शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

सीमावर्ती आसरअल्लीचे धान खरेदी केंद्र दोन दिवसातच बंद

By admin | Updated: December 31, 2015 01:37 IST

तेलंगण राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली परिसरातील शेतकरी शासनाचे धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने ...

तालुक्यासाठी दिला एकच ग्रेडर : शेतकऱ्यांना रात्र काढावी लागते थंडीतश्रीकांत सुगरवार आसरअल्लीतेलंगण राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली परिसरातील शेतकरी शासनाचे धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने प्रचंड अडचणीत आले असून या प्रश्नाला घेऊन ५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी जाहीर केला आहे. आसरअल्ली येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. फक्त दोनच दिवस धान खरेदी करण्यात आली. धान खरेदी करण्यासाठी सिरोंचा तालुक्याला फक्त एकच ग्रेडर उपलब्ध झाला आहे. त्यामुळे हे खरेदी केंद्र बंद पडून आहे. केंद्र सुरू होताच परिसरातील शेतकऱ्यांनी आपले हजारो क्विंटल धान मार्केटमध्ये आणले व केंद्र बंद झाल्यावर आता शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत धान पोत्यांची रखवाली करीत बाजार ठिकाणीच रात्र काढावी लागत आहे. अंकिसा येथील खरेदी केंद्रही बंदअंकिसा येथे गोदामाअभावी अजूनपर्यंत हमीभाव धान खरेद केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. आसरअल्ली व अंकिसा येथील शेतकऱ्यांनी यासंदर्भात लोकमतशी बोलताना सांगितले की, यंदा उतारा घटला असून खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. ५ जानेवारीपर्यंत यावर तोडगा न निघाल्यास आसरअल्ली, अंकिसा परिसरातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेतील, अशी माहिती गजानन कलाक्षपवार, नागीरेड्डी गुडीमेटला, पापय्या पाले, वेंकटेश्वर इनगंटी, अब्दुल गणी, शेख वाहिद यांनी दिली.यंदा उतारा घटलागेल्या वर्षी एका एकरात १५ ते २० क्विंटल धानाचे उत्पन्न झाले होते. परंतु यावर्षी एका एकरात केवळ ८ क्विंटल धान झाले आहे. नापिकी व कमी उत्पादन यातच शासनाचे खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याच्या दारात आपला माल विकासाठी जावे लागत आहे. खासगी व्यापारी/सावकार शेतकऱ्यांची प्रचंड लूट करीत असून काही व्यापाऱ्यांनी तर शेतकऱ्यांना कर्जाऊ दिलेली रक्कमही मालाच्या विक्रीतूनच कापण्याचा सपाटा लावला आहे.