शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

नवीन ग्रामपंचायत निर्मितीचे प्रस्ताव रखडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:51 IST

तालुक्यातील सिर्सी, वडधा, नरचुली व पळसगाव या चार ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ आकाराने मोठे असून अनेक गावे या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. ग्रा.पं.चा कारभार सांभाळणे सोयीचे व्हावे व नागरिकांनाही सुलभ व्हावे, यासाठी या चार ग्रामपंचायतीचे विभाजन करून नव्याने सहा ग्रामपंचायती निर्माण करण्यात यावे,

ठळक मुद्देविकासावर परिणाम : जि.प.ने नव्याने मागितले विभाजनाचे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील सिर्सी, वडधा, नरचुली व पळसगाव या चार ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ आकाराने मोठे असून अनेक गावे या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. ग्रा.पं.चा कारभार सांभाळणे सोयीचे व्हावे व नागरिकांनाही सुलभ व्हावे, यासाठी या चार ग्रामपंचायतीचे विभाजन करून नव्याने सहा ग्रामपंचायती निर्माण करण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून ग्रा.पं. व पं.स. स्तरावरून जिल्हा प्रशासन व शासनाकडे पाठविला जात आहे. मात्र नवीन ग्रा.पं. निर्मितीचा निर्णय रखडलेला आहे. ग्रा.पं. विभाजनाच्या प्रस्तावाबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही.आरमोरी तालुक्यात एकूण ३३ ग्रामपंचायती असून अनेक गावे मिळून बनलेल्या गट ग्रामपंचायती आहेत. एक हजार लोकसंख्ये मागे एक ग्रामपंचायत असावी, असा शासनाचा निकष आहे. वडधा ग्रामपंचायती अंतर्गत डार्ली, वडधा, देशपूर, कुरंजा, देवीपूर, टेंभाचक, चिचोली आदी गावे येतात. या ग्रामपंचायतीचा विस्तार मोठा असल्याने वडधा ग्रामपंचायतीचे विभाजन करून डार्ली व देशपूर या दोन ग्रामपंचायती नव्याने निर्माण करण्यात याव्या, असा ठरावही वडधा ग्रामपंचायतीने घेतला आहे. डार्ली व टेंभाचक ही दोन गावे मिळून १ हजार २११ लोकसंख्या आहे. तर देवीपूर, कुरंजा, देशपूर या तीन गावांची लोकसंख्या १ हजार २६ एवढी आहे. त्यामुळे डार्ली व देशपूर या दोन्ही नव्या ग्रामपंचायती लोकसंख्येच्या निकषात बसणार आहे.सिर्सी ग्रामपंचायती अंतर्गत विहिरगाव, सिर्सी, मोहटोला, नरोटी चक, नरोटी माल, गणेशपूर १, गणेशपूर २, कुकडी आदी गावे येतात. सिर्सी ग्रा.पं.चे विभाजन करून विहीरगाव व नरोटी चक या दोन ग्रामपंचायतीने नव्याने निर्माण करण्याचा ठराव जि.प.कडे पाठविण्यात आला आहे. विहीरगाव व मोहटोला ही दोन गावे मिळून विहीरगाव ही नवी ग्रामपंचायत निर्माण होऊ शकते. दोन्ही गावाची मिळून एकूण लोकसंख्या १ हजार २०१ आहे. नरोटी चक व नरोटी माल ही दोन गावे मिळून नरोटी चक ही दुसरी ग्रामपंचायत निर्माण करण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला असून या दोन गावाची लोकसंख्या १ हजार १४ एवढी आहे. नरचुली ग्रामपंचायत अंतर्गत अनेक लहान-मोठ्या गावांचा समावेश आहे. नरचुली ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ २० ते २५ किमीचे आहे. लहान-मोठ्या कामासाठी नागरिकांना स्वतंत्र ग्रामपंचायतीअभावी पायपीट करावी लागते. त्यामुळे नरचुली ग्रामपंचायतीचे विभाजन करून जांभळी ही नवी ग्रामपंचायत निर्माण करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. जांभळी व दवंडी या दोन गावाची लोकसंख्या ३ हजार १४१ आहे. त्यामुळे ही दोन्ही गावे मिळून जांभळी ग्रामपंचायत निर्मितीचा प्रस्ताव ग्रा.पं. व पं.स.स्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. पळसगाव ग्रामपंचायतीचे विभाजन करून पाथरगोटा ही स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीचा प्रस्ताव आहे.दाखल केलेल्या नव्या ग्रा.पं. निर्मितीच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही झाली नाही. मात्र जि.प.ने यावर्षी पुन्हा ग्रामपंचायत विभाजनाचे प्रस्ताव मागितले आहे. यावेळी सुध्दा प्रशासन काय कार्यवाही करते की नेहमीप्रमाणे प्रलंबित ठेवले जाते,याकडे लक्ष आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत