शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

महामंडळाची धान खरेदी दोन लाख क्विंटलने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 11:38 IST

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत २०१७-१८ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील ८९ केंद्रांवरून एकूण ५ लाख ६ हजार ६६१ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. मात्र यंदाच्या हंगामात तब्बल २ लाख १३ हजार ४०९ क्विंटलने धान खरेदी घटली आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम उत्पादन कमी झाल्याचा परिणाम

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत २०१७-१८ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील ८९ केंद्रांवरून एकूण ५ लाख ६ हजार ६६१ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. मात्र २०१६-१७ च्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात तब्बल २ लाख १३ हजार ४०९ क्विंटलने धान खरेदी घटली आहे.पावसाचा अनियमितपणा व धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन आले. याचा परिणाम महामंडळाच्या धान खरेदीवर झाला. २०१६-१७ च्या खरीप हंगामात गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालय मिळून महामंडळातर्फे जिल्ह्यात ८८ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रांवरून एकूण १ अब्ज ५ कोटी ८५ लाख ३ हजार ७०८ रूपये किमतीच्या एकूण ७ लाख २० हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती. यामध्ये गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५ लाख ५ हजार ६१९ तर अहेरी कार्यालयांतर्गत २ लाख १४ हजार ४५१ क्विंटल धान खरेदी झाली होती. ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या २०१७-१८ च्या खरीप हंगामात ८९ केंद्रांवरून ७८ कोटी ५३ लाख २५ हजार ३५६ रूपये किमतीच्या एकूण ५ लाख ६ हजार ६६१ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यामध्ये गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ३ लाख ६८ हजार ६३५ क्विंटल तर अहेरी कार्यालयांतर्गत १ लाख ३८ हजार २६ क्विंटलची धान खरेदी झाली आहे.

३ कोटी १५ लाखांचे चुकारे प्रलंबितआदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रांवर धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना थेट आॅनलाईन स्वरूपात चुकाऱ्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात अदा केली जाते. मात्र या प्रक्रियेत प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. २०१७-१८ चा खरीप हंगाम संपूनही धान विक्री केलेल्या जिल्हाभरातील ९७८ शेतकऱ्यांचे ३ कोटी १५ लाख ८२ हजार ११८ कोटी रूपयांचे धान चुकारे प्रलंबित आहेत. त्यामुळे संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

टॅग्स :Governmentसरकार