शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; गडचिरोलीत उद्योगाला चालना केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:07 IST

वनसंपदेवर आधारित अनेक उद्योग स्थापन करण्यास गडचिरोली जिल्ह्यात वाव आहे. मात्र जिल्हा निर्मितीला ३५ वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी उलटूनही एकही मोठा उद्योग निर्माण झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनसंपदेवर आधारित अनेक उद्योग स्थापन करण्यास गडचिरोली जिल्ह्यात वाव आहे. मात्र जिल्हा निर्मितीला ३५ वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी उलटूनही एकही मोठा उद्योग निर्माण झाला नाही. परिणामी युवक व सामान्य नागरिकांना रोजगारासाठी कधी छत्तीसगड तर कधी तेलंगणा राज्यात जावे लागते. असे असताना हा मुद्दा कोणत्याच निवडणुकांमध्ये फारसा चर्चेचा विषय ठरत नाही.जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ७६ टक्के भागावर जंगल आहे. सिंचनाचे मोठमोठे प्रकल्प हाती घेण्यात आले होते. मात्र हे सर्व प्रकल्प वन कायद्याच्या कचाट्यात अडकले. मिळालेली परवानगी वन कायद्यानंतर रद्द करण्यात आली. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील कन्नमवार जलाशय वगळता जिल्ह्यात एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे एखाद्या होतकरू तरूणाने आधुनिक शेती करायची ठरवले तरी त्याच्या शेतीत सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे समोरचे संपूर्ण नियोजन फेल ठरते. थोडीफार रोजगार शेतीच्या माध्यमातून निर्माण होतो, मात्र सिंचनाअभावी येथील शेती बेभरवशाची बनली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बांबू व सागाचा दर्जा अतिशय चांगला आहे. बांबूपासून निर्माण केलेल्या वस्तूंना राष्टÑीय व आंतरराष्टÑीय स्तरावर चांगली मागणी आहे. बांबूपासून विविध वस्तू तयार करता येणे शक्य आहे. मात्र बांबूपासून मोठ्या प्रमाणात वस्तू तयार होतील व हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, असा प्रयत्न आजपर्यंत झाला नाही. परिणामी लाखमोलाचा बांबू जंगलातच सडत आहे. तेलंगणातील तस्करांची येथील सागवानावर नेहमीच नजर असते. गोदावरी, प्राणहिता नदी पार करून सागवानाची चोरी केली जाते. त्यातून लाखो रूपयांची उलाढाल होते. मात्र आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सागवानापासून चांगल्या वस्तू निर्माण होतील.स्थानिक स्तरावर जी संसाधने उपलब्ध आहेत, त्यानुसार रोजगार निर्मितीचा प्रयत्न शासनामार्फत केला जातो. गडचिरोली जिल्ह्यात जंगल अधिक आहे. त्यमुळे जंगलावर आधारित उद्योग निर्माण करण्यास फार मोठा वाव आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात असे घडले नाही. परिणामी जंगलामुळेच आपला विकास रखडला, अशी चुकीची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.- रामू मादेशी,सामाजिक कार्यकर्ते, आलापल्लीआजपर्यंतच्या राजकीय व्यक्तींनी रोजगार निर्मितीबाबतचे केवळ पोकळ आश्वासन देण्याचे काम केले आहे. मात्र प्रत्यक्षात रोजगार निर्मिती झाली नाही. अजुनही येथील युवकांना रोजगारासाठी तेलंगणा, छत्तीसगड राज्य गाठावे लागते. बांबू, सागवान लाकूड यांच्यापासून विविध वस्तूंची निर्मिती करता येऊ शकेल, असे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.- आकाश बोबाटे, बेरोजगार युवक, इंदिरानगर, गडचिरोली

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019