शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

दाखल्यांचे काम प्रगतीपथावर

By admin | Updated: June 7, 2014 23:57 IST

संग्राम केंद्राच्यावतीने सामान्य नागरिकांच्या उपयोगी पडणारे दाखले बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून ६ जूनपर्यंत सुमारे १ लाख ४३ हजार ४५८ जन्माचे दाखले, ५६ हजार ६९३ मृत्यूचे दाखले

संग्राम केंद्र : १ लाख ४३ हजार ४५८ जन्माचे दाखलेगडचिरोली : संग्राम केंद्राच्यावतीने सामान्य नागरिकांच्या उपयोगी पडणारे दाखले बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून ६ जूनपर्यंत सुमारे १ लाख ४३ हजार ४५८ जन्माचे दाखले, ५६ हजार ६९३ मृत्यूचे दाखले यांच्यासह इतरही १९ प्रकारचे दाखले बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून येत्या १ महिन्यात संपूर्ण दाखले बनविण्यात येणार आहे. हे सर्व दाखले ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचा ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारण्याचा त्रास वाचणार आहे. देशातील संपूर्ण ग्रामपंचायतींची माहिती एका क्लिकवर केंद्र व राज्य शासनाला मिळावी यासाठी देशातील संपूर्ण ग्रामपंचायतीचा कारभार ऑनलाईन करण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींना संगणक परिचालक, संगणक, प्रिंटर, स्कॅनर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑनलाईन करण्याच्या कामाला दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही बहुतांश ग्रामपंचायतींचे काम ऑनलाईन झाले नव्हते. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाला योजनांची अंमलबजावणी करतांना फार मोठी अडचण निर्माण होत होती. दोन वर्षाचा विलंब अक्षम्य असल्याचे सांगून केंद्र शासनाने राज्य शासनाचे  कान टोचले. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार ऑनलाईन करण्याच्या कामाला वेग आला आहे. ज्या नागरिकांनी जन्माची नोंद ग्रामपंचायतमध्ये केली आहे, अशा सर्व नागरिकांचे दाखले बनविण्याचे काम सुरू झाले आहे. ६ जूनपर्यंत जिल्हाभरातील सुमारे १ लाख ४३ हजार ४५८ नागरिकांच्या जन्माचे दाखले बनविण्यात आले आहेत. यामध्ये अहेरी तालुक्यात १५ हजार ८८७, आरमोरी २३ हजार ९८७, भामरागड ४ हजार १0९, चामोर्शी १७ हजार ३७९, देसाईगंज २३ हजार ९४0, धानोरा १३ हजार २७७, एटापल्ली ८ हजार ७१६, गडचिरोली १0 हजार ३५२, कोरची ७ हजार १४६, कुरखेडा ८ हजार ७७२, मुलचेरा ६ हजार ६६२, सिरोंचा ३ हजार २३१ दाखले बनविण्यात आले आहेत. त्याचबरोबर ५६ हजार ६९३ मृत्यूचे दाखले, नमुना आठ ‘अ’ १ लाख ८0 हजार ९९, नमुना ‘१९’ ४ हजार ६0४, नमुना ‘९’ ५ हजार ८२२ व नमुना १६ चे ६४४ दाखले बनविण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना नेहमी उपयोगी पडणारे १९ प्रकारचे दाखले बनविण्याचे काम सुरू आहे. आजपर्यंत हे काम अत्यंत संथगतीने सुरू होते. मात्र राज्य शासनाने सदर दाखले तत्काळ बनविण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिल्याने सर्वच अधिकार्‍यांनी संगणक परिचालकांना तंबी देऊन तत्काळ दाखले बनविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दाखले बनविण्याचे काम अत्यंत जलदगतीने सुरू आहे. पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी त्यांच्या क्षेत्रांतर्गत येणार्‍या संगणक परिचालक व ग्रामसेवकांच्या सभा घेत आहेत. हे काम तत्काळ होण्यासाठी महाऑनलाईनचे कर्मचारीही रात्रंदिवस काम करीत आहेत. संग्राम केंद्रामध्ये सामान्य नागरिकांना अनेक सोयीसुविधा मिळणार असल्याने ग्रामीण भागाच्या विकासासाठी संग्राम केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे. याच संग्राम केंद्रात मिनी बँकही सुरू केल्या जाणार आहेत. या बँकेत राष्ट्रीयकृत बँकेच्या सर्व सोयी-सुविधा मिळणार आहेत. ग्रामीण नागरिकांना तालुकास्थळी जाण्याचा  त्रास वाचणार आहे. (नगर प्रतिनिधी)