शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

पावसाने पुन्हा झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:12 IST

२७ जुलैपासून २ आॅगस्टपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस बरसला. सदर कालावधीत पावसाने मुळीच विश्रांती घेतली नाही. दरम्यान आकाश मोकळे झाल्याने रविवारी पाऊस बरसला नाही. मात्र सोमवारी नागपंचमीच्या दिवशी पुन्हा गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार सरी बरसल्या. या पावसाने गडचिरोली व आरमोरी शहरातील सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेत तारांबळ : सखल भागातील वस्त्यांमध्ये साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २७ जुलैपासून २ आॅगस्टपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस बरसला. सदर कालावधीत पावसाने मुळीच विश्रांती घेतली नाही. दरम्यान आकाश मोकळे झाल्याने रविवारी पाऊस बरसला नाही. मात्र सोमवारी नागपंचमीच्या दिवशी पुन्हा गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार सरी बरसल्या. या पावसाने गडचिरोली व आरमोरी शहरातील सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे.गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६.८ मिमी पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे. दुपारी ३ वाजतानंतर अचानक आकाशात ढग दाटून आले. त्यानंतर काही वेळातच गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह अहेरी उपविभागात मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे बाजारपेठेते विविध साहित्य खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. भामरागड व आष्टी येथील नदी पुलावरील पूर सायंकाळच्या सुमारास ओसरला होता. त्यानंतर भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरून वाहतूक सुरू झाली. आष्टी येथील वैनगंगा नदीचा पूर ओसरल्याने चंद्रपूर-आष्टी मार्गावरील वाहतूक पूर्वत सुरू झाली. मात्र सोमवारी पुन्हा पाऊस बरसल्याने पुलावर पाणी साचले. गेल्या आठ-दहा दिवसांपासून संततधार पाऊस होत असल्याने अनेक शेतजमिनी पाण्याखाली आल्या आहेत. परिणामी अशा शेतातील धानपीक रोवणीचे काम थांबले आहेत. रविवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र पुन्हा सोमवारी पाऊस झाल्यामुळे रोवणी लांबणीवर पडण्याच्या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले.