शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची उसंत, जनजीवन पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:21 IST

रविवारच्या रात्री जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाल्यांवरील पुलावर पुराचे पाणी चढले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प पडून अनेक गावांचा संपर्क तुटला होता.

ठळक मुद्देनद्यांचे पाणी ओसरले : भामरागड, एटापल्ली तालुक्यातील सर्वच मार्ग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रविवारच्या रात्री जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाल्यांवरील पुलावर पुराचे पाणी चढले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प पडून अनेक गावांचा संपर्क तुटला होता. मंगळवारी मात्र पावसाने उसंत घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मात्र कुरखेडा तालुक्यातील खोब्रागडी नदीला मंगळवारी पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.गडचिरोली-आरमोरी मार्गावरील कठाणी नदी पुलावर सोमवारी दुपारनंतर पाणी चढले होते. रात्री पुलावरील पाणी कमी झाल्यानंतर मंगळवारी सकाळपासून वाहतूक सुरळीत झाली. गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील पोटफोडी नदीची पाणी पातळी कमी झाल्याने याही मार्गावरील वाहतूक सकाळपासूनच सुरू झाली. एटापल्ली तालुक्यातील जारावंडी, देवदा, हालेवारा मार्ग सुरू झाले. डुम्मी नाल्यावरील पूर ओसरल्याने जवेली, मरपल्ली, वासामुंडी मार्ग सुरू झाला आहे. धानोरा तालुक्यातीलही सर्वच मार्ग सुरू झाले आहेत.गडचिरोलीनंतर सर्वाधिक पाऊस भामरागड तालुक्यात झाला होता. भामरागडजवळील पर्लकोटा नदी पुलावर रविवारी मध्यरात्री पाणी चढले. त्यानंतर सोमवारी दुपारी १२ वाजता पुलावरील पाणी ओसरले. मात्र पुन्हा रात्री ९ वाजता पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. रात्रभरातून पाणी कमी झाल्याने मंगळवारी पुलावरील पाणी ओसरले. पुलावर मोठ्या प्रमाणात गाळ, लाकडे, जमा झाली होती. त्यामुळे पूर ओसरला असला तरी वाहतूक होणे अशक्य होते. तहसीलदार कैलास अंडील यांनी पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने पुलावरील मलबा व लाकडे काढली. जवळपास सकाळी १० वाजतानंतर पुलावरून वाहतूक सुरू झाली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील मातीच्या घरांना व नुकतेच रोवणे झालेल्या धान पिकाला बसला आहे. घरांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम महसूल विभागाने सुरू केले आहे. मात्र नेमक्या किती घरांचे नुकसान झाले, याचा अधिकृत आकडा प्राप्त होऊ शकला नाही. आठ दिवसांपूर्वी रोवणीला सुरूवात झाली होती. अशातच सोमवारी रात्री अतिवृष्टी झाली. रोवलेले धान वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.व्यंकटेश सिडाम बेपत्ताचप्राणहिता नदीत अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली घाटावरून व्यंकटेश सिडाम हा युवक वाहून गेला. बचाव पथकाने सोमवारी व मंगळवारी दिवसभर सदर युवकाचा शोध घेतला. मात्र तो मिळाला नाही. गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने प्राणहिता नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शोध कार्यात अडचणीत येत आहेत. बुधवारी सुध्दा बचाव पथकातर्फे त्याचा शोध घेतला जाणार आहे.खोब्रागडी नदीला पूरमंगळवारी कुरखेडा, कोरची तालुक्यात दमदार पाऊस झाला. कुरखेडात १०० मिमी तर कोरची तालुक्यात ६८ मिमी पाऊस पडला. त्यामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली. कातलवाडाकडे जाणाऱ्या पुलावर पाणी साचले होते. त्यामुळे या गावाचा संपर्क तुटला होता. नदी लगत असलेल्या शेतांमध्ये पाणी साचल्याने रोवणीही वाहून गेले. मंगळवारी दुपारनंतर पुलावरील पाणी ओसरले. परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर पं.स. उपसभापती मनोज दुनेदार यांनी परिस्थितीची पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी दुनेदार यांनी केली आहे.पोटगावात घर कोसळलेदेसाईगंज : तालुक्यातील पोटगाव येंथील गणेश वाढगुरे यांचे विटांचे घर कोसळले. त्यामुळे सुरज वाढगुरे हा लहान मुलगा किरकोळ जखमी झाला. घराचा पंचनामा करण्यात आला आहे. नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.