शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शासकीय कृषी महाविद्यालयात वाढीव तुकडीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 01:21 IST

डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या शासकीय कृषी महाविद्यालयात सर्व खुल्या प्रवर्गासाठी वाढीव तुकडी देण्याचा प्रस्ताव अकोला येथे झालेल्या विद्यापीठाच्या पहिल्याच कार्यकारी परिषदेमध्ये ठेवण्यात आला.

ठळक मुद्देस्रेहा हरडे यांची माहिती : नवीन इमारतीत स्थानांतरण होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या शासकीय कृषी महाविद्यालयात सर्व खुल्या प्रवर्गासाठी वाढीव तुकडी देण्याचा प्रस्ताव अकोला येथे झालेल्या विद्यापीठाच्या पहिल्याच कार्यकारी परिषदेमध्ये ठेवण्यात आला. कृषी विद्यापीठाच्या नवनियुक्त कार्यकारी परिषद सदस्य स्नेहा अरुण हरडे यांनी हा प्रस्ताव ठेवताना लवकरच कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीत स्थानांतरण होणार असल्याची माहिती दिली.विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेची बैठक कुलगुरू डॉ.विलास भाले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कुलसचिव डॉ.प्रकाश कडू, परिषद सदस्य आ.रणधिर सावरकर, जैनुद्दीन जव्हेरी, विनायक सरनाईक, गणेश कंडारकर, कृषी वैज्ञानिक डॉ.पी.बी. मायी आदी उपस्थित होते.यावेळी कार्यकारी परिषद सदस्य स्नेहा हरडे यांनी गडचिरोली जिल्ह्यासह पूर्व विदर्भ भागातील शेतकरी, शेतमजूर तसेच कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी व विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडली. गडचिरोली येथे शासनाने काही वर्षापूर्वी आदिवासी विकास विभागाच्या आर्थिक तरतुदीतून हे शासकीय कृषी महाविद्यालय निर्माण केले. सदर महाविद्यालयामध्ये आदिवासी विकास विभागाच्या करारानुसार ८० टक्के अनुसूचित जमातीतील तर २० टक्के इतर संवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या तांत्रिक गुणवत्तेतून उत्पादकता व आर्थिक सुलभता निर्माण करणारी शेती करणे, अधिक विद्यार्थ्यांना कृषी पदवी शिक्षणाची सोय करु न देणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सत्र २०१९ पासून नवीन तुकडी वाढवून शिक्षणाची संधी निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.जिल्हा नक्षलप्रभावित, आदिवासीबहूल व उद्योगविरहित असल्याने नेहा हरडे यांनी मांडलेल्या प्रश्नांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर कोट्यवधी रु पये खर्च करून कृषी महाविद्यालयाची इमारत गेल्या अनेक वर्षापासून उपयोगाविना पडून आहे. शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे विद्यार्थी सुविधायुक्त नवीन इमारतीत शिक्षण घेण्यापासून वंचित आहे.हा मुद्दा हरडे यांनी मांडल्यानंतर कुलगुरू डॉ.विलास भाले यांनी कार्यकारी परिषदेच्या सहमतीने हे प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. त्यामुळे येणाºया काळात नवीन वाढीव तुकडी व महाविद्यालय नवीन इमारतीत स्थानांतरण करण्याची आशा बळावली आहे.

टॅग्स :agricultureशेती