शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

नवीन ग्रामपंचायत निर्मितीचे प्रस्ताव रखडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:51 IST

तालुक्यातील सिर्सी, वडधा, नरचुली व पळसगाव या चार ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ आकाराने मोठे असून अनेक गावे या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. ग्रा.पं.चा कारभार सांभाळणे सोयीचे व्हावे व नागरिकांनाही सुलभ व्हावे, यासाठी या चार ग्रामपंचायतीचे विभाजन करून नव्याने सहा ग्रामपंचायती निर्माण करण्यात यावे,

ठळक मुद्देविकासावर परिणाम : जि.प.ने नव्याने मागितले विभाजनाचे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील सिर्सी, वडधा, नरचुली व पळसगाव या चार ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ आकाराने मोठे असून अनेक गावे या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. ग्रा.पं.चा कारभार सांभाळणे सोयीचे व्हावे व नागरिकांनाही सुलभ व्हावे, यासाठी या चार ग्रामपंचायतीचे विभाजन करून नव्याने सहा ग्रामपंचायती निर्माण करण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून ग्रा.पं. व पं.स. स्तरावरून जिल्हा प्रशासन व शासनाकडे पाठविला जात आहे. मात्र नवीन ग्रा.पं. निर्मितीचा निर्णय रखडलेला आहे. ग्रा.पं. विभाजनाच्या प्रस्तावाबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही.आरमोरी तालुक्यात एकूण ३३ ग्रामपंचायती असून अनेक गावे मिळून बनलेल्या गट ग्रामपंचायती आहेत. एक हजार लोकसंख्ये मागे एक ग्रामपंचायत असावी, असा शासनाचा निकष आहे. वडधा ग्रामपंचायती अंतर्गत डार्ली, वडधा, देशपूर, कुरंजा, देवीपूर, टेंभाचक, चिचोली आदी गावे येतात. या ग्रामपंचायतीचा विस्तार मोठा असल्याने वडधा ग्रामपंचायतीचे विभाजन करून डार्ली व देशपूर या दोन ग्रामपंचायती नव्याने निर्माण करण्यात याव्या, असा ठरावही वडधा ग्रामपंचायतीने घेतला आहे. डार्ली व टेंभाचक ही दोन गावे मिळून १ हजार २११ लोकसंख्या आहे. तर देवीपूर, कुरंजा, देशपूर या तीन गावांची लोकसंख्या १ हजार २६ एवढी आहे. त्यामुळे डार्ली व देशपूर या दोन्ही नव्या ग्रामपंचायती लोकसंख्येच्या निकषात बसणार आहे.सिर्सी ग्रामपंचायती अंतर्गत विहिरगाव, सिर्सी, मोहटोला, नरोटी चक, नरोटी माल, गणेशपूर १, गणेशपूर २, कुकडी आदी गावे येतात. सिर्सी ग्रा.पं.चे विभाजन करून विहीरगाव व नरोटी चक या दोन ग्रामपंचायतीने नव्याने निर्माण करण्याचा ठराव जि.प.कडे पाठविण्यात आला आहे. विहीरगाव व मोहटोला ही दोन गावे मिळून विहीरगाव ही नवी ग्रामपंचायत निर्माण होऊ शकते. दोन्ही गावाची मिळून एकूण लोकसंख्या १ हजार २०१ आहे. नरोटी चक व नरोटी माल ही दोन गावे मिळून नरोटी चक ही दुसरी ग्रामपंचायत निर्माण करण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला असून या दोन गावाची लोकसंख्या १ हजार १४ एवढी आहे. नरचुली ग्रामपंचायत अंतर्गत अनेक लहान-मोठ्या गावांचा समावेश आहे. नरचुली ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ २० ते २५ किमीचे आहे. लहान-मोठ्या कामासाठी नागरिकांना स्वतंत्र ग्रामपंचायतीअभावी पायपीट करावी लागते. त्यामुळे नरचुली ग्रामपंचायतीचे विभाजन करून जांभळी ही नवी ग्रामपंचायत निर्माण करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. जांभळी व दवंडी या दोन गावाची लोकसंख्या ३ हजार १४१ आहे. त्यामुळे ही दोन्ही गावे मिळून जांभळी ग्रामपंचायत निर्मितीचा प्रस्ताव ग्रा.पं. व पं.स.स्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. पळसगाव ग्रामपंचायतीचे विभाजन करून पाथरगोटा ही स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीचा प्रस्ताव आहे.दाखल केलेल्या नव्या ग्रा.पं. निर्मितीच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही झाली नाही. मात्र जि.प.ने यावर्षी पुन्हा ग्रामपंचायत विभाजनाचे प्रस्ताव मागितले आहे. यावेळी सुध्दा प्रशासन काय कार्यवाही करते की नेहमीप्रमाणे प्रलंबित ठेवले जाते,याकडे लक्ष आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत