शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रामय्यापेठाची रेणुका बनणार कर सहायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:57 IST

आलापल्लीपासून सहा किमी अंतरावर असलेल्या रामय्यापेठा येथील रेणुका राजाराम निकुरे या विद्यार्थिनीने गरीब परिस्थितीवर मात करीत कर सहायक वर्ग-३ पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. ती महाराष्ट्रातून ओबीसी प्रवर्गातून १७ वी आली आहे. तिचे हे यश जिल्ह्यातील इतर युवकांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.

ठळक मुद्देओबीसी प्रवर्गातून राज्यातून १७ वी : गरिबीचा सामना करून मिळविले यश

प्रशांत ठेपाले।लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : आलापल्लीपासून सहा किमी अंतरावर असलेल्या रामय्यापेठा येथील रेणुका राजाराम निकुरे या विद्यार्थिनीने गरीब परिस्थितीवर मात करीत कर सहायक वर्ग-३ पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. ती महाराष्ट्रातून ओबीसी प्रवर्गातून १७ वी आली आहे. तिचे हे यश जिल्ह्यातील इतर युवकांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.रेणुकाचे प्राथमिक शिक्षण गावातच रामय्यापेठा येथे पूर्ण झाले. पाचवी ते दहावीपर्यंत ती राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली येथे शिकली. रेणुकाची हुशारी, परिश्रम करण्याची जिद्द ओळखून राणी दुर्गावती विद्यालयाचे प्राचार्य गजानन लोनबले व वनवैभव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अब्दुल जमीर हकीम यांनी तिला पदवीच्या शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला. मात्र घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने पदवीचे शिक्षण व स्पर्धा परीक्षेची तयारी या गोष्टी न झेपणाऱ्या होत्या. त्यामुळे रेणुकाच्या आईवडिलांनी तिला पुढील शिक्षण देण्यास नकार दिला. मात्र तिच्या पुढील शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी प्राचार्य लोनबले व अब्दुल हकीम यांनी उचलण्याचे आश्वासन दिले.पदवीच्या शिक्षणासाठी तिला वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयात पाठविण्यात आले. तिच्या राहण्याची सोय प्राचार्य लोनबले यांनी स्वत:च्या घरी केली. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तिला जळगाव येथे पाठविण्यात आले. जळगाव येथील दीपस्तंभ फाऊंडेशनचे प्रा.येजुवेंद्र महाजन यांनी मदत केली. जळगाव येथे रेणुकाने स्पर्धा परीक्षेची जिद्दीने तयारी केली. त्यात तिला यश मिळाले असून तिने कर सहायकाची परीक्षा उत्तीर्ण केली. रेणुकाचे वडील शेतकरी असून आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करीत रेणुकाने यश संपादन केले. तिचे हे यश स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.स्पर्धा परीक्षेसाठी जिद्द महत्त्वाची - रेणुकास्पर्धा परीक्षेची तयारी करताना गरीब विद्यार्थ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गरीबी व अभ्यास या दोन बाबींशी त्याला संघर्ष करावा लागतो. मात्र यावर मात करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला एमपीएससीच्या परीक्षेत यश प्राप्त होते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकाऱ्याची नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया रेणुका निकुरे हिने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.