शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

पावसाने पुन्हा झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:12 IST

२७ जुलैपासून २ आॅगस्टपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस बरसला. सदर कालावधीत पावसाने मुळीच विश्रांती घेतली नाही. दरम्यान आकाश मोकळे झाल्याने रविवारी पाऊस बरसला नाही. मात्र सोमवारी नागपंचमीच्या दिवशी पुन्हा गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार सरी बरसल्या. या पावसाने गडचिरोली व आरमोरी शहरातील सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेत तारांबळ : सखल भागातील वस्त्यांमध्ये साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २७ जुलैपासून २ आॅगस्टपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस बरसला. सदर कालावधीत पावसाने मुळीच विश्रांती घेतली नाही. दरम्यान आकाश मोकळे झाल्याने रविवारी पाऊस बरसला नाही. मात्र सोमवारी नागपंचमीच्या दिवशी पुन्हा गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार सरी बरसल्या. या पावसाने गडचिरोली व आरमोरी शहरातील सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे.गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६.८ मिमी पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे. दुपारी ३ वाजतानंतर अचानक आकाशात ढग दाटून आले. त्यानंतर काही वेळातच गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह अहेरी उपविभागात मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे बाजारपेठेते विविध साहित्य खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. भामरागड व आष्टी येथील नदी पुलावरील पूर सायंकाळच्या सुमारास ओसरला होता. त्यानंतर भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरून वाहतूक सुरू झाली. आष्टी येथील वैनगंगा नदीचा पूर ओसरल्याने चंद्रपूर-आष्टी मार्गावरील वाहतूक पूर्वत सुरू झाली. मात्र सोमवारी पुन्हा पाऊस बरसल्याने पुलावर पाणी साचले. गेल्या आठ-दहा दिवसांपासून संततधार पाऊस होत असल्याने अनेक शेतजमिनी पाण्याखाली आल्या आहेत. परिणामी अशा शेतातील धानपीक रोवणीचे काम थांबले आहेत. रविवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र पुन्हा सोमवारी पाऊस झाल्यामुळे रोवणी लांबणीवर पडण्याच्या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले.