शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

रवींद्रबाबा आत्रामवर वन विभाग मेहरबान का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 01:03 IST

दोडेपल्ली गावच्या चितळ शिकार प्रकरणात सात आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणात सक्रीय सहभाग असलेले

आलापल्ली : दोडेपल्ली गावच्या चितळ शिकार प्रकरणात सात आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणात सक्रीय सहभाग असलेले गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सध्या भाजपमध्ये असलेले रवींद्रबाबा आत्राम यांना अटक करण्यात वन विभाग दिरंगाई करीत असल्याचे दिसून येत आहे. दीड महिना उलटूनही रवींद्रबाबा आत्राम वन विभागाच्या पथकाला हाती लागलेले नाही. अहेरी तालुक्याच्या दोडेपल्ली गावात ६ मार्च २०१६ ला कक्ष क्रमांक ३२ मध्ये चितळाची शिकार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या ठिकाणावरून वन विभागाने चार किलो मांस व एका आरोपीला अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासात आनंद लचमा तोरेम रा. दोडेपल्ली, दीपक सडमेक, दिवाकर सडमेक, नारायण मडावी, पिंटू पेंदाम, प्रकाश पेंदाम यांना अटक केली. ज्यांच्या बैलबंडीतून हे मांस आणण्यात आले. ते विठ्ठल तलांडे यांनाही पोलिसांनी अटक केली. परंतु या प्रकरणात मुख्य भूमिका असलेले गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम यांना मात्र अद्याप वन विभागाने अटक केलेली नाही. दीड महिना उलटूनही रवींद्र आत्राम यांच्यावर वन विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. सात आरोपींना अटक केल्यानंतर रवींद्र आत्रामांवर वन विभाग एवढा मेहरबान का, असा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्यांना पडला आहे. गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात रवींद्र आत्राम यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतरही आत्राम वन विभागाकडे सरेंडर झाले नाही व अजुनही ते फरारच आहे.या संदर्भात तपास अधिकारी तथा उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल यांनी सांगितले की, रवींद्र आत्राम यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमच्या चमू एकत्रीतपणे दिवसरात्र काम करीत आहे. आलापल्लीचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांनी सध्या तपास सुरू आहे. आत्राम यांना पकडण्यासाठी पोलिसांचीही मदत घेतली जाईल. लवकरच त्यांना जेरबंद करण्यात यश येईल, असे सांगितले. उल्लेखनिय बाब म्हणजे, रवींद्रबाबा आत्राम यांच्या बंगल्यावर धाड घातली त्यावेळी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा व प्राण्यांचे अवयव तेथून वन विभागाने जप्त केले होते. त्यांना चौकशीसाठी ११ मार्च रोजी उपस्थित राहण्याबाबत नोटीसही बजाविण्यात आला होता. परंतु ते उपस्थित झाले नव्हते. तेव्हापासून ते फरारच आहेत. (प्रतिनिधी)