शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
4
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
5
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
7
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
8
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
9
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
10
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
11
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
12
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
13
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
14
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
15
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
16
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
17
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
18
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
19
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
20
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
Daily Top 2Weekly Top 5

राकाँचा भाजपसोबत घरोबा कायमच

By admin | Updated: August 11, 2014 23:55 IST

२०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला जनादेश मिळाला. मात्र काँग्रेसचा राज्यातील मित्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी करीत जिल्हा

गडचिरोली : २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला जनादेश मिळाला. मात्र काँग्रेसचा राज्यातील मित्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी करीत जिल्हा परिषदेची सत्ता आपल्या ताब्यात ठेवली व काँग्रेसला सत्तेबाहेर केले. विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतरही भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा परिषदेतील सत्तेचा मधुचंद्र अद्याप समाप्त झालेला नाही. गेल्या महिन्यात नागपूर विभागातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमक्ष या मुद्यावर अनेक मंत्री व नेत्यांनी ही बाब उपस्थित केली होती. व राकाँने भाजपसोबतची युती तोडावी, अशी मागणी केलली होती. गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १० सदस्य आहेत. या १० सदस्यांच्या भरवशावर भाजपशी हातमिळवणी करीत २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जि.प.चे अध्यक्षपद भाग्यश्री आत्राम यांच्या रूपाने पटकावले. तर भाजपचे डॉ. तामदेव दुधबळे हे उपाध्यक्ष झालेत. तर भाजप नेत्यांचे वर्चस्व असलेल्या युवाशक्ती आघाडीने दोन सभापती पद आपल्याकडे ठेवले. तर राकाँला व भाजपला एक-एक सभापती पद देण्यात आले. राज्यभरापासून जिल्हाभरापर्यंतचे राकाँचे नेते बेंबीच्या देठापासून जातीयवादी शक्तीचा विरोध करण्याचे आवाहन जनतेला करीत असताना गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती या जिल्हा परिषदांमध्ये मात्र भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा मधुचंद्र सुरूच आहे. तो अद्यापही समाप्त झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते आपल्या मित्रपक्षावर नाराज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेतील राकाँच्या भाजपसोबत असलेल्या युतीमुळेच आघाडीच्या उमेदवाराला फटका बसला. हे कुठले धर्मनिरपेक्षवादी असा प्रश्न मतदारांनी उपस्थित केल्यावर त्याचे उत्तर राकाँ व काँग्रेस नेत्यांजवळ नव्हते, असा सूर काँग्रेसने लावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जातानाही हा प्रश्न कायमच राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तत्व आणि निष्ठांचे राजकारण करताना पहिले जिल्हा परिषदेतील सत्ता सोडावी त्यानंतरच निवडणुकीला समोर जावे, असा सूर राकाँच्याही गोट्यात उमटला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसही जिल्ह्यात एकसंघ राहिली नसून जिल्हा परिषदेतील राकाँमध्ये विभाजन झाले आहे. जि.प. व नगर परिषदांमध्ये राकाँत जोरदार गटबाजी आहे.