शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

मोतकुपलीच्या आगग्रस्त कुटुंबीयांना तत्काळ मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 22:03 IST

अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत रेगुलवाही अंतर्गत येणाऱ्या मोतकुपली येथे सिलिंडरचा स्फोट होऊन भिषण आग लागल्याने चार घरे जळून खाक झाल्याची घटना २७ मे रोजी रविवारला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच खा. अशोक नेते यांनी अहेरीच्या तहसीलदारांना आगग्रस्त घराचा पंचनामा तत्काळ करून शासनस्तरावर अहवाल सादर करावा. संबंधित आगग्रस्त कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, असे निर्देश दिले.

ठळक मुद्देखासदारांचे निर्देश : जीवितहानी टळली; साहित्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत रेगुलवाही अंतर्गत येणाऱ्या मोतकुपली येथे सिलिंडरचा स्फोट होऊन भिषण आग लागल्याने चार घरे जळून खाक झाल्याची घटना २७ मे रोजी रविवारला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच खा. अशोक नेते यांनी अहेरीच्या तहसीलदारांना आगग्रस्त घराचा पंचनामा तत्काळ करून शासनस्तरावर अहवाल सादर करावा. संबंधित आगग्रस्त कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, असे निर्देश दिले.घटनास्थळावर अग्निशमन वाहन पोहोचू न शकल्याने गावातील लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यान आग आटोक्यात आली नाही. या घटनेत घरातील कपडे, धान, दागिणे व इतर साहित्य जळून पूर्णत: खाक झाले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने चारही घरातील कुटुंबीय बाहेर अंगणात झोपले होते. त्यामुळे जीवितहानी घडली नाही. गावातील नागरिकांनी एकत्र येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. सदर आगीच्या घटनेत पोचा कुळमेथे यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले. त्यांचे १ लाख २८ हजार ७०० रूपयांचे नुकसान झाले. तिरूपती पोचा कुळमेथे यांचे १ लाख ३० हजार २०० रूपयांचे नुकसान झाले. पोचा हनुमंतूू कुळमेथे यांचे १ लाख ९७ हजार ३०० रूपये तर जग्गा हनुमंतू कुळमेथे यांचे २ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती मोका पंचनामा करणारे तलाठी एल.एस. पेंदाम यांनी दिली आहे.सिलिंडरच्या स्फोटामुळे चार घरे जळून खाक झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना मिळाली. त्यांनी जि.प. सदस्य अजय नैताम, पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, पं.स. सदस्य भास्कर तलांडे, खांदलाच्या सरपंच शकुंतला कुळमेथे, सामाजिक कार्यकर्ते बबलू शेख, माधव कुळमेथे, दिवाकर आलाम यांनी घटनास्थळी पोहोचून नुकसानीची पाहणी केली.यावेळी आर्थिक मदत देण्यात आली. शासनाकडून योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन जि.प. सदस्य नैताम यांनी दिले. तप्त उन्हाळा असल्याने जिल्ह्याच्या विविध भागात आगीच्या घटना सध्या घडत आहेत.