शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
4
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
5
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
6
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
7
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
8
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
9
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
10
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
11
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
12
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
13
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
14
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
15
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
16
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
17
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
18
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
19
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
20
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका

५० हजार हेक्टरवर रबीची पेरणी

By admin | Updated: October 7, 2014 23:33 IST

चालू रब्बी हंगामादरम्यान जिल्ह्यात सुमारे ५० हजार २८५ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून त्यासाठी आवश्यक असलेले संकरीत बियाणे व खतही

गडचिरोली : चालू रब्बी हंगामादरम्यान जिल्ह्यात सुमारे ५० हजार २८५ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून त्यासाठी आवश्यक असलेले संकरीत बियाणे व खतही उपलब्ध करून दिले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. खरीप पिकाचे १ लाख ४९ हजार २६० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यापूर्वी शेतकरी खरीप हंगामातच पीक घेत होते. मात्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहीर, विंधन विहीर, पाणीपंप, डिझेल इंजिन व अन्य साहित्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे शेतकरी वर्गास सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील पिके घेण्याकडे कल वाढत चालला असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात रबी हंगामाचे २३ हजार ४०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. मात्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे सुरू केले आहे. कमी सिंचनात चांगले पीक येतील अशा वाणांची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्याचबरोबर कोणत्या जमीनीमध्ये कोणते पिक घ्यावे, याबद्दही मार्गदर्शन केले जात असल्याने रबी हंगामाचे क्षेत्र दरवर्षी वाढत चालले असल्याचे दिसून येते. यावर्षी सुमारे ५० हजार २८५ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यामध्ये गहू १ हजार ५४५ हेक्टर, ज्वारी ७ हजार हेक्टर, संकरीत मका ५ हजार ३१०, हरभरा ७ हजार ६६०, लाखोळी १७ हजार ६५०, मुंग १ हजार ८००, जवस ५ हजार ६५५, तीळ २ हजार ५७५, सूर्यफुल २४०, करडई ५०, भुईमूग ६०० व मोहरी पिकाची २०० हेक्टरवर पेरणी केली जाणार आहे. यासाठी ५ हजार ७१७ क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. रब्बी बियाणांची पेरणी आॅक्टोबर महिन्यामध्ये केली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा तुटवडा जाणवणार नाही. याची पूर्ण खबरदारी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घेतली जात आहे. एक महिन्यापूर्वीच दमदार पाऊस झाला. त्यामुळे जमिनीत चांगला ओलावा आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग रबी पिकासाठी जमीन तयार करण्याच्या कामाला लागला आहे. लाखोळी, मूग, हरभरा व गहू या पिकांचे उत्पादन धानाच्या बांधीतच घेतले जाते. त्यामुळे या पिकांची पेरणी आॅक्टोबरच्या शेवटी केली जाणार आहे. कृषी विभागाने मात्र आधीच नियोजन केले आहे. (नगर प्रतिनिधी)