शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

रबी हंगामातील ७० हजार क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:08 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१८-१९ च्या खरीप व रबी हंगामात विक्रमी धान खरेदी करण्यात आली. खरीप हंगामातील गडचिरोली कार्यालयाचे धान भरडाईचे काम ८५ टक्के तर अहेरी कार्यालयाचे काम ५७ टक्क्यावर पोहोचले.

ठळक मुद्देपावसाने नुकसानीची शक्यता : गडचिरोलीत ८५ टक्के तर अहेरीत ५७ टक्के भरडाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१८-१९ च्या खरीप व रबी हंगामात विक्रमी धान खरेदी करण्यात आली. खरीप हंगामातील गडचिरोली कार्यालयाचे धान भरडाईचे काम ८५ टक्के तर अहेरी कार्यालयाचे काम ५७ टक्क्यावर पोहोचले. सद्य:स्थितीत रबी हंगामातील जवळपास ७० हजार क्विंटल धान उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवण्यात आला आहे. या धानाची लवकर उचल न झाल्यास पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली कार्यालयामार्फत २०१८-१९ च्या खरीप हंगामात एकूण ७ लाख २७ हजार ८९८ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. यापैकी केंद्रावरून धानाची उचल करून ६ लाख २२ हजार ३८८ क्विंटल धानाची राईस मिलर्सकडून भरडाई करण्यात आली. आता १ लाख ३ हजार १२१ क्विंटल धान आविका संस्थेकडे शिल्लक आहे. एवढ्या धानाचे भरडाईचे आदेश देणे शिल्लक आहे. १ लाख ३ हजार १२१ क्विंटल पैकी १ लाख २ हजार क्विंटल धान संस्थेच्या गोदामात सुरक्षितरित्या ठेवण्यात आला आहे.खरीप हंगामातील केवळ एक हजार क्विंटल धान उघड्यावर आहे. रबी हंगामात गडचिरोली कार्यालयाच्या हद्दितील केंद्रावर १ लाख १२ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी ३३ हजार ३९५ क्विंटल धान भरडाईसाठी मिलर्सकडे देण्यात आले आहे. आविका संस्थेकडे शिल्लक असलेल्या ७८ हजार ७३३ क्विंटल धानापैकी १६ हजार क्विंटल धान गोदामात सुरक्षितरित्या ठेवण्यात आले. रबी हंगामातील उर्वरित ६० हजार क्विंटल धान ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवण्यात आला आहे.अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत खरीप हंगामात २ लाख ८२ हजार ४५७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी दीड लाख क्विंटल पेक्षा अधिक धानाची मिलर्सकडून भरडाई करण्यात आली आहे.उर्वरित सर्व धान गोदामात सुरक्षितरित्या ठेवण्यात आला आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दितील रबी हंगामातील अंकिसा व वडधम या दोन केंद्रावरील केवळ १० हजार क्विंटल धान ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवण्यात आला आहे.आठवडाभरात धानाची उचल करणारखरीप हंगामातील धान उघड्यावर नाही. रबी हंगामातील उघड्यावर ठेवण्यात आलेल्या धानाची येत्या आठवडाभरात उचल करण्यात येईल. जेणे करून महामंडळ व आविका संस्थेचे पावसाने नुकसान होणार नाही, अशी माहिती महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाचे उपव्यवस्थापक मुळेवार व गडचिरोली कार्यालयाचे उपव्यवस्थापक उमाळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.