शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

पंचायतमधील पेसा कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती बाह्य यंत्रणेमार्फत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:39 IST

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने २०१४ ला राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत पेसा क्षेत्रासाठी समन्वयक म्हणून तालुका व ...

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने २०१४ ला राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत पेसा क्षेत्रासाठी समन्वयक म्हणून तालुका व जिल्हास्तरावर कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर या अभियानाचे नामकरण राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान असे करण्यात आले. २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कंत्राटी तत्त्वावर हे कर्मचारी कार्यरत हाेते. परंतु मार्च महिन्यात या कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्तीसाठी सीएससी या कंपनीमार्फत नियुक्तीपत्र पाठविण्यात आले. मात्र कंपनीमार्फत होत असलेल्या या नियुक्तीस पेसा समन्वयकांनी विराेध दर्शविला आहे.

आदिवासींची रूढी, प्रथा, परंपरा तथा त्यांच्या विशेष संस्कृतीचे जतन करण्याकरिता संविधानाच्या पाचव्या अनुसूचीमध्ये विशेष तरतूद केली आहे. याअंतर्गत देशातील १० राज्यांचा समावेश होताे. केंद्र शासनामार्फत २४ डिसेंबर १९९६ रोजी पंचायत क्षेत्र विस्तार कायदा पारित करण्यात आला. यानुसार पेसा समन्वयक कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यातील ५९ तालुके पेसा क्षेत्रात आहेत.

सध्या राज्यात पेसा समन्वयकांची ३७ पदे भरलेली आहेत. तर उर्वरित पदे रिक्त आहेत. असे असताना ग्राम विकास विभागाने २२ जानेवारी २०२१ रोजी परिपत्रक काढून बाह्य यंत्रणेमार्फत पेसा समन्वयकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. ग्रामपंचायतची डाटा नोंदणी करणाऱ्या सी.एस.सी. कंपनीला याचे कंत्राट दिले. त्यानुसार पेसा समन्वयकांना पुनर्नियुक्ती संदर्भात मार्च २०२१ मध्ये पत्र पाठविण्यात आले.

(बॉक्स)

कंत्राट स्वीकारण्यास समन्वयकांची ना

सीएससी कंपनीमार्फत मिळालेले कंत्राट अद्याप एकाही पेसा समन्वयकाने स्वीकारले नाही. शासनाच्या ग्रामीण विकास विभागांतर्गत पेसा समन्वयकांना पदावर कायम ठेवावे. बाह्य यंत्रणेमार्फत पेसा समन्वयकांची पुनर्नियुक्ती करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. परंतु त्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन पाठविले हाेते. त्याची ग्राम विकास विभागाकडून अद्याप दखल घेण्यात आलेली नसल्याची माहिती पेसा समन्वयकांनी दिली.