शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

पावसाची रिपरिप;रस्ते चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:59 IST

जिल्हा परिषदेंतर्गत यंदा रस्त्यांची दुरूस्ती व निर्मितीकरिता मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात आला. दुर्गम व सुगम अशा दोन गटात निधीची विभागणी करण्यात आली. अधिकाधिक निधी दुर्गम भागाला उपलब्ध झाला. परंतु या भागात अधिकारी काम करण्यास धजावत नसल्याने कंत्राटदार आपल्या मनमर्जीप्रमाणे बांधकाम करतात.

ठळक मुद्देएटापल्ली तालुक्यात निकृष्ट कामे : अधिकारी सुस्त, कंत्राटदार मस्त

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : जिल्हा परिषदेंतर्गत यंदा रस्त्यांची दुरूस्ती व निर्मितीकरिता मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात आला. दुर्गम व सुगम अशा दोन गटात निधीची विभागणी करण्यात आली. अधिकाधिक निधी दुर्गम भागाला उपलब्ध झाला. परंतु या भागात अधिकारी काम करण्यास धजावत नसल्याने कंत्राटदार आपल्या मनमर्जीप्रमाणे बांधकाम करतात. असाच काहीसा प्रकार एटापल्ली तालुक्यात रस्त्यांच्या दुर्दशेवरून दिसून येत आहे. अल्पावधीतच रस्त्यांची दुरवस्था होऊन सध्या चिखल पसरला आहे.जिल्हा परिषदेने मागील वर्षी जवळपास १०० कोटी रूपयांचे ३०-५४ या लेखा शीर्षांतर्गत कामाचे नियोजन केले होते. यातील अनेक कामे जिल्ह्याच्या दुर्गम भागात आहेत. एटापल्ली तालुक्यात या निधीतून अनेक विकास कामे करण्यात आली. एटापल्ली-जारावंडी या मुख्य मार्गापासून आतमध्ये काही कामे करण्यात आली. पण कंत्राटदारांच्या मनमानीमुळे सदर कामे निकृष्ट दर्जाची झाली असून अल्पावधीतच रस्ते उखडून चिखलमय झाले आहेत. परंतु या प्रकाराकडे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी कंत्राटदारांचे फावले आहे.जिमलगट्टा येथे पसरली घाणजिमलगट्टा येथील मुख्य मार्गावर सर्वत्र घाण पसरली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट जनावरांमुळे संपूर्ण मार्गावर घाण पसरली असल्यामुळे आवागमन करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. शाळेत ये-जा करणाºया व रस्त्यांवर फिरणाºया लोकांना रस्त्यावरील घाणीचा प्रचंड त्रास होत आहे. या चिखलामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकरता येत नाही. शासनाने चालविलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा निधी येत असून त्याचा योग्य वापर न होऊन स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा उडत आहे. पशुपालकांनी आपल्या गुरांना गोठ्यात बांधून स्वच्छ भारत अभियानास हातभार लावावा, पुन्हा मुख्य मार्गावर चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.