शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

आजी-नातवासह तिघांच्या मृत्यूने हळहळले राममोहनपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:44 IST

या घटनेत राजू रामकृष्ण विस्वास (वय १९), कमला मनिंद्र विस्वास (६५) आणि वीरकुमार सुभाष मंडल (११) या तिघांचा जागीच ...

या घटनेत राजू रामकृष्ण विस्वास (वय १९), कमला मनिंद्र विस्वास (६५) आणि वीरकुमार सुभाष मंडल (११) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार डॉ. होळी यांनी गुरुवारी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी प्रामुख्याने भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा व उपसरपंच प्रकाश सरकार व गावकरी उपस्थित होते.

(बॉक्स)

अशी झाली घटना

मृतांचे कुटुंबीय शेतीसोबत मत्स्यव्यवसाय करतात. त्यांच्या शेतात मत्स्यतलाव आहे. त्या तलावातून रात्री माशांची चोरी होऊ नये म्हणून विद्युत बल्ब लावण्यासाठी मृत राजू विस्वास शेतात गेला होता. परंतु, तो घरी परत आला नाही. फोन लावला असता तो फोनही उचलत नव्हता. त्यामुळे आजी कमला शेजारच्या वीरकुमार या मुलाला घेऊन शेतात गेली. तिथे राजू बेशुद्ध होऊन पडलेला दिसला. त्याला काय झाले म्हणून पाहण्यासाठी हात लावला असता कमला व वीरकुमार यांनाही विजेचा धक्का लागला आणि ते तिथेच पडले.

(बॉक्स)

थोडक्यात बचावली वासंती

शेतावर गेलेले कोणीही घरी परत न आल्याने वासंती सुभाष विस्वास ही शेतावर पाहण्यासाठी गेली. तिथे सर्वजण निपचित पडून होते. वासंती हिनेसुद्धा मृतांना हात लावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला विजेचा हलका धक्का बसला आणि ती लगेच मागे हटली. तिने झालेल्या प्रकाराची माहिती गावातील लोकांना दिली. गावकऱ्यांनी वीज प्रवाह बंद करून तिन्ही मृतांना घरी आणले आणि नंतर शवविच्छेदनाकरिता आष्टी रुग्णालयात दाखल केले.