शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

संशोधनातून समाजाचे वास्तव पुढे यावे

By admin | Updated: February 23, 2016 01:59 IST

सामाजिक शास्त्रांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या संशोधनातून विविध भागात राहणाऱ्या समाजाचे व मानवी

गडचिरोली : सामाजिक शास्त्रांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या संशोधनातून विविध भागात राहणाऱ्या समाजाचे व मानवी जीवनाचे वास्तव पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले. विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे सहावे राज्यस्तरीय अधिवेशन गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाच्या समाज विज्ञान शाखेच्या समाजशास्त्र विभागप्रमुख तथा अधिष्ठाता डॉ. स्मिता अवसार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. बी. एम. कऱ्हाडे, सागर विद्यापीठ औरंगाबादचे डॉ. दिवाकर राजपूत, डॉ. बी. के. स्वाई आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर म्हणाले की, मानवी जीवन पद्धतीत सतत बदल होत राहते. हे बदल योग्य पद्धतीने होण्यासाठी संशोधन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविते. विकास होत चालला असला तरी माणसाचे समाधान मात्र कमी होत चालले आहे. हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. माणसातील दरी वाढत चालली आहे. याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे, असेही डॉ. कल्याणकर यावेळी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान आचार्य पदवी प्राप्त केलेल्या डॉ. पी. एन. वाघ, डॉ. सुरेश डोहणे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. ईश्वर मोहुर्ले तर आभार प्रा. डॉ. ए. एन. सालोटकर यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)नोकरी टिकविण्यासाठी होत आहे पीएचडी४उद्घाटनीय भाषणादरम्यान डॉ. स्मिता अवसार यांनी पीएचडीपासून खऱ्या अर्थाने संशोधनाला सुरुवात होते. पीएचडी ही संशोधनाची पहिली पायरी आहे. मात्र आपल्याकडे पीएचडीनंतर संशोधनच बंद होते. केवळ नोकरी टिकविण्यासाठी, वेतनात वाढ व्हावी, यासाठी संशोधन केले जाते. खऱ्या संशोधनासाठी संबंधित व्यक्तीमध्ये अंत:प्रेरणा असणे गरजेचे आहे. संशोधन करण्याची मेथॉडालॉजी समाजसेवक डॉ. अभय बंग यांना कदाचित माहितही नसेल. त्यांनी कुपोषणावर केलेले संशोधन पीएचडीसाठी केलेले नाही. तरीही त्यांनी केलेल्या संशोधनाचा अभ्यास भारतातील हजारो विद्यार्थी करतात. संशोधनाच्या माध्यमातून युनो, केंद्र सरकारने काय करावे, याचे सल्ले आपण प्रबंधातून देतो. मात्र आपणच लिहिलेल्या संशोधनावर दोन मिनिटाचीही कृती आपण करू शकत नाही. केवळ पैशाच्या लोभाने केलेल्या संशोधनाचा फायदा समाजाला अजिबात होत नाही. सुशिक्षितांनी समाजाची फसवणूक केली तर त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. केवळ प्रबंधांचे पान भरण्यापेक्षा माणसाला माणूसपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, संशोधनातून मानवी समाजाच्या अडचणी, त्यातील बदल व सरकारला मार्गदर्शक ठरतील, अशा उपाययोजना केल्या पाहिजेत, असे डॉ. अवसार म्हणाल्या.