शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

रवी व मुल्लूर चक गावे झाली निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:27 IST

तालुक्यातील अरसोडा, रवी व मुल्लूर चक ही तीन गावे मिळून अरसोडा ही ग्रामपंचायत होती. मात्र अरसोडा गावाचा समावेश आरमोरी नगर परिषदेमध्ये करण्यात आल्याने गेल्या सहा महिन्यांपासून अरसोडा ग्रा.पं.मधील रवी व मुल्लूर चक ही दोन्ही गावे वाऱ्यावर पडली आहेत.

ठळक मुद्देसोईसुविधांपासून वंचित : रवी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा देण्याची मागणी

महेंद्र रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील अरसोडा, रवी व मुल्लूर चक ही तीन गावे मिळून अरसोडा ही ग्रामपंचायत होती. मात्र अरसोडा गावाचा समावेश आरमोरी नगर परिषदेमध्ये करण्यात आल्याने गेल्या सहा महिन्यांपासून अरसोडा ग्रा.पं.मधील रवी व मुल्लूर चक ही दोन्ही गावे वाऱ्यावर पडली आहेत. रवी व मुल्लूर चक ही दोन्ही गावे मिळून रवी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी या दोन्ही गावातील नागरिकांनी केली आहे.मात्र या बाबीला पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही याबाबत प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे हे दोन्ही गावे समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. या दोन्ही गावातील नागरिकांना साधे दाखलेही मिळणे कठीण झाले आहे. अनेक मूलभूत सोयीसुविधा व शासकीय योजनेपासून हे दोन्ही गाव वंचित ठरत आहेत. या गावाचा वाली कोणीच नसल्याने ही गावे सध्या निराधार झाली आहेत. रवी व मुल्लूर चक या दोन्ही गावातील नागरिकांच्या समस्येवर फुंकर घालणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ५ जून २०१८ ला आरमोरीला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाला. आरमोरी नगर परिषद निर्मितीला लोकसंख्येचा आकडा कमी पडत असल्याने अरसोडा गावाचा समावेश आरमोरी नगर परिषदेत करण्यात आला. मात्र अरसोडा गावाच्या समावेशाने अरसोडा ग्रा.पं.मधील रवी व मुल्लूर चक या गावांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. वास्तविक पाहता आरमोरी नगर परिषदमध्ये अरसोडा ग्रा.पं.मधील तिन्ही गावांचा समावेश झाला असता तर ही समस्या उद्भवली नसती. परंतु तसे न झाल्याने या दोन्ही गावाच्या समायोजनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. इतर ग्रामपंचायतीमध्ये विलिन होण्यास सदर दोन्ही गावातील नागरिकांचा विरोध आहे. एकतर आरमोरी नगर परिषदेमध्ये विलीन करा, नाही तर स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्या, ही मागणी दोन्ही गावातील नागरिकांची आहे. त्यामुळे प्रशासनासमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे. पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही अरसोडा ग्रा.पं.चा रेकॉर्ड नगर परिषदेला हस्तांतरीत झाला नाही. त्यामुळे सर्वच विकासकामे ठप्प झाली आहेत.रवी व मुल्लूर चक ही दोन्ही गावे समस्यांच्या विळख्यात सापडलेली आहे. यावर तोडगा काढून या दोन्ही गावांच्या बाबतीत शासन व प्रशासनाने त्वरीत निर्णय घेऊन ग्रामस्थांना न्याय द्यावा.- भारत बावनथडे,जिल्हा सरचिटणीस,भाजयुमो आरमोरीया समस्यांच्या गर्तेत सापडले गावरवी व मुल्लूर चक या दोन्ही गावातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विविध कामासाठी आवश्यक असणारे दाखलेही मिळणे कठीण झाले आहे. अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून दोन्ही गावे वंचित आहेत. शासन व प्रशासनाने या गावांकडे पाठ फिरविल्याने ही दोन्ही गावे वाडीत टाकल्यासारखी झाली आहेत. रवी व मुल्लूर चक येथील परिसर जंगलव्याप्त असून वाघबाधीत आहे. रात्रो या गावात वाघ व इतर वन्यप्राण्यांच सिरकाव होतो. गेल्या अनेक महिन्यांपासून येथील अनेक खांबांचे पथदिवे बंद आहेत. गावाच्या सभोवताल नवीन खांब लावण्यात आले. मात्र पथदिवे लागले नाही. त्यामुळे गावातील रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य आहे. रोहयोची अनेक कामे मंजूर आहेत. मात्र गावाचा वाली कोणी नसल्यामुळे ही कामेही ठप्प पडलेली आहे. परिणामी गावातील नागरिकांना हक्काचा रोजगार मिळणेही कठीण झाले आहे. अनेक वैयक्तिक लाभाच्या योजनांचा येथील नागरिकांना लाभ मिळत नाही. अनेक महिन्यांपासून गावातील नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. हातपंपाजवळ दुर्गंधी पसरली आहे. अशा अनेकविध समस्या या गावात निर्माण झाल्या आहेत. सदर दोन्ही गावाच्या समायोजनाबाबत काहीच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आणखी किती दिवस व किती महिने ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न सदर दोन्ही गावातील नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत