करून एकूण आठ लाख २३ हजार ९८२ रूपयांचा दंड संबंधितांकडून वसूल केला. कुरखेडा उपविभागात अधिकाऱ्यांनी धाड टाकून ५८ प्रकरणात कारवाई करून संबंधितांकडून चार लाख २७ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल केला. अहेरी उपविभागात अधिकाऱ्यांनी अवैध उत्खनन व वाहतुकीच्या १४३ प्रकरणात कारवाई केली. या प्रकरणातून सहा लाख २३ हजार रूपयांचा दंड वसूल केला. एटापल्ली उपविभागात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ४७ प्रकरणात कारवाई करून संबंधितांकडून तीन लाख २९ हजार ७२० रूपयांचा दंड वसूल केला.एका प्रकरणातील दंड शिल्लकअहेरी तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडसत्र राबवून अवैध उत्खनन व वाहतुकीचे १०५ प्रकरणे दाखल केली. यापैकी १०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून यातून तीन लाख ९६ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला. तर एका प्रकरणातील तीन हजार २०० रूपयांचा दंड अद्यापही शिल्लक आहे.