शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

कोरडा दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:40 IST

गडचिरोली जिल्ह्यातील शेकडाे हेक्टरवरील शेती कोरडवाहू आहे. पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते. शेतकरी फक्त खरीप हंगामातील धान पिकावर अवलंबून ...

गडचिरोली जिल्ह्यातील शेकडाे हेक्टरवरील शेती कोरडवाहू आहे. पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते. शेतकरी फक्त खरीप हंगामातील धान पिकावर अवलंबून आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्के सरासरी पाऊस पडल्याने धान रोवणीची कामेसुद्धा झालेली नाहीत. ऑगस्ट महिना संपत असतानाही पाऊस येत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. तसेच काही शेतकऱ्यांची धान रोवणी झालेली आहे; परंतु पावसाअभावी ते पीकसुद्धा करपत आहे. मुरमाडी व अमिर्झा परिसरातील शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने दाेन हंगामातील पिके घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीचा खर्चसुद्धा निघणे कठीण झाले आहे. या वर्षी नापिकीची शक्यता असल्याने या परिस्थितीत शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने गडचिरोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मुरमाडीचे सरपंच भोगेश्वर कोडापे, उपसरपंच यशवंत डोईजड, काशिनाथ डोईजड, सचिन भुसारी, फिरोज कोहपरे, गणेश डहलकर, अशोक भुसारी यांनी केली आहे.

बाॅक्स

मुरमाडी-खुर्सा परिसर काेरडाच

गडचिराेली तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये तुरळक पाऊस आला. सुरुवातीला बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषिपंप, डिझेल इंजीनद्वारे पाणी देऊन राेवणी आटाेपली. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची साेय नव्हती ते शेतकरी जाेरदार पावसाची प्रतीक्षा करीत हाेते. ऑगस्ट महिना संपत असतानाही जाेरदार पाऊस न झाल्याने मुरमाडी, गिलगाव व खुर्सा भागातील शेती काेरडीच दिसून येते.