शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

‘त्या’ मेंढपाळ कुटुंबासमोर निर्माण झाला उदरनिर्वाहाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST

बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा जीव गेल्याने मेंढपाळ कुटुंब चांगलेच धास्तावले आहे. आपल्या मेंढ्या कुठे चरायला न्यायच्या, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. भंगाराम तळोधी येथील २० ते २५ कुटुंबे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. एका कुटुंबाकडे १०० ते १५० मेंढ्या असतात. वर्षभर या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मेंढ्यांना जंगलात चरायला घेऊन जातात. गावालगत जंगलात एखाद्या ठिकाणी रात्री ते मुक्कामही करतात. त्याच ठिकाणी खाली झोपतात.

लाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी : मेंढपाळ कुटुंब हे वर्षभर जंगलात मेंढ्या चरायला घेऊन जातात व त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात. १५ सप्टेंबरला गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील देवावार या मेंढपाळ कुटुंबातील सात वर्षांच्या बालकावर बिबट्याने जंगलात हल्ला करून ठार केले. वाघ-बिबट्यामुळे आता जीवालाच धोका निर्माण झाला, तर जंगलात जायचे कसे आणि उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न त्या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे.बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा जीव गेल्याने मेंढपाळ कुटुंब चांगलेच धास्तावले आहे. आपल्या मेंढ्या कुठे चरायला न्यायच्या, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. भंगाराम तळोधी येथील २० ते २५ कुटुंबे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. एका कुटुंबाकडे १०० ते १५० मेंढ्या असतात. वर्षभर या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मेंढ्यांना जंगलात चरायला घेऊन जातात. गावालगत जंगलात एखाद्या ठिकाणी रात्री ते मुक्कामही करतात. त्याच ठिकाणी खाली झोपतात. त्यामुळे साप, विंचू आदी सरपटणाऱ्या प्राण्यांचा दंश होण्याची भीती असते. तरीही ते जीवावर उदार होऊन जंगलात झोपतात.  काही दिवसांपूर्वी कोरचीजवळ मेंढपाळ कुटुंबातील  १०० ते १३० मेंढ्या वीज पडून ठार झाल्या होत्या.

जीवावर उठलेल्या वाघांचा बंदोबस्त करा

देसाईगंज : काही दिवसांत वाघाने केलेल्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला. त्या वाघास मानवी रक्ताची चटक लागल्याने आणखीही अनेकांचा जीव तो घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा, अशी मागणी आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांनी जिल्हाधिकारी संजय मीना यांना निवेदनातून केली आहे. n वाघाने नुकतेच आरमोरी तालुक्यातील देलोडा खुर्द येथील इसमास तर बिबट्याने मार्कंडा येथील जंगलात गोंडपिपरी तालुक्यातील सात वर्षीय बालकास ठार केले. याशिवाय देसाईगंज तालुक्यातील बोळधा (गावगन्ना) ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या रावणवाडी टोली येथील प्रभू नैताम यांच्या गोठ्यात बांधलेल्या १५ शेळ्या बिबट्याने ठार केल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर दहशतीत वावरत आहे. सदर बिबट कधीही मानवावर हल्ला करून जीव घेण्याची शक्यता लक्षात घेता त्याला तत्काळ जेरबंद करा, अशी मागणी आ. गजबे यांनी केली.

 

टॅग्स :Tigerवाघ