शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

‘त्या’ मेंढपाळ कुटुंबासमोर निर्माण झाला उदरनिर्वाहाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST

बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा जीव गेल्याने मेंढपाळ कुटुंब चांगलेच धास्तावले आहे. आपल्या मेंढ्या कुठे चरायला न्यायच्या, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. भंगाराम तळोधी येथील २० ते २५ कुटुंबे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. एका कुटुंबाकडे १०० ते १५० मेंढ्या असतात. वर्षभर या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मेंढ्यांना जंगलात चरायला घेऊन जातात. गावालगत जंगलात एखाद्या ठिकाणी रात्री ते मुक्कामही करतात. त्याच ठिकाणी खाली झोपतात.

लाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी : मेंढपाळ कुटुंब हे वर्षभर जंगलात मेंढ्या चरायला घेऊन जातात व त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात. १५ सप्टेंबरला गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील देवावार या मेंढपाळ कुटुंबातील सात वर्षांच्या बालकावर बिबट्याने जंगलात हल्ला करून ठार केले. वाघ-बिबट्यामुळे आता जीवालाच धोका निर्माण झाला, तर जंगलात जायचे कसे आणि उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न त्या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे.बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा जीव गेल्याने मेंढपाळ कुटुंब चांगलेच धास्तावले आहे. आपल्या मेंढ्या कुठे चरायला न्यायच्या, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. भंगाराम तळोधी येथील २० ते २५ कुटुंबे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. एका कुटुंबाकडे १०० ते १५० मेंढ्या असतात. वर्षभर या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मेंढ्यांना जंगलात चरायला घेऊन जातात. गावालगत जंगलात एखाद्या ठिकाणी रात्री ते मुक्कामही करतात. त्याच ठिकाणी खाली झोपतात. त्यामुळे साप, विंचू आदी सरपटणाऱ्या प्राण्यांचा दंश होण्याची भीती असते. तरीही ते जीवावर उदार होऊन जंगलात झोपतात.  काही दिवसांपूर्वी कोरचीजवळ मेंढपाळ कुटुंबातील  १०० ते १३० मेंढ्या वीज पडून ठार झाल्या होत्या.

जीवावर उठलेल्या वाघांचा बंदोबस्त करा

देसाईगंज : काही दिवसांत वाघाने केलेल्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला. त्या वाघास मानवी रक्ताची चटक लागल्याने आणखीही अनेकांचा जीव तो घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा, अशी मागणी आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांनी जिल्हाधिकारी संजय मीना यांना निवेदनातून केली आहे. n वाघाने नुकतेच आरमोरी तालुक्यातील देलोडा खुर्द येथील इसमास तर बिबट्याने मार्कंडा येथील जंगलात गोंडपिपरी तालुक्यातील सात वर्षीय बालकास ठार केले. याशिवाय देसाईगंज तालुक्यातील बोळधा (गावगन्ना) ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या रावणवाडी टोली येथील प्रभू नैताम यांच्या गोठ्यात बांधलेल्या १५ शेळ्या बिबट्याने ठार केल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर दहशतीत वावरत आहे. सदर बिबट कधीही मानवावर हल्ला करून जीव घेण्याची शक्यता लक्षात घेता त्याला तत्काळ जेरबंद करा, अशी मागणी आ. गजबे यांनी केली.

 

टॅग्स :Tigerवाघ