शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

रवी व मुल्लूर चक गावे झाली निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:27 IST

तालुक्यातील अरसोडा, रवी व मुल्लूर चक ही तीन गावे मिळून अरसोडा ही ग्रामपंचायत होती. मात्र अरसोडा गावाचा समावेश आरमोरी नगर परिषदेमध्ये करण्यात आल्याने गेल्या सहा महिन्यांपासून अरसोडा ग्रा.पं.मधील रवी व मुल्लूर चक ही दोन्ही गावे वाऱ्यावर पडली आहेत.

ठळक मुद्देसोईसुविधांपासून वंचित : रवी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा देण्याची मागणी

महेंद्र रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील अरसोडा, रवी व मुल्लूर चक ही तीन गावे मिळून अरसोडा ही ग्रामपंचायत होती. मात्र अरसोडा गावाचा समावेश आरमोरी नगर परिषदेमध्ये करण्यात आल्याने गेल्या सहा महिन्यांपासून अरसोडा ग्रा.पं.मधील रवी व मुल्लूर चक ही दोन्ही गावे वाऱ्यावर पडली आहेत. रवी व मुल्लूर चक ही दोन्ही गावे मिळून रवी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी या दोन्ही गावातील नागरिकांनी केली आहे.मात्र या बाबीला पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही याबाबत प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे हे दोन्ही गावे समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. या दोन्ही गावातील नागरिकांना साधे दाखलेही मिळणे कठीण झाले आहे. अनेक मूलभूत सोयीसुविधा व शासकीय योजनेपासून हे दोन्ही गाव वंचित ठरत आहेत. या गावाचा वाली कोणीच नसल्याने ही गावे सध्या निराधार झाली आहेत. रवी व मुल्लूर चक या दोन्ही गावातील नागरिकांच्या समस्येवर फुंकर घालणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ५ जून २०१८ ला आरमोरीला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाला. आरमोरी नगर परिषद निर्मितीला लोकसंख्येचा आकडा कमी पडत असल्याने अरसोडा गावाचा समावेश आरमोरी नगर परिषदेत करण्यात आला. मात्र अरसोडा गावाच्या समावेशाने अरसोडा ग्रा.पं.मधील रवी व मुल्लूर चक या गावांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. वास्तविक पाहता आरमोरी नगर परिषदमध्ये अरसोडा ग्रा.पं.मधील तिन्ही गावांचा समावेश झाला असता तर ही समस्या उद्भवली नसती. परंतु तसे न झाल्याने या दोन्ही गावाच्या समायोजनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. इतर ग्रामपंचायतीमध्ये विलिन होण्यास सदर दोन्ही गावातील नागरिकांचा विरोध आहे. एकतर आरमोरी नगर परिषदेमध्ये विलीन करा, नाही तर स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्या, ही मागणी दोन्ही गावातील नागरिकांची आहे. त्यामुळे प्रशासनासमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे. पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही अरसोडा ग्रा.पं.चा रेकॉर्ड नगर परिषदेला हस्तांतरीत झाला नाही. त्यामुळे सर्वच विकासकामे ठप्प झाली आहेत.रवी व मुल्लूर चक ही दोन्ही गावे समस्यांच्या विळख्यात सापडलेली आहे. यावर तोडगा काढून या दोन्ही गावांच्या बाबतीत शासन व प्रशासनाने त्वरीत निर्णय घेऊन ग्रामस्थांना न्याय द्यावा.- भारत बावनथडे,जिल्हा सरचिटणीस,भाजयुमो आरमोरीया समस्यांच्या गर्तेत सापडले गावरवी व मुल्लूर चक या दोन्ही गावातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विविध कामासाठी आवश्यक असणारे दाखलेही मिळणे कठीण झाले आहे. अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून दोन्ही गावे वंचित आहेत. शासन व प्रशासनाने या गावांकडे पाठ फिरविल्याने ही दोन्ही गावे वाडीत टाकल्यासारखी झाली आहेत. रवी व मुल्लूर चक येथील परिसर जंगलव्याप्त असून वाघबाधीत आहे. रात्रो या गावात वाघ व इतर वन्यप्राण्यांच सिरकाव होतो. गेल्या अनेक महिन्यांपासून येथील अनेक खांबांचे पथदिवे बंद आहेत. गावाच्या सभोवताल नवीन खांब लावण्यात आले. मात्र पथदिवे लागले नाही. त्यामुळे गावातील रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य आहे. रोहयोची अनेक कामे मंजूर आहेत. मात्र गावाचा वाली कोणी नसल्यामुळे ही कामेही ठप्प पडलेली आहे. परिणामी गावातील नागरिकांना हक्काचा रोजगार मिळणेही कठीण झाले आहे. अनेक वैयक्तिक लाभाच्या योजनांचा येथील नागरिकांना लाभ मिळत नाही. अनेक महिन्यांपासून गावातील नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. हातपंपाजवळ दुर्गंधी पसरली आहे. अशा अनेकविध समस्या या गावात निर्माण झाल्या आहेत. सदर दोन्ही गावाच्या समायोजनाबाबत काहीच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आणखी किती दिवस व किती महिने ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न सदर दोन्ही गावातील नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत