शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:38 IST

गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेले देसाईगंज शहर लगतच्या चारही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या ठिकाणी बाहेरून येणाऱ्यांचा ओघ ...

गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेले देसाईगंज शहर लगतच्या चारही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या ठिकाणी बाहेरून येणाऱ्यांचा ओघ जास्त आहे. अशात कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेल्या नागपूर येथून दररोज किराणा, भाजीपाला व इतरही वस्तूंची आयात हाेत आहे. परंतु याच स्थितीत कोविड-१९ च्या नियमांची सर्रास पायमल्ली करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. देसाईगंज तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

जमावबंदी आदेश असतानाही देसाईगंज शहरासह तालुक्यात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली हाेती. त्यामुळे नागरिकांसाठी ही स्थिती धाेकादायक ठरत हाेती. ही गंभीर समस्या ओळखून लाेकमतने वृत्त प्रकाशित केले. त्या अनुषंगाने १ एप्रिल रोजी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्या नेतृत्वात कोविड-१९ च्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करीत विनामास्क आढळून आलेल्या व्यक्तींवर प्रत्येकी पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच अनावश्यक गर्दी करून नियमांची पायमल्ली करणाऱ्या प्रतिष्ठाने, माॅल्सवर धडक दंडात्मक वसुलीची कारवाई करीत एकाच दिवशी तब्बल २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. या वेळी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष महले, पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी एस.एस. सलाम, पोलीस निरीक्षक डाॅ. विशाल जयस्वाल, मुख्याधिकारी डाॅ. कुलभूषण रामटेके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक कुमरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नारायण मिसार, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच महसूल विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी उचित काळजी घेऊन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या माेहिमेचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

बाॅक्स

बाहेरील व्यापारी धाेकादायक

देसाईगंज येथे बाहेरच्या जिल्ह्यातून माेठ्या प्रमाणात व्यापारी येतात. हे व्यापारी काेराेना विषाणूचा प्रसार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून देसाईगंज येथे येणाऱ्या व्यापाऱ्यांना मज्जाव करावा, अशी मागणीही आता जाेर धरत आहे. तसेच विविध सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने उपाययाेजना कराव्या, अशी मागणीही नागरिक करीत आहेत.