शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

पर्यावरणाचे रक्षण करणे आज काळाची गरज

By admin | Updated: June 16, 2016 01:38 IST

पर्यावरण शुध्द राखले नाही तर जीवसृष्टी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे होणारा ऱ्हास लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे,

मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश : वृक्ष लागवडीचे आवाहनचंद्रपूर : पर्यावरण शुध्द राखले नाही तर जीवसृष्टी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे होणारा ऱ्हास लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे, कारण पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय सिकची यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व चंद्रपूर वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय सिकची होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.एस. इंगळे, वन प्रशासन विकास व्यवस्थापक अशोक कवीटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.संजय ठाकरे म्हणाले, इंधन, पेट्रोल, डिझल, कोळसा यांच्या वापरामुळे कॉर्बनडाय आक्साईड मोठ्या प्रमाणात सोडले जाते. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा हा भारतात चवथ्या क्रमांकावर प्रदूषित जिल्हा म्हणून गणला गेला आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी एकत्रित होवून लढा देण्याची गज आहे. सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पी.एस. इंगळे म्हणाले, जंगलातील झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. तापमान वाढीमुळे समुद्राजवळील शहरे समुद्राच्या पाण्याखाली येण्याचा धोका वाढलेला आहे. त्यामुळे जंगलाचे संगोपण करण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन संचालक अशोक कविटकर, वकील संघाचे अध्यक्ष पी.एस. सपाटे यांनीही वन विभागाशी संबंधित कायद्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश-१, गिरीश अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश ४ एन.आर. नाईकवाडे, नागपूरे, विभागीय वन अधिकारी वाघाडे, आदी मंचावर उपस्थित होते. वन अधिकारी तलमले यांनी प्रास्ताविक केले. संचालन वनपाल गजपुरे तर आभार अ‍ॅड. महेंद्र असरेट यांनी मानले. यशस्वीतेसाठी तलमले, हिवरे, टी.एम. फुल्लुके, एम.एम. जनबंधु, एल. एम. उपरे यांनी परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)