शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

राकाँचा भाजपसोबत घरोबा कायमच

By admin | Updated: August 11, 2014 23:55 IST

२०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला जनादेश मिळाला. मात्र काँग्रेसचा राज्यातील मित्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी करीत जिल्हा

गडचिरोली : २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला जनादेश मिळाला. मात्र काँग्रेसचा राज्यातील मित्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी करीत जिल्हा परिषदेची सत्ता आपल्या ताब्यात ठेवली व काँग्रेसला सत्तेबाहेर केले. विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतरही भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा परिषदेतील सत्तेचा मधुचंद्र अद्याप समाप्त झालेला नाही. गेल्या महिन्यात नागपूर विभागातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमक्ष या मुद्यावर अनेक मंत्री व नेत्यांनी ही बाब उपस्थित केली होती. व राकाँने भाजपसोबतची युती तोडावी, अशी मागणी केलली होती. गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १० सदस्य आहेत. या १० सदस्यांच्या भरवशावर भाजपशी हातमिळवणी करीत २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जि.प.चे अध्यक्षपद भाग्यश्री आत्राम यांच्या रूपाने पटकावले. तर भाजपचे डॉ. तामदेव दुधबळे हे उपाध्यक्ष झालेत. तर भाजप नेत्यांचे वर्चस्व असलेल्या युवाशक्ती आघाडीने दोन सभापती पद आपल्याकडे ठेवले. तर राकाँला व भाजपला एक-एक सभापती पद देण्यात आले. राज्यभरापासून जिल्हाभरापर्यंतचे राकाँचे नेते बेंबीच्या देठापासून जातीयवादी शक्तीचा विरोध करण्याचे आवाहन जनतेला करीत असताना गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती या जिल्हा परिषदांमध्ये मात्र भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा मधुचंद्र सुरूच आहे. तो अद्यापही समाप्त झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते आपल्या मित्रपक्षावर नाराज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेतील राकाँच्या भाजपसोबत असलेल्या युतीमुळेच आघाडीच्या उमेदवाराला फटका बसला. हे कुठले धर्मनिरपेक्षवादी असा प्रश्न मतदारांनी उपस्थित केल्यावर त्याचे उत्तर राकाँ व काँग्रेस नेत्यांजवळ नव्हते, असा सूर काँग्रेसने लावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जातानाही हा प्रश्न कायमच राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तत्व आणि निष्ठांचे राजकारण करताना पहिले जिल्हा परिषदेतील सत्ता सोडावी त्यानंतरच निवडणुकीला समोर जावे, असा सूर राकाँच्याही गोट्यात उमटला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसही जिल्ह्यात एकसंघ राहिली नसून जिल्हा परिषदेतील राकाँमध्ये विभाजन झाले आहे. जि.प. व नगर परिषदांमध्ये राकाँत जोरदार गटबाजी आहे.