शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

४९९ वनराई बंधाऱ्यातून प्राण्यांना पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST

रबी हंगामातील विविध पिकांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात सिंचन सुविधा निर्माण व्हावी तसेच विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने वनराई बंधारे निर्मितीची मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील वाहत्या व प्रवाहीत नाल्यावर वनराई बंधारे बांधल्यास पाणी अडून भूगर्भात पाणी मुरण्यास मदत होते. तसेच ओलावा टिकून राहते. सदर बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचा उपयोग उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी होतो.

ठळक मुद्देकृषी विभागाचा उपक्रम : कुरखेडात सर्वाधिक १२७ बंधारातून सिंचन सुविधा; सिरोंचा तालुक्याने उद्दिष्ट गाठले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सन १९८० च्या वनकायद्याच्या जाचक अटीमुळे जिल्ह्यातील मोठे सिंचन प्रकल्प रखडले आहेत. मात्र कृषी विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवून जलसंधारणाची कामे केली जात आहेत. कृषी विभागाच्या वतीने गतवर्षी जिल्हाभरात वनराई बंधारे निर्मितीची मोहीम राबविण्यात आली. जिल्हाभरात एकूण ४९९ बंधारे पूर्ण करण्यात आले.रबी हंगामातील विविध पिकांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात सिंचन सुविधा निर्माण व्हावी तसेच विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने वनराई बंधारे निर्मितीची मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील वाहत्या व प्रवाहीत नाल्यावर वनराई बंधारे बांधल्यास पाणी अडून भूगर्भात पाणी मुरण्यास मदत होते. तसेच ओलावा टिकून राहते. सदर बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचा उपयोग उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी होतो. याशिवाय वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण होत आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जातो. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत असलेल्या सर्व कृषी कर्मचाऱ्यांमार्फत कृषी योजना गावपातळीवर पोहोचविल्या जातात. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. वन्य व पाळीव प्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागते. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी वनराई बंधारे बांधण्यात आले. एका कृषी सहाय्यकाला पाच वनराई बंधारे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १४४ कृषी सहाय्यक कार्यरत आहेत. एकाला पाच प्रमाणे एकूण ७२० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट होते. वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यात ४९९ बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले. उर्वरित २२१ बंधारे बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या संचारबंदीमुळे हे काम थंडबस्त्यात पडले आहेत.४८६ बोड्या पूर्ण; कामावर १६.१५ लाखांचा खर्चमागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला जवळपास ५०० बोड्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ मार्च २०२० पर्यंत एकूण ३ हजार ४८७ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. यापैकी ३ हजार ४०६ लाभार्थ्यांनी सेवा शुल्क भरले व ३ हजार २७६ लाभार्थी निकषानुसार पात्र झाले आहेत. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी ८९२ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. यापैकी ४८६ बोड्यांचे काम पूर्ण करण्यात आले. २०१९-२० मध्ये बोड्या निर्मितीवर १६.१५ लाखांचा खर्च झाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प