शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

ठाणेगावात वीज केंद्र उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:25 IST

तालुक्यातील ठाणेगाव सर्कलवरून एकूण ४२ गावांचा वीज पुरवठा केला जात असल्याने विजेचा दाब अपुरा पडत असून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.

ठळक मुद्देअधीक्षक अभियंत्यांशी चर्चा : कमी दाबाचा वीज पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील ठाणेगाव सर्कलवरून एकूण ४२ गावांचा वीज पुरवठा केला जात असल्याने विजेचा दाब अपुरा पडत असून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे ठाणेगाव येथे ३३ के व्हीचे वीज उपकेंद्र तयार करण्यात यावे अशी मागणी भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री गोपाल भांडेकर यांनी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के यांच्याकडे केली आहे.ठाणेगाव सर्कल आरमोरी तालुक्यातील सर्वाधिक वीज वापर असलेला सर्कल आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृषीपंप, साईसमील, आटाचक्की व घरगुती वीज ग्राहक आहेत. ठाणेगाव येथे रेल्वेस्थानक होत असल्याने या परिसरात उद्योगांची आणखी भर पडण्याची शक्तता आहे. त्यामुळे ठाणेगाव येथे वीजकेंद्र उभारण्यात यावे. ठाणेगावातील वीजकेंद्राचा लाभ आरमोरी व वैरागड सर्कललाही होऊ शकतो. त्यामुळे ठाणेगावातील वीज केद्र उपयोगी ठरणारे आहे. याबाबत अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के यांनी याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी रवी भांडेकर, धूरंदर सातपुते, दिपक बैस आदी मान्यवर उपस्थित होते.