शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचे रक्षण करणे आज काळाची गरज

By admin | Updated: June 16, 2016 01:38 IST

पर्यावरण शुध्द राखले नाही तर जीवसृष्टी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे होणारा ऱ्हास लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे,

मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश : वृक्ष लागवडीचे आवाहनचंद्रपूर : पर्यावरण शुध्द राखले नाही तर जीवसृष्टी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे होणारा ऱ्हास लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे, कारण पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय सिकची यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व चंद्रपूर वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय सिकची होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.एस. इंगळे, वन प्रशासन विकास व्यवस्थापक अशोक कवीटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.संजय ठाकरे म्हणाले, इंधन, पेट्रोल, डिझल, कोळसा यांच्या वापरामुळे कॉर्बनडाय आक्साईड मोठ्या प्रमाणात सोडले जाते. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा हा भारतात चवथ्या क्रमांकावर प्रदूषित जिल्हा म्हणून गणला गेला आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी एकत्रित होवून लढा देण्याची गज आहे. सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पी.एस. इंगळे म्हणाले, जंगलातील झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. तापमान वाढीमुळे समुद्राजवळील शहरे समुद्राच्या पाण्याखाली येण्याचा धोका वाढलेला आहे. त्यामुळे जंगलाचे संगोपण करण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन संचालक अशोक कविटकर, वकील संघाचे अध्यक्ष पी.एस. सपाटे यांनीही वन विभागाशी संबंधित कायद्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश-१, गिरीश अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश ४ एन.आर. नाईकवाडे, नागपूरे, विभागीय वन अधिकारी वाघाडे, आदी मंचावर उपस्थित होते. वन अधिकारी तलमले यांनी प्रास्ताविक केले. संचालन वनपाल गजपुरे तर आभार अ‍ॅड. महेंद्र असरेट यांनी मानले. यशस्वीतेसाठी तलमले, हिवरे, टी.एम. फुल्लुके, एम.एम. जनबंधु, एल. एम. उपरे यांनी परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)