शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य व्यक्तीचा विकास हाच शासनाचा उद्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 23:53 IST

सर्वांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्याचा विकास गतिमान झालेला आहे. येणाऱ्या काळात देखील सामान्य नागरिक केंद्रस्थानी माणून विकासगंगा पुढे जाईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन राज्याचे वने तसेच आदिवासी विकास राज्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे प्रतिपादन : स्वातंत्र्यदिनी जिल्हा पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्वांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्याचा विकास गतिमान झालेला आहे. येणाऱ्या काळात देखील सामान्य नागरिक केंद्रस्थानी माणून विकासगंगा पुढे जाईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन राज्याचे वने तसेच आदिवासी विकास राज्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.स्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्धापनदिनी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहणप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्षा योगीता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेष बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड तसेच सहायक जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, उपवनसंरक्षक शिवाजी फुले आदी उपस्थित होते.आपल्या या आदिवासीबहूल आणि दुर्गम जिल्ह्यात सर्वांपर्यंत विकास पोहोचावा यासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. &‘सबका साथ सबका विकास’ ही प्रेरणा घेऊन &‘आम आदमी’चा विकास हे ध्येय्य आहे. आपला जिल्हा विकासाच्या बाबतीत बराच मागासलेला आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी ‘आकांक्षित जिल्हा’ कार्यक्रमात गडचिरोलीची निवड केली आहे, असे सांगून ते म्हणाले की, कोणतेही आव्हान हे संधी म्हणून स्विकारले तर आपल्याला चांगले कार्य उभे करता येते. या भूमिकेतून जिल्ह्यावर असणारा मागासलेपणाचा ठसा मिटविण्यासाठी जिल्हा प्रशासन आता कामाला लागले आहे. यातील विविध निर्देशांकांची उद्दिष्टे निश्चित करुन सन २०२२ पर्यंतच्या प्रगत गडचिरोलीचा आराखडा नजरेसमोर ठेवून काम सुरु झाले आहे. यात शासन पूर्ण क्षमतेने आर्थिक पाठबळ देईल, याची ग्वाही मी आज आपणास देतो असेही ते म्हणाले.जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट व्हावे व शेतकरी खºया अर्थाने समृध्द व्हावा यासाठी विविध कार्यक्रम शासनाने हाती घेतले आहेत. जिल्ह्यात ७८ टक्के वनक्षेत्र असल्याने मोठे प्रकल्प उभारणे शक्य नाहीत. हे लक्षात घेऊन जिल्ह्यात जलयुक्त शिवार, तसेच मागेल त्याला शेततळे आणि विहिरी बांधण्यासोबत मामा तलाव दुरुस्तीमधून सिंचन क्षमता वाढविण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.संचालन क्रीडा अधिकारी मदन टापरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºयांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवस