शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

सौरकृषीपंपासाठी १२१ अर्ज प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:21 IST

शेतकऱ्यांना कृषीपंपाला वीज पुरवठा देण्याऐवजी सौरकृषीपंप अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबिले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर जनजागृती शिबिर शुक्रवारी घेण्यात आले होते.

ठळक मुद्देअर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरूच : अनुदानावर उपलब्ध होणार सौरकृषीपंप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांना कृषीपंपाला वीज पुरवठा देण्याऐवजी सौरकृषीपंप अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबिले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर जनजागृती शिबिर शुक्रवारी घेण्यात आले होते. सहा तालुक्यातील ४३० शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. १२१ अर्ज प्राप्त झाले आहेत.सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांला अत्यंत कमी किंमतीत वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जात होता. मात्र अनेक पंपांना कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे वाढल्या होत्या. योग्य दाबाचा वीज पुरवठा व्हावा, यासाठी प्रत्येक शेतकºयाला स्वतंत्र डीपी बसवून देण्याचा निर्णय शासनाने सहा महिन्यांपूर्वी घेतला होता. डीपी बसविण्यासाठी अडीच लाखांपेक्षा अधिक खर्च येत होता. डीपी बसविल्यावर शेतकऱ्याला वीज बिल भरावे लागत होते. यावर उपाय म्हणून शासनाने शेतकऱ्यांना सौरकृषीपंप देण्याचे धोरण अवलंबिले आहे. सौरकृषीपंपासाठी सुध्दा जवळपास अडीच ते तीन लाख रूपयांचा खर्च येणार आहे. जवळपास पाच ते दहा टक्के लाभार्थी हिस्सा वगळता उर्वरित खर्च शासन करणार आहे. सौरकृषीपंपासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी जिल्हाभरातील प्रत्येक तालुक्यात एकाच दिवशी शुक्रवारी जनजागृती शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शेतकºयांनी अर्ज कसा करावा, त्यासाठी आवश्यक असलेले दाखले व सौरकृषीपंपाचे फायदे शेतकऱ्यांना सांगण्यात आले.गडचिरोली विभागात कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, धानोरा, कोरची या सहा तालुक्यांमध्ये शिबिर घेण्यात आले. या शिबिरांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. गडचिरोली येथील शिबिराला २५ शेतकरी उपस्थित होते. त्यापैकी १२ अर्ज प्राप्त झाले. आरमोरी येथे ८४ शेतकरी उपस्थित होते. २० अर्ज प्राप्त झाले. देसाईगंज येथे २० शेतकरी उपस्थित होते. १३ अर्ज प्राप्त झाले. कुरखेडा येथे १५० शेतकरी उपस्थित होते. ७२ अर्ज प्राप्त झाले. धानोरात १२३ शेतकरी उपस्थित होते. २० अर्ज प्राप्त झाले. कोरचीत २८ शेतकरी उपस्थित होते. चार अर्ज प्राप्त झाले. असे एकूण सहा तालुक्यांमध्ये ४३० शेतकरी उपस्थित होते. एकूण १२१ अर्ज प्राप्त झाले.गडचिरोली जिल्ह्यातील गावांपर्यंत वीज पुरवठा झाला आहे. मात्र शेतांमध्ये स्वतंत्र वीज लाईन टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचे शेत गावापासून चार ते पाच किमी अंतरावर असल्यास त्याला वीज पुरवठा करण्यास अधिकचा खर्च येईल. त्यामुळे त्याला वीज जोडणी मिळण्यास निश्चितच विलंब होईल. सौरकृषीपंपाला वीज जोडणीची गरज नाही. त्यामुळे लाभार्थ्याला सौरऊर्जेवर चालणारे कृषिपंप दिल्यास सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल.विजेवरील पंपापेक्षा सौरऊर्जा पंप शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. या पंपाचे बिल भरण्याची आवश्यकता राहत नाही. अर्जासोबत शेतकऱ्यांना सातबारा, जातीचा दाखला, पाणी सुविधा असल्याची सोय आदी प्रमाणपत्र जोडावे लागणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता कार्यालयात अर्ज करावा.- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, वीज विभाग गडचिरोली

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती