शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

रोवणी ३२ टक्क्यांवर थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:16 IST

मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने बहुतांश शेतकºयांच्या शेतातील पाणी आटले आहे.

ठळक मुद्देपीक करपण्याच्या मार्गावर : जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर; बांधाला पडल्या भेगा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने बहुतांश शेतकºयांच्या शेतातील पाणी आटले आहे. शेत कोरडे पडले आहे. त्यामुळे रोवणीची कामे जवळपास ठप्प पडली असून रोवलेले धान पिकही करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हाभरात १ लाख १९ हजार ७५ हेक्टरवर रोवणी करायची आहे. मात्र २ आॅगस्टपर्यंत केवळ ३७ हजार ९४७ हेक्टरवरच रोवणीची कामे झाली आहेत. टक्केवारीमध्ये प्रमाण ३१.८४ टक्के एवढी आहे. रोवलेले धान पिकही पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर खरीप हंगामात विविध पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी सर्वाधिक क्षेत्र धानाचे असून खरीप हंगामात १ लाख ५३ हजार हेक्टरवर धान पीक लावले जाते. यापैकी ३७ हजार ९४७ हेक्टरवर धानाची रोवणी झाली आहे. १५ दिवसांपूर्वीच गडचिरोली जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. नद्या, नाल्या, ओसंडून वाहू लागल्या. काही भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हाच रोवणीच्या कामाला सुरूवात झाली होती. त्यानंतर मात्र पावसाने कायमची उसंत घेतली. पावसाच्या उसंतीनंतर जवळपास पाच ते सहा दिवसच रोवणे चालले. त्यातही सर्वच शेतकºयांनी रोवणीला सुरूवात केल्याने मजूर मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे पाहिच्या त्या प्रमाणात रोवणीची कामे झाली नाहीत. त्यानंतर मात्र पावसाने कायमची उसंत घेतली. धानाच्या बांध्यांमधील पाणी आटण्यास सुरूवात झाली. त्यामुळे बहुतांश शेतकºयांच्या रोवणीची कामे आठ दिवसांपूर्वी पासूनच थांबली आहेत. त्यामुळे १५ दिवसांचा कालावधी उलटूनही केवळ ३२ टक्केच क्षेत्रावर रोवणीची कामे झाली असल्याचे दिसून येत आहे. दमट वातावरणामुळे रोगांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी रोवणीची कामे सोडून पºह्यांवर कीटकनाशकांची फवारणी करीत आहे. दुष्काळ पडल्यास धान रोवणीसाठी आलेला खर्चही भरून निघणे कठीण होणार असल्याने शेतकºयांची चिंता वाढणार आहे.सरासरीच्या ८२ टक्केच पाऊस२ आॅगस्टपर्यंत जिल्हाभरात ७३० मिमी पाऊस पडायला पाहिजे. मात्र यावर्षी केवळ ६०२ मिमी पाऊस झाला आहे. दरवर्षी पडणाºया सरासरीच्या ८२ टक्केच पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी पडलेला पाऊस तीन-चार दिवसच पडला. त्यानंतर मात्र पावसाने उसंत घेतली. मोठा पाऊस झाल्याने बहुतांश पाणी वाहून गेले. सरासरीच्या जवळपास जरी पाऊस झाला असला तरी पावसात नियमितता राहिली नसल्याने धानाच्या बांध्यांमध्ये पाणी साचून नाही. त्यामुळे रोवणीची कामे खोळंबली असल्याचे दिसून येते. काही शेतकºयांनी तलाव, बोड्या फोडून शेतांना पाणी देण्यास सुरूवात केली आहे. मात्र यानंतर पाऊस न झाल्यास सदर शेतकरी अडचणीत येणार आहेत. शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते.दुष्काळजन्य परिस्थितीशेतकºयांच्या रोवणीची कामे थांबली आहेत. त्याचबरोबर मागील आठ दिवसांपासून दिवसा कडक ऊन पडत असल्याने रोवलेल्या बांधीमधील पाणी पूर्णपणे आटले आहे. त्यामुळे जमिनीला भेगा जाण्यास सुरूवात झाली आहे. पुढील चार दिवस उष्णतामान कायम राहून पाऊस न झाल्यास रोवलेले धान, पºहे करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याचे वातावरण लक्षात घेतले तर पुढील आठ दिवस पाऊस येईल, याची चिन्हे दिसत नाही. सरकारने कर्जमाफी केली. मात्र पीक झाले नाही तर शेतकरी वर्ग आणखी कर्जाच्या खाईत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.