शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

Lok Sabha Election 2019; गडचिरोलीत उद्योगाला चालना केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:07 IST

वनसंपदेवर आधारित अनेक उद्योग स्थापन करण्यास गडचिरोली जिल्ह्यात वाव आहे. मात्र जिल्हा निर्मितीला ३५ वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी उलटूनही एकही मोठा उद्योग निर्माण झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनसंपदेवर आधारित अनेक उद्योग स्थापन करण्यास गडचिरोली जिल्ह्यात वाव आहे. मात्र जिल्हा निर्मितीला ३५ वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी उलटूनही एकही मोठा उद्योग निर्माण झाला नाही. परिणामी युवक व सामान्य नागरिकांना रोजगारासाठी कधी छत्तीसगड तर कधी तेलंगणा राज्यात जावे लागते. असे असताना हा मुद्दा कोणत्याच निवडणुकांमध्ये फारसा चर्चेचा विषय ठरत नाही.जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ७६ टक्के भागावर जंगल आहे. सिंचनाचे मोठमोठे प्रकल्प हाती घेण्यात आले होते. मात्र हे सर्व प्रकल्प वन कायद्याच्या कचाट्यात अडकले. मिळालेली परवानगी वन कायद्यानंतर रद्द करण्यात आली. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील कन्नमवार जलाशय वगळता जिल्ह्यात एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे एखाद्या होतकरू तरूणाने आधुनिक शेती करायची ठरवले तरी त्याच्या शेतीत सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे समोरचे संपूर्ण नियोजन फेल ठरते. थोडीफार रोजगार शेतीच्या माध्यमातून निर्माण होतो, मात्र सिंचनाअभावी येथील शेती बेभरवशाची बनली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बांबू व सागाचा दर्जा अतिशय चांगला आहे. बांबूपासून निर्माण केलेल्या वस्तूंना राष्टÑीय व आंतरराष्टÑीय स्तरावर चांगली मागणी आहे. बांबूपासून विविध वस्तू तयार करता येणे शक्य आहे. मात्र बांबूपासून मोठ्या प्रमाणात वस्तू तयार होतील व हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, असा प्रयत्न आजपर्यंत झाला नाही. परिणामी लाखमोलाचा बांबू जंगलातच सडत आहे. तेलंगणातील तस्करांची येथील सागवानावर नेहमीच नजर असते. गोदावरी, प्राणहिता नदी पार करून सागवानाची चोरी केली जाते. त्यातून लाखो रूपयांची उलाढाल होते. मात्र आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सागवानापासून चांगल्या वस्तू निर्माण होतील.स्थानिक स्तरावर जी संसाधने उपलब्ध आहेत, त्यानुसार रोजगार निर्मितीचा प्रयत्न शासनामार्फत केला जातो. गडचिरोली जिल्ह्यात जंगल अधिक आहे. त्यमुळे जंगलावर आधारित उद्योग निर्माण करण्यास फार मोठा वाव आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात असे घडले नाही. परिणामी जंगलामुळेच आपला विकास रखडला, अशी चुकीची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.- रामू मादेशी,सामाजिक कार्यकर्ते, आलापल्लीआजपर्यंतच्या राजकीय व्यक्तींनी रोजगार निर्मितीबाबतचे केवळ पोकळ आश्वासन देण्याचे काम केले आहे. मात्र प्रत्यक्षात रोजगार निर्मिती झाली नाही. अजुनही येथील युवकांना रोजगारासाठी तेलंगणा, छत्तीसगड राज्य गाठावे लागते. बांबू, सागवान लाकूड यांच्यापासून विविध वस्तूंची निर्मिती करता येऊ शकेल, असे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.- आकाश बोबाटे, बेरोजगार युवक, इंदिरानगर, गडचिरोली

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019