शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

सीमावर्ती आसरअल्लीचे धान खरेदी केंद्र दोन दिवसातच बंद

By admin | Updated: December 31, 2015 01:37 IST

तेलंगण राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली परिसरातील शेतकरी शासनाचे धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने ...

तालुक्यासाठी दिला एकच ग्रेडर : शेतकऱ्यांना रात्र काढावी लागते थंडीतश्रीकांत सुगरवार आसरअल्लीतेलंगण राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली परिसरातील शेतकरी शासनाचे धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने प्रचंड अडचणीत आले असून या प्रश्नाला घेऊन ५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी जाहीर केला आहे. आसरअल्ली येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. फक्त दोनच दिवस धान खरेदी करण्यात आली. धान खरेदी करण्यासाठी सिरोंचा तालुक्याला फक्त एकच ग्रेडर उपलब्ध झाला आहे. त्यामुळे हे खरेदी केंद्र बंद पडून आहे. केंद्र सुरू होताच परिसरातील शेतकऱ्यांनी आपले हजारो क्विंटल धान मार्केटमध्ये आणले व केंद्र बंद झाल्यावर आता शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत धान पोत्यांची रखवाली करीत बाजार ठिकाणीच रात्र काढावी लागत आहे. अंकिसा येथील खरेदी केंद्रही बंदअंकिसा येथे गोदामाअभावी अजूनपर्यंत हमीभाव धान खरेद केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. आसरअल्ली व अंकिसा येथील शेतकऱ्यांनी यासंदर्भात लोकमतशी बोलताना सांगितले की, यंदा उतारा घटला असून खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. ५ जानेवारीपर्यंत यावर तोडगा न निघाल्यास आसरअल्ली, अंकिसा परिसरातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेतील, अशी माहिती गजानन कलाक्षपवार, नागीरेड्डी गुडीमेटला, पापय्या पाले, वेंकटेश्वर इनगंटी, अब्दुल गणी, शेख वाहिद यांनी दिली.यंदा उतारा घटलागेल्या वर्षी एका एकरात १५ ते २० क्विंटल धानाचे उत्पन्न झाले होते. परंतु यावर्षी एका एकरात केवळ ८ क्विंटल धान झाले आहे. नापिकी व कमी उत्पादन यातच शासनाचे खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याच्या दारात आपला माल विकासाठी जावे लागत आहे. खासगी व्यापारी/सावकार शेतकऱ्यांची प्रचंड लूट करीत असून काही व्यापाऱ्यांनी तर शेतकऱ्यांना कर्जाऊ दिलेली रक्कमही मालाच्या विक्रीतूनच कापण्याचा सपाटा लावला आहे.