शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

सार्वजनिक शौचालये दुरवस्थेत

By admin | Updated: May 25, 2014 23:34 IST

सार्वजनिक आरोग्य सुयोग्य राखण्यासाठी अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली. काही काळ सार्वजनिक शौचालयाचा वापरही करण्यात आला. परंतु अल्पावधीतच

गडचिरोली : सार्वजनिक आरोग्य सुयोग्य राखण्यासाठी अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली. काही काळ सार्वजनिक शौचालयाचा वापरही करण्यात आला. परंतु अल्पावधीतच सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने सद्यस्थितीत सार्वजनिक शौचालये दूरवस्थेत आहेत. शौचालयाच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष असल्याने सध्या या शौचालयांवर अवकळा आली आहे.

शहरी भागात नगर परिषद व ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्यावतीने सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले. गरीब नागरिकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्यावतीने अभिनव उपक्रम म्हणून सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली. गाव पातळीवर हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी सार्वजनिक शौचालय अनेक गावांमध्ये बांधण्यात आले. परंतु सार्वजनिक वस्तू म्हणून शौचालयांचा वापर योग्यप्रकारे करण्यात आला नाही. त्यामुळे अल्पावधीतच शौचालयांची स्थिती दयनीय झाली. ग्रामीण व शहरी भागातील बरेच नागरिकांना शौचालयाचा वापर करण्यासाठी शौचालये उभारले खरे परंतु शौचालयातील स्वच्छता राखण्यासंदर्भात शासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नाही. अनेक ठिकाणी असलेल्या शौचालयात पाण्याच्या व्यवस्थेचा अभाव तर स्वच्छतेचा अभाव असल्याच्या बाबी अनेकदा उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे शासनाचे स्वच्छतेतून समृध्दीकडे असलेले धोरण कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या शौचालयाच्या इमारती सध्या मोडकळीस आल्या आहेत. शौचालयात असलेली अस्वच्छता बघुनच अनेक नागरिक शौचालयाचा वापर करणे टाळतात. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत रहावे. घाण पसरू नये या उद्देशाने उभारण्यात आलेले शौचालये कुचकामी ठरत आहेत. ग्रामीण भागात तर शासनाच्या योजनेतून तयार करण्यात आलेल्या अनेक शौचालयांचा वापर नागरिक करीत नाही. या शौचालयांमध्ये गोवर्‍या, सरपण व अडगळीतील वस्तू भरून ठेवल्या जातात. एकूणच ग्रामीण व शहरी भागातील गरीब नागरिकांसाठी उभारण्यात आलेले शौचालय वापराअभावी दूरवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या लाखो रूपयाच्या अनुदानाचा योग्य वापर होण्यास आडकाठी येत आहे. शौचालय बांधतांना योग्य वापर होईल या विषयी चिंतन होणे आवश्यक आहे.