शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

पावसाचा तडाखा

By admin | Updated: July 13, 2016 02:13 IST

मागील पाच दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गडचिरोली : मागील पाच दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोली तालुक्यात मंगळवारच्या रात्री सुमारे २४० मीमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. रात्री १२ वाजेपासून सकाळी ९ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत होता. गडचिरोली शहराच्या सखल भागात पाणी साचल्याने या भागांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंगळवारी पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्याने गडचिरोली शहरातील अनेक शाळांना सुट्या देण्यात आल्या. शहरात १० पेक्षा अधिक घरांची पडझड झाली. मार्गांवर पाणी साचल्याने नागरिकांना कंबरभर पाण्यातून मार्ग काढावा लागला. दुपारी ९ नंतर मात्र पावसाने उसंत घेतली. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले. लहान नाल्यांमुळे चामोर्शी जलमय चामोर्शी-गडचिरोली मुख्य मार्गावरील शिवाजी शाळेजवळील रस्त्यावरून पाणी वाहत राहते. शिवाजी हायस्कूल व यशोधरा विद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर दोन ते तीन फूट पाणी जमा होते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना या मार्गाने जाताना अडचण निर्माण होते. या दोन्ही शाळेच्या मागच्या बाजूस गोंडाई तलाव आहे. या तलावाचे पाणी निघत असल्याने परिसरात पाणी साचून राहते. या ठिकाणी पुलाची उंची वाढवून पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचा आकार मोठा केल्यास ही समस्या दूर होईल. शालेय परिसरात व रस्त्यावर पाणी साचणार नाही. त्यामुळे नगर पंचायतीने नाल्यांचा आकार वाढवून उंच पूल बांधावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी केली आहे.