शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

संततधारेमुळे पावसाळी वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:30 IST

जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून सुरू झालेला रिमझिम पाऊस रात्रीपर्यंत थांबलेला नव्हता. भामरागडसह इतर काही भागात तर दमदार पाऊस झाला. संततधार पावसामुळे दिवसभर पावसाळी वातावरण होते. यामुळे तापमानात कमालीची घट होऊन सर्वत्र गारवा पसरला आहे. पावसाने धानासह कापूस आणि तुरीचेही नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देगारव्याने जिल्हा गारठला : खरेदी केंद्रांवरील धानासह कापूस, तूर पिकाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून सुरू झालेला रिमझिम पाऊस रात्रीपर्यंत थांबलेला नव्हता. भामरागडसह इतर काही भागात तर दमदार पाऊस झाला. संततधार पावसामुळे दिवसभर पावसाळी वातावरण होते. यामुळे तापमानात कमालीची घट होऊन सर्वत्र गारवा पसरला आहे. पावसाने धानासह कापूस आणि तुरीचेही नुकसान झाले आहे.मागील आठ दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. मागील आठवड्यात अशाच अवकाळी पावसाने हजेरी अचानक हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने उसंत घेतली. मात्र पुन्हा रविवारी रात्री पावसाच्या हलक्या सरी आल्या. सोमवारी सकाळपासून मात्र पावसाने अधिकच जोर धरला.आॅक्टोबर महिन्यापासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे छत्र्या, रेनकोट अडगळीत पडले होते. पण सोमवारच्या पावसाने पुन्हा पावसाळी साधने बाहेर निघाली. ज्या शेतकऱ्यांचे धानाचे चुरणे झाले, अशा शेतकºयांनी खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी आणला होता. खरेदी केंद्रांवर शेकडो पोत्यांची थप्पी लागली आहे. त्या धानावर ताडपत्र्या झाकल्या असल्या तरी ताडपत्र्या अपुºया पडत असल्यामुळे सदर धान भिजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतात लावून ठेवलेले धानाचे पुंजनेही पावसात सापडले आहेत. ताडपत्री झाकून पावसापासून धानाचा बचाव करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. अगोदरच थंडीचे दिवस, त्यात पाऊस सुरू झाल्याने तापमानात कमालीची घट झाली आहे. शित वाऱ्यांमुळे सोमवारी दिवसभर लोकांना गरम कपड्यांचा आसरा घ्यावा लागला.पुढील दोन दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर अतिथंडीमुळे नागरिकांच्या प्रकृतीवरही परिणाम होणार आहे.दिवसभर विजेचा लपंडावपावसाला सुरूवात झाल्यापासूनच गडचिरोली शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला. सोमवारी दिवसभर व रात्री उशीरापर्यंत विजेचा लपंडाव सुरूच होता. वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होत असल्याने गडचिरोलीतील सामान्य नागरिक, व्यावसायिक व शासकीय कार्यालयातील कर्मचारी त्रस्त होते. दुर्गम भागातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता.एटापल्लीतील विज्ञान प्रदर्शनीला फटकाजिल्हा परिषद हायस्कूल येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. बाहेर पेंडॉल टाकण्यात आला होता. मात्र रविवारी रात्री व सोमवारी दिवसभर वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. त्यामुळे बांधलेला कापडी पेंडॉल कोसळला.कापणी झालेल्या धानाची नासाडीजोपर्यंत धानाचा काटा होत नाही, तोपर्यंत सदर शेतमालाची जबाबदारी शेतकऱ्यांची राहते. पावसामुळे धान भिजल्यास शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. ज्या धानाचा काटा झाला तो धान मात्र आदिवासी विकास विभागाचा असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. अवकाळी पावसामुळे हजारो क्विंटल धान भिजला आहे. शेतकरी व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने ताडपत्री झाकून पावसापासून धानाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हा प्रयत्न अपुरा पडत आहे. शेकडो पोते झाकण्यासाठी तेवढ्या ताडपत्री आणायच्या कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.कापसासह भाजीपाल्याचेही नुकसानचामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा व काही भागातील गडचिरोली तालुक्यात कापसाचे उत्पादन घेतले जाते. कापसाचा पहिला तोडा आटोपला. दुसऱ्या तोड्याचे काम सुरू होते. अशातच पावसाने हजेरी लावली. पावसामुळे कापूस भिजला आहे. जो कापूस जमिनीवर पडला, त्याला माती लागत असल्याने सदर कापूस खराब होतो. या कापसाला अत्यंत कमी भाव मिळतो. परिणामी शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो.ढगाळ वातावरणामुळे मागील आठ दिवसांपासून पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धुके पडत आहेत. धुक्यांमुळे पिकांचे फूल झडते. तसेच पिकांवर चिकटपणा निर्माण होतो. यामुळे झाडांची वाढ खुंटते. एकंदरीतच तूर, पोपट, हरभरा, ज्वारी, मिरची व इतर भाजीपाला पिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.