शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

‘त्या’ मेंढपाळ कुटुंबासमोर निर्माण झाला उदरनिर्वाहाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST

बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा जीव गेल्याने मेंढपाळ कुटुंब चांगलेच धास्तावले आहे. आपल्या मेंढ्या कुठे चरायला न्यायच्या, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. भंगाराम तळोधी येथील २० ते २५ कुटुंबे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. एका कुटुंबाकडे १०० ते १५० मेंढ्या असतात. वर्षभर या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मेंढ्यांना जंगलात चरायला घेऊन जातात. गावालगत जंगलात एखाद्या ठिकाणी रात्री ते मुक्कामही करतात. त्याच ठिकाणी खाली झोपतात.

लाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी : मेंढपाळ कुटुंब हे वर्षभर जंगलात मेंढ्या चरायला घेऊन जातात व त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात. १५ सप्टेंबरला गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील देवावार या मेंढपाळ कुटुंबातील सात वर्षांच्या बालकावर बिबट्याने जंगलात हल्ला करून ठार केले. वाघ-बिबट्यामुळे आता जीवालाच धोका निर्माण झाला, तर जंगलात जायचे कसे आणि उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न त्या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे.बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा जीव गेल्याने मेंढपाळ कुटुंब चांगलेच धास्तावले आहे. आपल्या मेंढ्या कुठे चरायला न्यायच्या, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. भंगाराम तळोधी येथील २० ते २५ कुटुंबे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. एका कुटुंबाकडे १०० ते १५० मेंढ्या असतात. वर्षभर या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मेंढ्यांना जंगलात चरायला घेऊन जातात. गावालगत जंगलात एखाद्या ठिकाणी रात्री ते मुक्कामही करतात. त्याच ठिकाणी खाली झोपतात. त्यामुळे साप, विंचू आदी सरपटणाऱ्या प्राण्यांचा दंश होण्याची भीती असते. तरीही ते जीवावर उदार होऊन जंगलात झोपतात.  काही दिवसांपूर्वी कोरचीजवळ मेंढपाळ कुटुंबातील  १०० ते १३० मेंढ्या वीज पडून ठार झाल्या होत्या.

जीवावर उठलेल्या वाघांचा बंदोबस्त करा

देसाईगंज : काही दिवसांत वाघाने केलेल्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला. त्या वाघास मानवी रक्ताची चटक लागल्याने आणखीही अनेकांचा जीव तो घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा, अशी मागणी आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांनी जिल्हाधिकारी संजय मीना यांना निवेदनातून केली आहे. n वाघाने नुकतेच आरमोरी तालुक्यातील देलोडा खुर्द येथील इसमास तर बिबट्याने मार्कंडा येथील जंगलात गोंडपिपरी तालुक्यातील सात वर्षीय बालकास ठार केले. याशिवाय देसाईगंज तालुक्यातील बोळधा (गावगन्ना) ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या रावणवाडी टोली येथील प्रभू नैताम यांच्या गोठ्यात बांधलेल्या १५ शेळ्या बिबट्याने ठार केल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर दहशतीत वावरत आहे. सदर बिबट कधीही मानवावर हल्ला करून जीव घेण्याची शक्यता लक्षात घेता त्याला तत्काळ जेरबंद करा, अशी मागणी आ. गजबे यांनी केली.

 

टॅग्स :Tigerवाघ