शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

रवी व मुल्लूर चक गावे झाली निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:27 IST

तालुक्यातील अरसोडा, रवी व मुल्लूर चक ही तीन गावे मिळून अरसोडा ही ग्रामपंचायत होती. मात्र अरसोडा गावाचा समावेश आरमोरी नगर परिषदेमध्ये करण्यात आल्याने गेल्या सहा महिन्यांपासून अरसोडा ग्रा.पं.मधील रवी व मुल्लूर चक ही दोन्ही गावे वाऱ्यावर पडली आहेत.

ठळक मुद्देसोईसुविधांपासून वंचित : रवी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा देण्याची मागणी

महेंद्र रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील अरसोडा, रवी व मुल्लूर चक ही तीन गावे मिळून अरसोडा ही ग्रामपंचायत होती. मात्र अरसोडा गावाचा समावेश आरमोरी नगर परिषदेमध्ये करण्यात आल्याने गेल्या सहा महिन्यांपासून अरसोडा ग्रा.पं.मधील रवी व मुल्लूर चक ही दोन्ही गावे वाऱ्यावर पडली आहेत. रवी व मुल्लूर चक ही दोन्ही गावे मिळून रवी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी या दोन्ही गावातील नागरिकांनी केली आहे.मात्र या बाबीला पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही याबाबत प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे हे दोन्ही गावे समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. या दोन्ही गावातील नागरिकांना साधे दाखलेही मिळणे कठीण झाले आहे. अनेक मूलभूत सोयीसुविधा व शासकीय योजनेपासून हे दोन्ही गाव वंचित ठरत आहेत. या गावाचा वाली कोणीच नसल्याने ही गावे सध्या निराधार झाली आहेत. रवी व मुल्लूर चक या दोन्ही गावातील नागरिकांच्या समस्येवर फुंकर घालणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ५ जून २०१८ ला आरमोरीला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाला. आरमोरी नगर परिषद निर्मितीला लोकसंख्येचा आकडा कमी पडत असल्याने अरसोडा गावाचा समावेश आरमोरी नगर परिषदेत करण्यात आला. मात्र अरसोडा गावाच्या समावेशाने अरसोडा ग्रा.पं.मधील रवी व मुल्लूर चक या गावांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. वास्तविक पाहता आरमोरी नगर परिषदमध्ये अरसोडा ग्रा.पं.मधील तिन्ही गावांचा समावेश झाला असता तर ही समस्या उद्भवली नसती. परंतु तसे न झाल्याने या दोन्ही गावाच्या समायोजनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. इतर ग्रामपंचायतीमध्ये विलिन होण्यास सदर दोन्ही गावातील नागरिकांचा विरोध आहे. एकतर आरमोरी नगर परिषदेमध्ये विलीन करा, नाही तर स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्या, ही मागणी दोन्ही गावातील नागरिकांची आहे. त्यामुळे प्रशासनासमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे. पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही अरसोडा ग्रा.पं.चा रेकॉर्ड नगर परिषदेला हस्तांतरीत झाला नाही. त्यामुळे सर्वच विकासकामे ठप्प झाली आहेत.रवी व मुल्लूर चक ही दोन्ही गावे समस्यांच्या विळख्यात सापडलेली आहे. यावर तोडगा काढून या दोन्ही गावांच्या बाबतीत शासन व प्रशासनाने त्वरीत निर्णय घेऊन ग्रामस्थांना न्याय द्यावा.- भारत बावनथडे,जिल्हा सरचिटणीस,भाजयुमो आरमोरीया समस्यांच्या गर्तेत सापडले गावरवी व मुल्लूर चक या दोन्ही गावातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विविध कामासाठी आवश्यक असणारे दाखलेही मिळणे कठीण झाले आहे. अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून दोन्ही गावे वंचित आहेत. शासन व प्रशासनाने या गावांकडे पाठ फिरविल्याने ही दोन्ही गावे वाडीत टाकल्यासारखी झाली आहेत. रवी व मुल्लूर चक येथील परिसर जंगलव्याप्त असून वाघबाधीत आहे. रात्रो या गावात वाघ व इतर वन्यप्राण्यांच सिरकाव होतो. गेल्या अनेक महिन्यांपासून येथील अनेक खांबांचे पथदिवे बंद आहेत. गावाच्या सभोवताल नवीन खांब लावण्यात आले. मात्र पथदिवे लागले नाही. त्यामुळे गावातील रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य आहे. रोहयोची अनेक कामे मंजूर आहेत. मात्र गावाचा वाली कोणी नसल्यामुळे ही कामेही ठप्प पडलेली आहे. परिणामी गावातील नागरिकांना हक्काचा रोजगार मिळणेही कठीण झाले आहे. अनेक वैयक्तिक लाभाच्या योजनांचा येथील नागरिकांना लाभ मिळत नाही. अनेक महिन्यांपासून गावातील नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. हातपंपाजवळ दुर्गंधी पसरली आहे. अशा अनेकविध समस्या या गावात निर्माण झाल्या आहेत. सदर दोन्ही गावाच्या समायोजनाबाबत काहीच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आणखी किती दिवस व किती महिने ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न सदर दोन्ही गावातील नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत