शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची रिपरिप;रस्ते चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:59 IST

जिल्हा परिषदेंतर्गत यंदा रस्त्यांची दुरूस्ती व निर्मितीकरिता मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात आला. दुर्गम व सुगम अशा दोन गटात निधीची विभागणी करण्यात आली. अधिकाधिक निधी दुर्गम भागाला उपलब्ध झाला. परंतु या भागात अधिकारी काम करण्यास धजावत नसल्याने कंत्राटदार आपल्या मनमर्जीप्रमाणे बांधकाम करतात.

ठळक मुद्देएटापल्ली तालुक्यात निकृष्ट कामे : अधिकारी सुस्त, कंत्राटदार मस्त

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : जिल्हा परिषदेंतर्गत यंदा रस्त्यांची दुरूस्ती व निर्मितीकरिता मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात आला. दुर्गम व सुगम अशा दोन गटात निधीची विभागणी करण्यात आली. अधिकाधिक निधी दुर्गम भागाला उपलब्ध झाला. परंतु या भागात अधिकारी काम करण्यास धजावत नसल्याने कंत्राटदार आपल्या मनमर्जीप्रमाणे बांधकाम करतात. असाच काहीसा प्रकार एटापल्ली तालुक्यात रस्त्यांच्या दुर्दशेवरून दिसून येत आहे. अल्पावधीतच रस्त्यांची दुरवस्था होऊन सध्या चिखल पसरला आहे.जिल्हा परिषदेने मागील वर्षी जवळपास १०० कोटी रूपयांचे ३०-५४ या लेखा शीर्षांतर्गत कामाचे नियोजन केले होते. यातील अनेक कामे जिल्ह्याच्या दुर्गम भागात आहेत. एटापल्ली तालुक्यात या निधीतून अनेक विकास कामे करण्यात आली. एटापल्ली-जारावंडी या मुख्य मार्गापासून आतमध्ये काही कामे करण्यात आली. पण कंत्राटदारांच्या मनमानीमुळे सदर कामे निकृष्ट दर्जाची झाली असून अल्पावधीतच रस्ते उखडून चिखलमय झाले आहेत. परंतु या प्रकाराकडे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी कंत्राटदारांचे फावले आहे.जिमलगट्टा येथे पसरली घाणजिमलगट्टा येथील मुख्य मार्गावर सर्वत्र घाण पसरली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट जनावरांमुळे संपूर्ण मार्गावर घाण पसरली असल्यामुळे आवागमन करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. शाळेत ये-जा करणाºया व रस्त्यांवर फिरणाºया लोकांना रस्त्यावरील घाणीचा प्रचंड त्रास होत आहे. या चिखलामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकरता येत नाही. शासनाने चालविलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा निधी येत असून त्याचा योग्य वापर न होऊन स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा उडत आहे. पशुपालकांनी आपल्या गुरांना गोठ्यात बांधून स्वच्छ भारत अभियानास हातभार लावावा, पुन्हा मुख्य मार्गावर चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.