शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

५० हजार हेक्टरवर रबीची पेरणी

By admin | Updated: October 7, 2014 23:33 IST

चालू रब्बी हंगामादरम्यान जिल्ह्यात सुमारे ५० हजार २८५ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून त्यासाठी आवश्यक असलेले संकरीत बियाणे व खतही

गडचिरोली : चालू रब्बी हंगामादरम्यान जिल्ह्यात सुमारे ५० हजार २८५ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून त्यासाठी आवश्यक असलेले संकरीत बियाणे व खतही उपलब्ध करून दिले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. खरीप पिकाचे १ लाख ४९ हजार २६० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यापूर्वी शेतकरी खरीप हंगामातच पीक घेत होते. मात्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहीर, विंधन विहीर, पाणीपंप, डिझेल इंजिन व अन्य साहित्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे शेतकरी वर्गास सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील पिके घेण्याकडे कल वाढत चालला असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात रबी हंगामाचे २३ हजार ४०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. मात्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे सुरू केले आहे. कमी सिंचनात चांगले पीक येतील अशा वाणांची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्याचबरोबर कोणत्या जमीनीमध्ये कोणते पिक घ्यावे, याबद्दही मार्गदर्शन केले जात असल्याने रबी हंगामाचे क्षेत्र दरवर्षी वाढत चालले असल्याचे दिसून येते. यावर्षी सुमारे ५० हजार २८५ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यामध्ये गहू १ हजार ५४५ हेक्टर, ज्वारी ७ हजार हेक्टर, संकरीत मका ५ हजार ३१०, हरभरा ७ हजार ६६०, लाखोळी १७ हजार ६५०, मुंग १ हजार ८००, जवस ५ हजार ६५५, तीळ २ हजार ५७५, सूर्यफुल २४०, करडई ५०, भुईमूग ६०० व मोहरी पिकाची २०० हेक्टरवर पेरणी केली जाणार आहे. यासाठी ५ हजार ७१७ क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. रब्बी बियाणांची पेरणी आॅक्टोबर महिन्यामध्ये केली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा तुटवडा जाणवणार नाही. याची पूर्ण खबरदारी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घेतली जात आहे. एक महिन्यापूर्वीच दमदार पाऊस झाला. त्यामुळे जमिनीत चांगला ओलावा आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग रबी पिकासाठी जमीन तयार करण्याच्या कामाला लागला आहे. लाखोळी, मूग, हरभरा व गहू या पिकांचे उत्पादन धानाच्या बांधीतच घेतले जाते. त्यामुळे या पिकांची पेरणी आॅक्टोबरच्या शेवटी केली जाणार आहे. कृषी विभागाने मात्र आधीच नियोजन केले आहे. (नगर प्रतिनिधी)