शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

संशोधनातून समाजाचे वास्तव पुढे यावे

By admin | Updated: February 23, 2016 01:59 IST

सामाजिक शास्त्रांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या संशोधनातून विविध भागात राहणाऱ्या समाजाचे व मानवी

गडचिरोली : सामाजिक शास्त्रांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या संशोधनातून विविध भागात राहणाऱ्या समाजाचे व मानवी जीवनाचे वास्तव पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले. विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे सहावे राज्यस्तरीय अधिवेशन गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाच्या समाज विज्ञान शाखेच्या समाजशास्त्र विभागप्रमुख तथा अधिष्ठाता डॉ. स्मिता अवसार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. बी. एम. कऱ्हाडे, सागर विद्यापीठ औरंगाबादचे डॉ. दिवाकर राजपूत, डॉ. बी. के. स्वाई आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर म्हणाले की, मानवी जीवन पद्धतीत सतत बदल होत राहते. हे बदल योग्य पद्धतीने होण्यासाठी संशोधन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविते. विकास होत चालला असला तरी माणसाचे समाधान मात्र कमी होत चालले आहे. हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. माणसातील दरी वाढत चालली आहे. याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे, असेही डॉ. कल्याणकर यावेळी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान आचार्य पदवी प्राप्त केलेल्या डॉ. पी. एन. वाघ, डॉ. सुरेश डोहणे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. ईश्वर मोहुर्ले तर आभार प्रा. डॉ. ए. एन. सालोटकर यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)नोकरी टिकविण्यासाठी होत आहे पीएचडी४उद्घाटनीय भाषणादरम्यान डॉ. स्मिता अवसार यांनी पीएचडीपासून खऱ्या अर्थाने संशोधनाला सुरुवात होते. पीएचडी ही संशोधनाची पहिली पायरी आहे. मात्र आपल्याकडे पीएचडीनंतर संशोधनच बंद होते. केवळ नोकरी टिकविण्यासाठी, वेतनात वाढ व्हावी, यासाठी संशोधन केले जाते. खऱ्या संशोधनासाठी संबंधित व्यक्तीमध्ये अंत:प्रेरणा असणे गरजेचे आहे. संशोधन करण्याची मेथॉडालॉजी समाजसेवक डॉ. अभय बंग यांना कदाचित माहितही नसेल. त्यांनी कुपोषणावर केलेले संशोधन पीएचडीसाठी केलेले नाही. तरीही त्यांनी केलेल्या संशोधनाचा अभ्यास भारतातील हजारो विद्यार्थी करतात. संशोधनाच्या माध्यमातून युनो, केंद्र सरकारने काय करावे, याचे सल्ले आपण प्रबंधातून देतो. मात्र आपणच लिहिलेल्या संशोधनावर दोन मिनिटाचीही कृती आपण करू शकत नाही. केवळ पैशाच्या लोभाने केलेल्या संशोधनाचा फायदा समाजाला अजिबात होत नाही. सुशिक्षितांनी समाजाची फसवणूक केली तर त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. केवळ प्रबंधांचे पान भरण्यापेक्षा माणसाला माणूसपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, संशोधनातून मानवी समाजाच्या अडचणी, त्यातील बदल व सरकारला मार्गदर्शक ठरतील, अशा उपाययोजना केल्या पाहिजेत, असे डॉ. अवसार म्हणाल्या.