शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
2
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
5
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
6
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
7
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
8
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
9
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
10
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
11
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
12
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
13
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
14
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
15
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
16
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
17
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
18
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
19
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
20
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

नक्षली जाळपोळीत मालमत्ता जळून ७ कोटी १६ लाखांचे नुकसान

By admin | Updated: October 1, 2015 01:37 IST

हिंसक कारवायासोबतच माओवादी जिल्ह्यात दहशत निर्माण करण्यासाठी जाळपोळीच्या घटना घडवून आणतात.

माओवाद्यांचा उद्रेक : साडेचार वर्षात जिल्ह्यात ५६ घटनागडचिरोली : हिंसक कारवायासोबतच माओवादी जिल्ह्यात दहशत निर्माण करण्यासाठी जाळपोळीच्या घटना घडवून आणतात. २०११ पासून तर २०१५ च्या ३१ आॅगस्टपर्यंत साडेचार वर्षांच्या कालावधीत नक्षलवाद्यांनी जाळपोळीच्या ५६ घटना घडवून आणल्या. यामुळे १ कोटी ३८ लाख १३ हजार ९२५ रूपयांच्या शासकीय मालमत्तेचे व ५ कोटी ७७ लाख ९४ हजार ९०० रूपयांचे खासगी मालमत्तेचे असे एकूण ७ कोटी १६ लाख ८ हजार ८२५ रूपयांचे नुकसान झाले. शासन व प्रशासनावर दबाव वाढविण्यासाठी माओवादी संघटनेच्या वतीने शहीद सप्ताह पाळण्यात येतो. या सप्ताहादरम्यान जिल्ह्याच्या अनेक भागात नक्षलवादी हिसंक कारवाया करतात. शिवाय ग्राम पंचायत इमारत, वन विभाग कार्यालयाच्या इमारती, बीएसएनएलचे टॉवर तसेच इतर शासकीय इमारतीची जाळपोळ करतात. तसेच निर्माणाधीन बांधकामावरील ट्रॅक्टर, ट्रेलर, जेसीबी व इतर साहित्यांची जाळपोळ करतात. या जाळपोळीत लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक होते. जाळपोळीच्या घटनांमुळे अतिदुर्गम भागात रस्ते व इतर विकास कामे करण्यासाठी कंत्राटदार धजावत नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास कामे रखडून पडली आहेत. अहेरी तालुक्यातील पेरमिली वनपरिक्षेत्र कार्यालय व धानोरा तालुक्यातील दुर्गापूर ग्राम पंचायत कार्यालयाचे दस्तावेज व फर्निचर नक्षलवाद्यांनी ९ सप्टेंबर २०१५ रोजी बुधवारच्या मध्यरात्री जाळल्याची घटना घडली होती. यात साहित्य जळाल्याने वन विभाग व ग्रा. पं. चे नुकसान झाले. (जिल्हा प्रतिनिधी)