शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

पर्जन्य जलसंवर्धन कागदावरच

By admin | Updated: June 14, 2014 02:19 IST

नवीन बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक शासकीय इमारतीला पर्जन्य संवर्धनाची सुविधा

गडचिरोली : नवीन बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक शासकीय इमारतीला पर्जन्य संवर्धनाची सुविधा (रेन वॉटर हार्वेस्टिंग) असणे आवश्यक असतांनाही जिल्ह्यातील एकाही इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपूर्ण भारतात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो. या कालावधीत नदी, नाले ओसंडून वाहतात. मात्र सदर पाणी साठवून त्याचा भविष्यात वापर करण्याची कोणतीही योजना नसल्याने पावसाचे कोट्यवधी लिटर पाणी समुद्राला जाऊन मिळते. त्याचबरोबर या कालावधीत पूरपरिस्थिती निर्माण होऊन जीवित व आर्थिक हानीही होते. उन्हाळ्यात मात्र तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. माठभर पाण्यासाठी मैल-दोन मैल पायपीट करावी लागते. हा अनुभव दरवर्षीच येत आहे. एवढेच नाही तर दिवसेंदिवस पावसाळ्यात पुराची तर उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे. त्यासाठी राज्य शासनाने रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना सुरू केली असून ही योजना शासकीय इमारती व गृह निर्माण संस्थांना राबवायची आहे. राज्य शासनाने १४ फेब्रुवारी २००२ रोजी परिपत्रक काढले आहे. सुरूवातीला वॉटर हार्वेस्टिंगची नागरिकांना सवय लागावी, यासाठी शासनाकडून ९० टक्के अनुदान दिले जात होते. १० टक्के हिस्सा ग्रामस्थांना भरावा लागत होता. मात्र अनुदान देऊनही ही योजना पुढे सरकली नाही. या शासन निर्णयानुसार नवीन बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक शासकीय इमारतीला व गृह निर्माण संस्थांकडून बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा असणे आवश्यक करण्यात आले होते. शासन निर्णयानंतर १२ वर्षाच्या कालावधीत जिल्हाभरात हजारो नवीन इमारती बांधण्यात आल्या. मात्र एकाही ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा नाही. महत्वाचे म्हणजे शासकीय इमारतीमध्येच ही सुविधा निर्माण करण्यात आली नाही. तर खाजगी नागरिक या पद्धतीचा अवलंब कसे काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १७०० मीमी पाऊस पडतो. राज्याच्या इतर जिल्ह्यापेक्षा गडचिरोली जिल्ह्यातील पर्जन्यमान सर्वात जास्त आहे. त्याचबरोबर नदी, नाल्यांचे प्रमाणही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. शेती व उद्योगांची संख्या कमी असल्याने भूगर्भातील पाण्याचा उपसा कमी होतो. त्यामुळे उन्हाळ्यातही फारशी पाणीटंचाई जिल्ह्यात सध्यास्थितीत तरी जाणवत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांसह नागरिकही पर्जन्य जलसंचय योजनेबद्दल फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)