शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

आजी-नातवासह तिघांच्या मृत्यूने हळहळले राममोहनपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:44 IST

या घटनेत राजू रामकृष्ण विस्वास (वय १९), कमला मनिंद्र विस्वास (६५) आणि वीरकुमार सुभाष मंडल (११) या तिघांचा जागीच ...

या घटनेत राजू रामकृष्ण विस्वास (वय १९), कमला मनिंद्र विस्वास (६५) आणि वीरकुमार सुभाष मंडल (११) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार डॉ. होळी यांनी गुरुवारी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी प्रामुख्याने भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा व उपसरपंच प्रकाश सरकार व गावकरी उपस्थित होते.

(बॉक्स)

अशी झाली घटना

मृतांचे कुटुंबीय शेतीसोबत मत्स्यव्यवसाय करतात. त्यांच्या शेतात मत्स्यतलाव आहे. त्या तलावातून रात्री माशांची चोरी होऊ नये म्हणून विद्युत बल्ब लावण्यासाठी मृत राजू विस्वास शेतात गेला होता. परंतु, तो घरी परत आला नाही. फोन लावला असता तो फोनही उचलत नव्हता. त्यामुळे आजी कमला शेजारच्या वीरकुमार या मुलाला घेऊन शेतात गेली. तिथे राजू बेशुद्ध होऊन पडलेला दिसला. त्याला काय झाले म्हणून पाहण्यासाठी हात लावला असता कमला व वीरकुमार यांनाही विजेचा धक्का लागला आणि ते तिथेच पडले.

(बॉक्स)

थोडक्यात बचावली वासंती

शेतावर गेलेले कोणीही घरी परत न आल्याने वासंती सुभाष विस्वास ही शेतावर पाहण्यासाठी गेली. तिथे सर्वजण निपचित पडून होते. वासंती हिनेसुद्धा मृतांना हात लावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला विजेचा हलका धक्का बसला आणि ती लगेच मागे हटली. तिने झालेल्या प्रकाराची माहिती गावातील लोकांना दिली. गावकऱ्यांनी वीज प्रवाह बंद करून तिन्ही मृतांना घरी आणले आणि नंतर शवविच्छेदनाकरिता आष्टी रुग्णालयात दाखल केले.