शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

पंचायतमधील पेसा कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती बाह्य यंत्रणेमार्फत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:39 IST

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने २०१४ ला राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत पेसा क्षेत्रासाठी समन्वयक म्हणून तालुका व ...

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने २०१४ ला राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत पेसा क्षेत्रासाठी समन्वयक म्हणून तालुका व जिल्हास्तरावर कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर या अभियानाचे नामकरण राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान असे करण्यात आले. २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कंत्राटी तत्त्वावर हे कर्मचारी कार्यरत हाेते. परंतु मार्च महिन्यात या कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्तीसाठी सीएससी या कंपनीमार्फत नियुक्तीपत्र पाठविण्यात आले. मात्र कंपनीमार्फत होत असलेल्या या नियुक्तीस पेसा समन्वयकांनी विराेध दर्शविला आहे.

आदिवासींची रूढी, प्रथा, परंपरा तथा त्यांच्या विशेष संस्कृतीचे जतन करण्याकरिता संविधानाच्या पाचव्या अनुसूचीमध्ये विशेष तरतूद केली आहे. याअंतर्गत देशातील १० राज्यांचा समावेश होताे. केंद्र शासनामार्फत २४ डिसेंबर १९९६ रोजी पंचायत क्षेत्र विस्तार कायदा पारित करण्यात आला. यानुसार पेसा समन्वयक कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यातील ५९ तालुके पेसा क्षेत्रात आहेत.

सध्या राज्यात पेसा समन्वयकांची ३७ पदे भरलेली आहेत. तर उर्वरित पदे रिक्त आहेत. असे असताना ग्राम विकास विभागाने २२ जानेवारी २०२१ रोजी परिपत्रक काढून बाह्य यंत्रणेमार्फत पेसा समन्वयकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. ग्रामपंचायतची डाटा नोंदणी करणाऱ्या सी.एस.सी. कंपनीला याचे कंत्राट दिले. त्यानुसार पेसा समन्वयकांना पुनर्नियुक्ती संदर्भात मार्च २०२१ मध्ये पत्र पाठविण्यात आले.

(बॉक्स)

कंत्राट स्वीकारण्यास समन्वयकांची ना

सीएससी कंपनीमार्फत मिळालेले कंत्राट अद्याप एकाही पेसा समन्वयकाने स्वीकारले नाही. शासनाच्या ग्रामीण विकास विभागांतर्गत पेसा समन्वयकांना पदावर कायम ठेवावे. बाह्य यंत्रणेमार्फत पेसा समन्वयकांची पुनर्नियुक्ती करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. परंतु त्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन पाठविले हाेते. त्याची ग्राम विकास विभागाकडून अद्याप दखल घेण्यात आलेली नसल्याची माहिती पेसा समन्वयकांनी दिली.