शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पाऊले चालती राजनांदगावची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

ब्रम्हपुरी येथे बोअरवेलच्या कामावर गेलेले सहा तरुण गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास विसोरा-शंकरपूर मार्गे छत्तीसगढ राज्यातील राजनांदगांव जिल्ह्यात आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पायदळ प्रवासाला निघाले आहेत. ब्रह्मपुरी ते राजनांदगांव अशा तब्बल १७० किलोमीटर अंतराच्या पायी प्रवासाकरिता पहाटेच ब्रह्मपुरी नगर सोडल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देमजुरांची घरवापसी : शेकडो किमीचा पायी प्रवास; ब्रह्मपुरीकडून राजनांदगावकडे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : घर सोडून आपण कुठेही बाहेर राहायला गेलो तरी घराची ओढ आपणास शांत बसू देत नाही. त्यात सध्याच्या कोरोनामय वातावरणात कडक संचारबंदी, राज्य आणि जिल्हा सीमा बंदी असताना स्थलांतरित मजुरांना मात्र घराकडे जाण्याचा मोह आवरता येईना अशी अवस्था झाल्याचे दिसून येते आहे. ब्रम्हपुरी येथे बोअरवेलच्या कामावर गेलेले सहा तरुण गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास विसोरा-शंकरपूर मार्गे छत्तीसगढ राज्यातील राजनांदगांव जिल्ह्यात आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पायदळ प्रवासाला निघाले आहेत.ब्रह्मपुरी ते राजनांदगांव अशा तब्बल १७० किलोमीटर अंतराच्या पायी प्रवासाकरिता पहाटेच ब्रह्मपुरी नगर सोडल्याचे त्यांनी सांगितले. परंतु ब्रह्मपुरी ते देसाईगंज या आंतरजिल्हा रस्त्यावरच्या वैनगंगा नदीवरील पुलावर पोलीस चौकी असताना तुम्ही कसे काय आले, असा प्रश्न केला असता. आम्हाला कुणीच अडवला नसल्याचे ते बोलले. राजनांदगांवकडे पायदळ जाणाऱ्या चार तरुणांच्या पाठीवर एक-एक बॅग आणि दोघांच्या हातात कापडी पिशवी होती. एकाने तोंडावर मास्क तर एकाने रुमाल बांधली. पिण्याच्या पाण्याशिवाय खाण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नव्हते. संचारबंदी वाढल्याने बसेसची व्यवस्था नाही. हे लक्षात आल्यावर त्यांनी पायदळ प्रवास सुरू केला.जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांचे गावातच विलगिकरणनागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चणा काढणी, धानकापणी, मिरची तोडणी या कामासाठी शंकरपूर, कसारी येथील महिला, पुरुष गेले होते. हे सर्व मजूर आता घरी परतले असून त्यांना गावातील जिल्हा परिषद शाळा वा अन्य ठिकाणी विलगिकरणात ठेवले आहे. कोरोना विषाणूची लागण होण्याच्या भीतीपोटी बाहेरगावी कामावर गेलेले गावातील नागरिक आता घरी वापस येत असले तरी कुटुंबातील सदस्यही त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत. गावातील दक्षता समिती बाहेरगावाहून गावांत येणाºया प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवून आहे. गावात येताच त्यांना विलग केल्या जात आहे.

टॅग्स :Labourकामगार