शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

शहीद जवानाच्या मातेचे प्रश्न; पालकमंत्री स्तब्ध

By admin | Updated: April 5, 2015 01:44 IST

महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर एटापल्ली तालुक्याच्या मुसपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या स्वरूप अमृतकर या जवानाच्या आईने ...

गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर एटापल्ली तालुक्याच्या मुसपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या स्वरूप अमृतकर या जवानाच्या आईने तब्बल १० दिवसानंतर सांत्वनासाठी पोहोचणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना खडेबोल सुनावले. चकमकीच्या घटनेच्या वेळी तत्काळ मदत मिळाली असती तर माझा मुलगा वाचला असता, असे त्यांनी सांगितले. २२ मार्चला मुसपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी लढताना दोगे आत्राम व स्वरूप अमृतकर हे जवान शहीद झाले होते. त्यांना मानवंदना देण्यासाठी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व जिल्ह्यातील खासदार, आमदार आले नाहीत. त्यानंतरही एकही लोकप्रतिनिधी शहिदांच्या घरापर्यंत पोहोचला नाही. राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. याबाबतचा सरकारप्रती प्रचंड रोष राजधानीतूनच इंग्रजी माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर व्यक्त केला. त्यानंतर सुस्तावलेल्या सरकारमधील गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम शुक्रवारी रात्री उशिरा शहीद जवान स्वरूप अमृतकरच्या घरी पोहोचले. त्यावेळी शहीद अमृतकरच्या आई कल्पना अमृतकर यांनी आपली सारी आपबिती पालकमंत्र्यांना सुनावली. माझा मुलगा चार तास तडफडत होता. नक्षलवाद्याशी लढणाऱ्या माझ्या मुलाच्या अंगावर बुलेटफ्रुप जॉकेट नव्हते. सायंकाळ झाली म्हणून हेलिकॉप्टर उडविता येत नाही, असे सांगून मदत देण्यात आली नाही. हेलिकॉप्टर मिळाले असते तर माझा मुलगा वाचला असता, इतर वेळी हवे तसे हेलिकॉप्टर सायंकाळी (सूर्यास्तानंतर) उडविले जाते. मात्र या घटनेत तसे झाले नाही. हेलिकॉप्टरसोबत वैद्यकीय अधिकारी द्यायला हवा, तसेच पोलिसांच्या रुग्णालयात रक्ताची व्यवस्था असायला हवी, असेही सुचविले. आपला पोरगा हा उत्तम दर्जाचा खेळाडू होता. त्याला शौर्यपदक शासनाने जाहीर करावे, अशी मागणीही कल्पना अमृतकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली. पालकमंत्र्यांनी हे सारे मुकपणे ऐकूण घेतले. यावेळी त्यांच्या समावेत गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल खाडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गेडाम, अनिल करपे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, अभिजीत कोरडे, संतोष पड्यालवार, श्रीनिवास नागडीवार, राजू गव्हारे, पुष्पा लाडवे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)