शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

पावसाने उपबाजार समितीच्या यंत्रणेची उडाली तारांबळ

By admin | Updated: June 12, 2017 01:07 IST

१० जून रोजी शनिवारला दुपारच्या सुमारास अचानक झालेल्या वादळी पावसामुळे देसाईगंज येथील उपबाजार परिसरात उघड्यावर ठेवण्यात आलेले धान भिजले.

देसाईगंजातील प्रकार : शेतकऱ्यांना कमी भावात विकावे लागले धानलोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : १० जून रोजी शनिवारला दुपारच्या सुमारास अचानक झालेल्या वादळी पावसामुळे देसाईगंज येथील उपबाजार परिसरात उघड्यावर ठेवण्यात आलेले धान भिजले. परिणामी शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाजार समितीची संपूर्ण यंत्रणा प्रभावित होऊन शेतकऱ्यांचे थोडेफार नुकसान झाले. लिलाव प्रक्रियेतून कोरड्या धानाला मिळालेल्या भावापेक्षा थोड्या कमी भावाने व्यापारी वर्गाने सुकविलेले हे धान खरेदी केले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.स्थानिक कृषी उत्पन्न उपबाजार समितीत एकूण १६ अडते असून ३ हजार १८५ क्विंटल, २५ किलो धान उपबाजार समितीत विक्रीसाठी आणले. दुपारी २ वाजताच्या सुमारास लिलाव प्रक्रिया सुरू झाल्यावर धानाला प्रती क्विंटल १३०० रूपये भाव मिळाला. त्यानंतर झालेल्या वादळी पावसाने कृषी बाजार समितीच्या यंत्रणेची तारांबळ उडाली. अडत्यांनी आटोकात प्रयत्न करून जितके धान पाण्यापासून वाचविता येईल, तेवढे प्रयत्न केले. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांचे धान पावसाने ओला झाला आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीतही व्यापारी (खरेदीदार) वर्गाने शेतकऱ्यांच्या ओल्या झालेल्या धानाला प्रती क्विंटल पाच ते दहा रूपये भाव कमी देऊन हे धान खरेदी केले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वादळी पावसाचा मात्र शेतकऱ्यांनाच फटका बसला आहे.मागील वर्षापासून एनएसीटी अंतर्गत अडीच कोटी रूपये खर्च करून इमारतीसह विविध सोयीसुविधा उपबाजार परिसरात निर्माण केल्या जात आहेत. यात शेतकऱ्यांना धान लिलाव प्रक्रियेत ठेवण्यासाठी काँक्रीटीकरण तसेच शेतकरी भवन आदी कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. परंतु काँक्रीटीकरण जमीन पातळीवरूच करण्यात आले. तसेच नाली उथळ बांधल्या गेली असल्याने संपूर्ण पाणी परिसरात पसरले. काही अडत्यांनी मालाच्या सुरक्षिततेसाठी शेड निर्मिती केली आहे. तर काही अडत्यांनी मिळालेल्या शेडसमोर अतिरिक्त शेड बांधले तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. पावसाळ्यातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी उपबाजार समितीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.