शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

मोतकुपलीच्या आगग्रस्त कुटुंबीयांना तत्काळ मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 22:03 IST

अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत रेगुलवाही अंतर्गत येणाऱ्या मोतकुपली येथे सिलिंडरचा स्फोट होऊन भिषण आग लागल्याने चार घरे जळून खाक झाल्याची घटना २७ मे रोजी रविवारला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच खा. अशोक नेते यांनी अहेरीच्या तहसीलदारांना आगग्रस्त घराचा पंचनामा तत्काळ करून शासनस्तरावर अहवाल सादर करावा. संबंधित आगग्रस्त कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, असे निर्देश दिले.

ठळक मुद्देखासदारांचे निर्देश : जीवितहानी टळली; साहित्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत रेगुलवाही अंतर्गत येणाऱ्या मोतकुपली येथे सिलिंडरचा स्फोट होऊन भिषण आग लागल्याने चार घरे जळून खाक झाल्याची घटना २७ मे रोजी रविवारला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच खा. अशोक नेते यांनी अहेरीच्या तहसीलदारांना आगग्रस्त घराचा पंचनामा तत्काळ करून शासनस्तरावर अहवाल सादर करावा. संबंधित आगग्रस्त कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, असे निर्देश दिले.घटनास्थळावर अग्निशमन वाहन पोहोचू न शकल्याने गावातील लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यान आग आटोक्यात आली नाही. या घटनेत घरातील कपडे, धान, दागिणे व इतर साहित्य जळून पूर्णत: खाक झाले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने चारही घरातील कुटुंबीय बाहेर अंगणात झोपले होते. त्यामुळे जीवितहानी घडली नाही. गावातील नागरिकांनी एकत्र येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. सदर आगीच्या घटनेत पोचा कुळमेथे यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले. त्यांचे १ लाख २८ हजार ७०० रूपयांचे नुकसान झाले. तिरूपती पोचा कुळमेथे यांचे १ लाख ३० हजार २०० रूपयांचे नुकसान झाले. पोचा हनुमंतूू कुळमेथे यांचे १ लाख ९७ हजार ३०० रूपये तर जग्गा हनुमंतू कुळमेथे यांचे २ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती मोका पंचनामा करणारे तलाठी एल.एस. पेंदाम यांनी दिली आहे.सिलिंडरच्या स्फोटामुळे चार घरे जळून खाक झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना मिळाली. त्यांनी जि.प. सदस्य अजय नैताम, पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, पं.स. सदस्य भास्कर तलांडे, खांदलाच्या सरपंच शकुंतला कुळमेथे, सामाजिक कार्यकर्ते बबलू शेख, माधव कुळमेथे, दिवाकर आलाम यांनी घटनास्थळी पोहोचून नुकसानीची पाहणी केली.यावेळी आर्थिक मदत देण्यात आली. शासनाकडून योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन जि.प. सदस्य नैताम यांनी दिले. तप्त उन्हाळा असल्याने जिल्ह्याच्या विविध भागात आगीच्या घटना सध्या घडत आहेत.