शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

पावसाने फिरविली पाठ, धानपीक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:37 IST

मध्यंतरी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी धानाची राेवणी आटाेपली. तरीही १० टक्के राेवणीची कामे शिल्लक आहेत. पाणीच नसल्याने राेवण्या थांबल्या आहेत. ...

मध्यंतरी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी धानाची राेवणी आटाेपली. तरीही १० टक्के राेवणीची कामे शिल्लक आहेत. पाणीच नसल्याने राेवण्या थांबल्या आहेत. राेवणीचा कालावधी निघून गेला आहे. त्यामुळे यानंतर जरी पाऊस आला तरी धान राेवणी न करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे ही शेतजमीन आता पडीकच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ज्या शेतकऱ्यांची राेवणी आटाेपली ती आता पावसाअभावी करपण्यास सुरुवात झाली आहे. राेवण्याबराेबरच रासायनिक खत टाकले जाते. त्यामुळे धानाला सतत पाण्याची गरज भासते. मात्र मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दुसरीकडे दिवसा कडक ऊन पडत असल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा धान पीक माना टाकत आहे. पीक करपल्यास काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर निर्माण झाला आहे.

बाॅक्स

तलावांमध्ये २५ टक्केच पाणीसाठा

यावर्षीच्या पावसात माेठा पाऊस झालाच नाही. जेमतेम राेवणी राेवण्याएवढाच पाऊस झाला. त्यामुळे जलासाठे केवळ २५ टक्केच भरले आहेत. पावसाने दडी मारल्याने त्यातील पाण्याचा वापर सुरू झाला आहे. मात्र हा जलसाठा केवळ आठ ते दहाच दिवस टिकण्याची शक्यता आहे. हा जलसाठा संपल्यास पुढे पीक कसे वाचवायचे, असा प्रश्न आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही, अशा शेतकऱ्यांना तर पीक करपताना बघितल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.

बाॅक्स

सरासरीच्या ८० टक्के पाऊस

१ जून ते १४ ऑगस्ट या अडीच महिन्यात सरासरी ८३१.४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र प्रत्यक्षात केवळ ६६६.७ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ८०.२ टक्के एवढे आहे. सिराेंचा तालुका वगळता सर्वच तालुक्यांमध्ये अपेक्षित पावसाच्या कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. उकाड्यात वाढ झाली असल्याने सामान्य नागरिकही त्रस्त झाले आहेत.

बाॅक्स

पिकाखालील क्षेत्र हेक्टरमध्ये

पीक क्षेत्र

धान - १,६८,४२०

मका - २७२

तूर - ६,१८५

साेयाबीन- २५७

कापूस - १२,१९२

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

काेट

सिंचनाची सुविधा नाही. काय करावे. धान पीक आता करपायला लागले आहे. आता आमचे डाेळे आभाळाकडे लागले आहेत. विहिरीसाठी मागील तीन वर्षांपासून अर्ज केला आहे. मात्र विहीर मंजूर झाली नाही. काय करणार. शेती बेभरवशाचा राेजगार झाला आहे.

- अतुल बावणे, शेतकरी

काेट

मागील वर्षी पुराने हाेते नव्हते नष्ट केले. त्यामुळे यावर्षी तरी पीक हाेईल अशी अपेक्षा हाेती. मात्र अगदी सुरुवातीलाच पावसाने झटके देण्यास सुरुवात केली आहे. पुढे काय हाेणार हे अनिश्चित आहे. शेती करण्यापेक्षा नियमित मजुरी केलेली बरी त्यामुळे आपण शेतीकडे फारसे लक्ष न देता मजुरी करताे.

गणेश मडावी, शेतकरी