शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

पावसाची दडी, पंपाद्वारे शेतीला पाणी

By admin | Updated: August 1, 2016 01:22 IST

७ ते १३ जुलैदरम्यान देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात संततधार पाऊस बरसला. त्यामुळे जिल्हाभरातील नदी, नाले, तलाव, बोड्या पाण्याने भरल्या.

रोवणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ : चढ भागातील शेतजमीन पडल्या कोरड्या विसोरा : ७ ते १३ जुलैदरम्यान देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात संततधार पाऊस बरसला. त्यामुळे जिल्हाभरातील नदी, नाले, तलाव, बोड्या पाण्याने भरल्या. तसेच शेतातही पाणी जमा झाले. मात्र त्यानंतर १५ दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे चढ भाग असलेल्या शेतजमिनी कोरड्या पडल्या असून या शेतजमिनीती धानपिकाची रोवणी करण्यासाठी अनेक शेतकरी पंपाद्वारे शेतीला पाणी पुवठा करीत आहेत. धान पिकाच्या रोवणीसाठी पऱ्ह्यांना पाणी आवश्यक आहे. तसेच रोवणीची चिखलणी करण्यासाठी भरपूर पावसाची आवश्यकता असते. मात्र चढ भागातील शेतजमिनीतील पाणी आटल्यामुळे अनेक शेतकरी शेतीला पाणी पुरवठा करण्याची धावपळ करीत आहेत. देसाईगंज तालुक्याच्या शंकरपूर, चोप परिसरातील चढ भागातील शेतकरी रस्त्यालगतच्या खड्ड्यातील पाणी पंपाद्वारे डांबरी रस्त्यावर पाईप लांबवून शेतजमिनीपर्यंत पोहोचवित असल्याचे दिसून येत आहे. यंदा पावसाचे उशीरा आगमन झाल्याने धान पिकाची पेरणी उशीरा झाली. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यांच्या शेतातील धानाचे पऱ्हे अतिवृष्टीमुळे कुजले. परिणमी चिखल करून धानवाफे टाकण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४७ टक्के रोवणीचे कामे आटोपली असून एकूण भात लागवड क्षेत्रापैकी ३७ हजार १९८ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची रोवणी करण्यात आली आहे. अद्यापही धान पिकाच्या रोवणीचे ५० टक्के काम शिल्लक आहे. (वार्ताहर) मुसळधार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा १३ जुलैनंतर गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला नाही. दररोज वा अधूनमधून हलकासा पाऊस होत आहे. मात्र या पावसाने शेतजमिनीत पाणी साचत नाही. हलक्याशा पावसाचे पाणी रात्रभरात आटून जाते. रोवणीसाठी भरपूर पावसाची गरज असल्याने मुसळधार पाऊस होणे आवश्यक आहे. शनिवारी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाने घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात जिल्हाभरात ५.० मिमी पाऊस झाला व आतापर्यंत एकूण ८३६.२ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या १५ दिवसापासून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.