शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

४९९ वनराई बंधाऱ्यातून प्राण्यांना पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST

रबी हंगामातील विविध पिकांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात सिंचन सुविधा निर्माण व्हावी तसेच विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने वनराई बंधारे निर्मितीची मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील वाहत्या व प्रवाहीत नाल्यावर वनराई बंधारे बांधल्यास पाणी अडून भूगर्भात पाणी मुरण्यास मदत होते. तसेच ओलावा टिकून राहते. सदर बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचा उपयोग उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी होतो.

ठळक मुद्देकृषी विभागाचा उपक्रम : कुरखेडात सर्वाधिक १२७ बंधारातून सिंचन सुविधा; सिरोंचा तालुक्याने उद्दिष्ट गाठले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सन १९८० च्या वनकायद्याच्या जाचक अटीमुळे जिल्ह्यातील मोठे सिंचन प्रकल्प रखडले आहेत. मात्र कृषी विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवून जलसंधारणाची कामे केली जात आहेत. कृषी विभागाच्या वतीने गतवर्षी जिल्हाभरात वनराई बंधारे निर्मितीची मोहीम राबविण्यात आली. जिल्हाभरात एकूण ४९९ बंधारे पूर्ण करण्यात आले.रबी हंगामातील विविध पिकांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात सिंचन सुविधा निर्माण व्हावी तसेच विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने वनराई बंधारे निर्मितीची मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील वाहत्या व प्रवाहीत नाल्यावर वनराई बंधारे बांधल्यास पाणी अडून भूगर्भात पाणी मुरण्यास मदत होते. तसेच ओलावा टिकून राहते. सदर बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचा उपयोग उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी होतो. याशिवाय वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण होत आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जातो. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत असलेल्या सर्व कृषी कर्मचाऱ्यांमार्फत कृषी योजना गावपातळीवर पोहोचविल्या जातात. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. वन्य व पाळीव प्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागते. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी वनराई बंधारे बांधण्यात आले. एका कृषी सहाय्यकाला पाच वनराई बंधारे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १४४ कृषी सहाय्यक कार्यरत आहेत. एकाला पाच प्रमाणे एकूण ७२० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट होते. वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यात ४९९ बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले. उर्वरित २२१ बंधारे बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या संचारबंदीमुळे हे काम थंडबस्त्यात पडले आहेत.४८६ बोड्या पूर्ण; कामावर १६.१५ लाखांचा खर्चमागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला जवळपास ५०० बोड्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ मार्च २०२० पर्यंत एकूण ३ हजार ४८७ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. यापैकी ३ हजार ४०६ लाभार्थ्यांनी सेवा शुल्क भरले व ३ हजार २७६ लाभार्थी निकषानुसार पात्र झाले आहेत. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी ८९२ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. यापैकी ४८६ बोड्यांचे काम पूर्ण करण्यात आले. २०१९-२० मध्ये बोड्या निर्मितीवर १६.१५ लाखांचा खर्च झाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प