शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

आजी-नातवासह तिघांच्या मृत्यूने हळहळले राममोहनपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:44 IST

या घटनेत राजू रामकृष्ण विस्वास (वय १९), कमला मनिंद्र विस्वास (६५) आणि वीरकुमार सुभाष मंडल (११) या तिघांचा जागीच ...

या घटनेत राजू रामकृष्ण विस्वास (वय १९), कमला मनिंद्र विस्वास (६५) आणि वीरकुमार सुभाष मंडल (११) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार डॉ. होळी यांनी गुरुवारी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी प्रामुख्याने भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा व उपसरपंच प्रकाश सरकार व गावकरी उपस्थित होते.

(बॉक्स)

अशी झाली घटना

मृतांचे कुटुंबीय शेतीसोबत मत्स्यव्यवसाय करतात. त्यांच्या शेतात मत्स्यतलाव आहे. त्या तलावातून रात्री माशांची चोरी होऊ नये म्हणून विद्युत बल्ब लावण्यासाठी मृत राजू विस्वास शेतात गेला होता. परंतु, तो घरी परत आला नाही. फोन लावला असता तो फोनही उचलत नव्हता. त्यामुळे आजी कमला शेजारच्या वीरकुमार या मुलाला घेऊन शेतात गेली. तिथे राजू बेशुद्ध होऊन पडलेला दिसला. त्याला काय झाले म्हणून पाहण्यासाठी हात लावला असता कमला व वीरकुमार यांनाही विजेचा धक्का लागला आणि ते तिथेच पडले.

(बॉक्स)

थोडक्यात बचावली वासंती

शेतावर गेलेले कोणीही घरी परत न आल्याने वासंती सुभाष विस्वास ही शेतावर पाहण्यासाठी गेली. तिथे सर्वजण निपचित पडून होते. वासंती हिनेसुद्धा मृतांना हात लावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला विजेचा हलका धक्का बसला आणि ती लगेच मागे हटली. तिने झालेल्या प्रकाराची माहिती गावातील लोकांना दिली. गावकऱ्यांनी वीज प्रवाह बंद करून तिन्ही मृतांना घरी आणले आणि नंतर शवविच्छेदनाकरिता आष्टी रुग्णालयात दाखल केले.