शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

पावसाची रिपरिप;रस्ते चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:59 IST

जिल्हा परिषदेंतर्गत यंदा रस्त्यांची दुरूस्ती व निर्मितीकरिता मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात आला. दुर्गम व सुगम अशा दोन गटात निधीची विभागणी करण्यात आली. अधिकाधिक निधी दुर्गम भागाला उपलब्ध झाला. परंतु या भागात अधिकारी काम करण्यास धजावत नसल्याने कंत्राटदार आपल्या मनमर्जीप्रमाणे बांधकाम करतात.

ठळक मुद्देएटापल्ली तालुक्यात निकृष्ट कामे : अधिकारी सुस्त, कंत्राटदार मस्त

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : जिल्हा परिषदेंतर्गत यंदा रस्त्यांची दुरूस्ती व निर्मितीकरिता मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात आला. दुर्गम व सुगम अशा दोन गटात निधीची विभागणी करण्यात आली. अधिकाधिक निधी दुर्गम भागाला उपलब्ध झाला. परंतु या भागात अधिकारी काम करण्यास धजावत नसल्याने कंत्राटदार आपल्या मनमर्जीप्रमाणे बांधकाम करतात. असाच काहीसा प्रकार एटापल्ली तालुक्यात रस्त्यांच्या दुर्दशेवरून दिसून येत आहे. अल्पावधीतच रस्त्यांची दुरवस्था होऊन सध्या चिखल पसरला आहे.जिल्हा परिषदेने मागील वर्षी जवळपास १०० कोटी रूपयांचे ३०-५४ या लेखा शीर्षांतर्गत कामाचे नियोजन केले होते. यातील अनेक कामे जिल्ह्याच्या दुर्गम भागात आहेत. एटापल्ली तालुक्यात या निधीतून अनेक विकास कामे करण्यात आली. एटापल्ली-जारावंडी या मुख्य मार्गापासून आतमध्ये काही कामे करण्यात आली. पण कंत्राटदारांच्या मनमानीमुळे सदर कामे निकृष्ट दर्जाची झाली असून अल्पावधीतच रस्ते उखडून चिखलमय झाले आहेत. परंतु या प्रकाराकडे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी कंत्राटदारांचे फावले आहे.जिमलगट्टा येथे पसरली घाणजिमलगट्टा येथील मुख्य मार्गावर सर्वत्र घाण पसरली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट जनावरांमुळे संपूर्ण मार्गावर घाण पसरली असल्यामुळे आवागमन करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. शाळेत ये-जा करणाºया व रस्त्यांवर फिरणाºया लोकांना रस्त्यावरील घाणीचा प्रचंड त्रास होत आहे. या चिखलामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकरता येत नाही. शासनाने चालविलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा निधी येत असून त्याचा योग्य वापर न होऊन स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा उडत आहे. पशुपालकांनी आपल्या गुरांना गोठ्यात बांधून स्वच्छ भारत अभियानास हातभार लावावा, पुन्हा मुख्य मार्गावर चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.