शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

जिल्ह्यात गटशेतीला चालना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:34 IST

गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प शेतजमीन धारक शेतकरी ४५ टक्के आहेत. तसेच अल्पभूधारक ३० टक्के व मोठे शेतकरी २५ टक्के आहेत. ...

गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प शेतजमीन धारक शेतकरी ४५ टक्के आहेत. तसेच अल्पभूधारक ३० टक्के व मोठे शेतकरी २५ टक्के आहेत. गट शेतीमधून पीक पद्धती निवडणे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे व शेतमाल विक्री यासाठी फायदे आहेत. जिल्ह्यात १ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप, ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी होते. पारंपरिक शेतीमध्ये आजच्या विकेल ते पिकेल या योजनेनुसार आधुनिकतेची जोड देऊन नवनवे प्रयोग सुरू करावेत. नावीन्यपूर्ण पीक पद्धती निवडून शेती व्यवसायाला चालना देता येईल यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

खरीप बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, खासदार अशोक नेते, आमदार अभिजीत वंजारी, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत खासदार अशोक नेते व आमदारांनी आपापले विषय व समस्या मांडल्या. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी खरीप हंगामाबाबत माहिती दिली. कृषी अधीक्षक गडचिरोली भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी नियोजनाबाबत व जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबत सादरीकरण केले.

शेतीमध्ये प्रयाेग करा

जिल्ह्यात सध्या भात, कापूस, तूर, हरभरा, जवस व मका या पिकांना प्राधान्य आहे. यामध्ये काही ठिकाणी स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट, नागली, तेलबिया पीक असे नवनवे प्रयोग सुरू केले आहेत. त्यामध्ये वाढ करावी. औषधी वनस्पतीची लागवड वाढवावी. चांगल्या दर्जाची बियाणे वापरून व रासायनिक खतांचा कमी वापर करून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेता येते, यासाठी नियोजन करावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभागाने सुचविल्याप्रमाणे नदीकाठच्या शेतकऱ्यांना इंजिन, मोटर तसेच तुषार सिंचन यासाठी योजना आखावी असे निर्देश दिले.