शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: September 3, 2014 23:23 IST

गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, सर्वांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे, आदींसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा तालुका देसाईगंजच्यावतीने बुधवारी येथील

देसाईगंज : गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, सर्वांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे, आदींसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा तालुका देसाईगंजच्यावतीने बुधवारी येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व डॉ. महेश कोपुलवार यांनी केले. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, रोजगाराची हमी देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांना पाठविण्यात आले आहे. या आंदोलनात जि. प. सदस्य अमोल मारकवार, हिरालाल येरमे, देवराव चवळे, विनोद झोडगे, जगदीश मेश्राम, चंद्रभान मेश्राम, पंढरी दोनाडकर, परसराम आदे, निर्मला कवासे, सुमन बोधनकर, तुलाराम नेवारे, पंढरी मेश्राम आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. महेश कोपुलवार यांनी गडचिरोली जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे सावट असल्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. राज्य शासनाने केवळ दोनच तालुक्यात टंचाई घोषित केली आहे. हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर घोर अन्याय आहे. सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ रोख स्वरूपात आर्थिक मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी यावेळी केली. आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)