शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

रामय्यापेठाची रेणुका बनणार कर सहायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:57 IST

आलापल्लीपासून सहा किमी अंतरावर असलेल्या रामय्यापेठा येथील रेणुका राजाराम निकुरे या विद्यार्थिनीने गरीब परिस्थितीवर मात करीत कर सहायक वर्ग-३ पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. ती महाराष्ट्रातून ओबीसी प्रवर्गातून १७ वी आली आहे. तिचे हे यश जिल्ह्यातील इतर युवकांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.

ठळक मुद्देओबीसी प्रवर्गातून राज्यातून १७ वी : गरिबीचा सामना करून मिळविले यश

प्रशांत ठेपाले।लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : आलापल्लीपासून सहा किमी अंतरावर असलेल्या रामय्यापेठा येथील रेणुका राजाराम निकुरे या विद्यार्थिनीने गरीब परिस्थितीवर मात करीत कर सहायक वर्ग-३ पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. ती महाराष्ट्रातून ओबीसी प्रवर्गातून १७ वी आली आहे. तिचे हे यश जिल्ह्यातील इतर युवकांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.रेणुकाचे प्राथमिक शिक्षण गावातच रामय्यापेठा येथे पूर्ण झाले. पाचवी ते दहावीपर्यंत ती राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली येथे शिकली. रेणुकाची हुशारी, परिश्रम करण्याची जिद्द ओळखून राणी दुर्गावती विद्यालयाचे प्राचार्य गजानन लोनबले व वनवैभव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अब्दुल जमीर हकीम यांनी तिला पदवीच्या शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला. मात्र घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने पदवीचे शिक्षण व स्पर्धा परीक्षेची तयारी या गोष्टी न झेपणाऱ्या होत्या. त्यामुळे रेणुकाच्या आईवडिलांनी तिला पुढील शिक्षण देण्यास नकार दिला. मात्र तिच्या पुढील शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी प्राचार्य लोनबले व अब्दुल हकीम यांनी उचलण्याचे आश्वासन दिले.पदवीच्या शिक्षणासाठी तिला वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयात पाठविण्यात आले. तिच्या राहण्याची सोय प्राचार्य लोनबले यांनी स्वत:च्या घरी केली. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तिला जळगाव येथे पाठविण्यात आले. जळगाव येथील दीपस्तंभ फाऊंडेशनचे प्रा.येजुवेंद्र महाजन यांनी मदत केली. जळगाव येथे रेणुकाने स्पर्धा परीक्षेची जिद्दीने तयारी केली. त्यात तिला यश मिळाले असून तिने कर सहायकाची परीक्षा उत्तीर्ण केली. रेणुकाचे वडील शेतकरी असून आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करीत रेणुकाने यश संपादन केले. तिचे हे यश स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.स्पर्धा परीक्षेसाठी जिद्द महत्त्वाची - रेणुकास्पर्धा परीक्षेची तयारी करताना गरीब विद्यार्थ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गरीबी व अभ्यास या दोन बाबींशी त्याला संघर्ष करावा लागतो. मात्र यावर मात करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला एमपीएससीच्या परीक्षेत यश प्राप्त होते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकाऱ्याची नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया रेणुका निकुरे हिने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.