शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

रोवणी ३२ टक्क्यांवर थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:16 IST

मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने बहुतांश शेतकºयांच्या शेतातील पाणी आटले आहे.

ठळक मुद्देपीक करपण्याच्या मार्गावर : जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर; बांधाला पडल्या भेगा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने बहुतांश शेतकºयांच्या शेतातील पाणी आटले आहे. शेत कोरडे पडले आहे. त्यामुळे रोवणीची कामे जवळपास ठप्प पडली असून रोवलेले धान पिकही करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हाभरात १ लाख १९ हजार ७५ हेक्टरवर रोवणी करायची आहे. मात्र २ आॅगस्टपर्यंत केवळ ३७ हजार ९४७ हेक्टरवरच रोवणीची कामे झाली आहेत. टक्केवारीमध्ये प्रमाण ३१.८४ टक्के एवढी आहे. रोवलेले धान पिकही पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर खरीप हंगामात विविध पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी सर्वाधिक क्षेत्र धानाचे असून खरीप हंगामात १ लाख ५३ हजार हेक्टरवर धान पीक लावले जाते. यापैकी ३७ हजार ९४७ हेक्टरवर धानाची रोवणी झाली आहे. १५ दिवसांपूर्वीच गडचिरोली जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. नद्या, नाल्या, ओसंडून वाहू लागल्या. काही भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हाच रोवणीच्या कामाला सुरूवात झाली होती. त्यानंतर मात्र पावसाने कायमची उसंत घेतली. पावसाच्या उसंतीनंतर जवळपास पाच ते सहा दिवसच रोवणे चालले. त्यातही सर्वच शेतकºयांनी रोवणीला सुरूवात केल्याने मजूर मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे पाहिच्या त्या प्रमाणात रोवणीची कामे झाली नाहीत. त्यानंतर मात्र पावसाने कायमची उसंत घेतली. धानाच्या बांध्यांमधील पाणी आटण्यास सुरूवात झाली. त्यामुळे बहुतांश शेतकºयांच्या रोवणीची कामे आठ दिवसांपूर्वी पासूनच थांबली आहेत. त्यामुळे १५ दिवसांचा कालावधी उलटूनही केवळ ३२ टक्केच क्षेत्रावर रोवणीची कामे झाली असल्याचे दिसून येत आहे. दमट वातावरणामुळे रोगांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी रोवणीची कामे सोडून पºह्यांवर कीटकनाशकांची फवारणी करीत आहे. दुष्काळ पडल्यास धान रोवणीसाठी आलेला खर्चही भरून निघणे कठीण होणार असल्याने शेतकºयांची चिंता वाढणार आहे.सरासरीच्या ८२ टक्केच पाऊस२ आॅगस्टपर्यंत जिल्हाभरात ७३० मिमी पाऊस पडायला पाहिजे. मात्र यावर्षी केवळ ६०२ मिमी पाऊस झाला आहे. दरवर्षी पडणाºया सरासरीच्या ८२ टक्केच पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी पडलेला पाऊस तीन-चार दिवसच पडला. त्यानंतर मात्र पावसाने उसंत घेतली. मोठा पाऊस झाल्याने बहुतांश पाणी वाहून गेले. सरासरीच्या जवळपास जरी पाऊस झाला असला तरी पावसात नियमितता राहिली नसल्याने धानाच्या बांध्यांमध्ये पाणी साचून नाही. त्यामुळे रोवणीची कामे खोळंबली असल्याचे दिसून येते. काही शेतकºयांनी तलाव, बोड्या फोडून शेतांना पाणी देण्यास सुरूवात केली आहे. मात्र यानंतर पाऊस न झाल्यास सदर शेतकरी अडचणीत येणार आहेत. शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते.दुष्काळजन्य परिस्थितीशेतकºयांच्या रोवणीची कामे थांबली आहेत. त्याचबरोबर मागील आठ दिवसांपासून दिवसा कडक ऊन पडत असल्याने रोवलेल्या बांधीमधील पाणी पूर्णपणे आटले आहे. त्यामुळे जमिनीला भेगा जाण्यास सुरूवात झाली आहे. पुढील चार दिवस उष्णतामान कायम राहून पाऊस न झाल्यास रोवलेले धान, पºहे करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याचे वातावरण लक्षात घेतले तर पुढील आठ दिवस पाऊस येईल, याची चिन्हे दिसत नाही. सरकारने कर्जमाफी केली. मात्र पीक झाले नाही तर शेतकरी वर्ग आणखी कर्जाच्या खाईत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.