शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

जिल्ह्यात गटशेतीला चालना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:34 IST

गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प शेतजमीन धारक शेतकरी ४५ टक्के आहेत. तसेच अल्पभूधारक ३० टक्के व मोठे शेतकरी २५ टक्के आहेत. ...

गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प शेतजमीन धारक शेतकरी ४५ टक्के आहेत. तसेच अल्पभूधारक ३० टक्के व मोठे शेतकरी २५ टक्के आहेत. गट शेतीमधून पीक पद्धती निवडणे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे व शेतमाल विक्री यासाठी फायदे आहेत. जिल्ह्यात १ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप, ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी होते. पारंपरिक शेतीमध्ये आजच्या विकेल ते पिकेल या योजनेनुसार आधुनिकतेची जोड देऊन नवनवे प्रयोग सुरू करावेत. नावीन्यपूर्ण पीक पद्धती निवडून शेती व्यवसायाला चालना देता येईल यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

खरीप बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, खासदार अशोक नेते, आमदार अभिजीत वंजारी, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत खासदार अशोक नेते व आमदारांनी आपापले विषय व समस्या मांडल्या. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी खरीप हंगामाबाबत माहिती दिली. कृषी अधीक्षक गडचिरोली भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी नियोजनाबाबत व जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबत सादरीकरण केले.

शेतीमध्ये प्रयाेग करा

जिल्ह्यात सध्या भात, कापूस, तूर, हरभरा, जवस व मका या पिकांना प्राधान्य आहे. यामध्ये काही ठिकाणी स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट, नागली, तेलबिया पीक असे नवनवे प्रयोग सुरू केले आहेत. त्यामध्ये वाढ करावी. औषधी वनस्पतीची लागवड वाढवावी. चांगल्या दर्जाची बियाणे वापरून व रासायनिक खतांचा कमी वापर करून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेता येते, यासाठी नियोजन करावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभागाने सुचविल्याप्रमाणे नदीकाठच्या शेतकऱ्यांना इंजिन, मोटर तसेच तुषार सिंचन यासाठी योजना आखावी असे निर्देश दिले.