शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदीच्या प्रिन्सने भारतासोबत दगाफटका केला; कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
2
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
3
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
5
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
6
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?
7
AI मुळे नोकऱ्या धोक्यात? 'या' टेक कंपनीने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढले बाहेर!
8
आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
9
शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?
10
मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट, 360 डिग्री कॅमेरा अन् बरंच काही; जाणून घ्या सविस्तर
11
मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
12
TCS कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! कंपनीने दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना दिलं 'वेतनवाढी'चं गिफ्ट
13
मंत्रिमंडळ १५ निर्णय; मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर
14
'हार्ले-डेव्हिडसन'बाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा; टॅरिफ नाही, या कारणासाठी भारतातून कंपनी बाहेर गेली
15
'पैसे बचाओ' पॉलिसी! ९ ते ५ दरम्यान कर्मचाऱ्यांवर 'वॉच', 'फोनाफोनी'चाही घेणार 'हिशेब'; Amazon मध्ये काय घडतंय?
16
Ola Electric च्या शेअरनं पकडला तुफान 'स्पीड'; ६ दिवसांत ४२% ची वाढ, गुंतवणूकदार मालामाल
17
"हा माझा पती... नाही तो माझा पती"; लाथाबुक्क्या हाणल्या, बाटल्या फेकून मारल्या, पोलीस स्टेशनसमोर महिलांमध्ये जुंपली! 
18
बस्तर पूरग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री! बचावकार्यात हलगर्जीपणा चालणार नाही; अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
Astro Tips: लग्नाची सप्तपदी आयुष्यभराची तप्तपदी होऊ नये म्हणून लग्नापूर्वी घ्या 'ही' काळजी!
20
"ट्रम्प यांना अर्थशास्त्राची काहीच समज नाही..," 'या' दिग्गज विश्लेषकानं दिला इशारा

रोवणी ३२ टक्क्यांवर थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:16 IST

मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने बहुतांश शेतकºयांच्या शेतातील पाणी आटले आहे.

ठळक मुद्देपीक करपण्याच्या मार्गावर : जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर; बांधाला पडल्या भेगा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने बहुतांश शेतकºयांच्या शेतातील पाणी आटले आहे. शेत कोरडे पडले आहे. त्यामुळे रोवणीची कामे जवळपास ठप्प पडली असून रोवलेले धान पिकही करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हाभरात १ लाख १९ हजार ७५ हेक्टरवर रोवणी करायची आहे. मात्र २ आॅगस्टपर्यंत केवळ ३७ हजार ९४७ हेक्टरवरच रोवणीची कामे झाली आहेत. टक्केवारीमध्ये प्रमाण ३१.८४ टक्के एवढी आहे. रोवलेले धान पिकही पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर खरीप हंगामात विविध पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी सर्वाधिक क्षेत्र धानाचे असून खरीप हंगामात १ लाख ५३ हजार हेक्टरवर धान पीक लावले जाते. यापैकी ३७ हजार ९४७ हेक्टरवर धानाची रोवणी झाली आहे. १५ दिवसांपूर्वीच गडचिरोली जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. नद्या, नाल्या, ओसंडून वाहू लागल्या. काही भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हाच रोवणीच्या कामाला सुरूवात झाली होती. त्यानंतर मात्र पावसाने कायमची उसंत घेतली. पावसाच्या उसंतीनंतर जवळपास पाच ते सहा दिवसच रोवणे चालले. त्यातही सर्वच शेतकºयांनी रोवणीला सुरूवात केल्याने मजूर मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे पाहिच्या त्या प्रमाणात रोवणीची कामे झाली नाहीत. त्यानंतर मात्र पावसाने कायमची उसंत घेतली. धानाच्या बांध्यांमधील पाणी आटण्यास सुरूवात झाली. त्यामुळे बहुतांश शेतकºयांच्या रोवणीची कामे आठ दिवसांपूर्वी पासूनच थांबली आहेत. त्यामुळे १५ दिवसांचा कालावधी उलटूनही केवळ ३२ टक्केच क्षेत्रावर रोवणीची कामे झाली असल्याचे दिसून येत आहे. दमट वातावरणामुळे रोगांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी रोवणीची कामे सोडून पºह्यांवर कीटकनाशकांची फवारणी करीत आहे. दुष्काळ पडल्यास धान रोवणीसाठी आलेला खर्चही भरून निघणे कठीण होणार असल्याने शेतकºयांची चिंता वाढणार आहे.सरासरीच्या ८२ टक्केच पाऊस२ आॅगस्टपर्यंत जिल्हाभरात ७३० मिमी पाऊस पडायला पाहिजे. मात्र यावर्षी केवळ ६०२ मिमी पाऊस झाला आहे. दरवर्षी पडणाºया सरासरीच्या ८२ टक्केच पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी पडलेला पाऊस तीन-चार दिवसच पडला. त्यानंतर मात्र पावसाने उसंत घेतली. मोठा पाऊस झाल्याने बहुतांश पाणी वाहून गेले. सरासरीच्या जवळपास जरी पाऊस झाला असला तरी पावसात नियमितता राहिली नसल्याने धानाच्या बांध्यांमध्ये पाणी साचून नाही. त्यामुळे रोवणीची कामे खोळंबली असल्याचे दिसून येते. काही शेतकºयांनी तलाव, बोड्या फोडून शेतांना पाणी देण्यास सुरूवात केली आहे. मात्र यानंतर पाऊस न झाल्यास सदर शेतकरी अडचणीत येणार आहेत. शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते.दुष्काळजन्य परिस्थितीशेतकºयांच्या रोवणीची कामे थांबली आहेत. त्याचबरोबर मागील आठ दिवसांपासून दिवसा कडक ऊन पडत असल्याने रोवलेल्या बांधीमधील पाणी पूर्णपणे आटले आहे. त्यामुळे जमिनीला भेगा जाण्यास सुरूवात झाली आहे. पुढील चार दिवस उष्णतामान कायम राहून पाऊस न झाल्यास रोवलेले धान, पºहे करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याचे वातावरण लक्षात घेतले तर पुढील आठ दिवस पाऊस येईल, याची चिन्हे दिसत नाही. सरकारने कर्जमाफी केली. मात्र पीक झाले नाही तर शेतकरी वर्ग आणखी कर्जाच्या खाईत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.