शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बसफेऱ्या वाढल्यास एसटीला नफा

By admin | Updated: May 30, 2017 00:45 IST

तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्लीपर्यंत दरदिवशी सुमारे २० बसफेऱ्या सुरू केल्या आहेत.

पुलानंतर दळणवळण वाढले : तेलंगणा राज्य परिवहन मंडळ उचलत आहे फायदाप्रतीक मुधोळकर । लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्लीपर्यंत दरदिवशी सुमारे २० बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र महाराष्ट्र शासनाचा एसटी विभाग आवश्यकतेनुसार तेवढ्या बसफेऱ्या सोडण्यास उदासीन असल्याचे दिसून येत आहे. सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर पूल झाल्यापासून तेलंगणा व सिरोंचा तालुक्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सिरोंचालगत कालेश्वर देवस्थान आहे. या देवस्थानाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भाविक जातात. त्यानुसार महाराष्ट्राच्या एसटी विभागाकडून कालेश्वरपर्यंत एक बस सोडण्यात येते. गडचिरोलीवरून सिरोंचा मार्गे एक बस तेलंगणा राज्यात जाते. तर अहेरी आगारातून बस चंद्रपूर मार्गे तेलंगणा राज्यात जाते. पूल झाल्याबरोबर दोन्ही राज्यांमध्ये नागरिकांचे आर्थिक व सामाजिक व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक तेलंगणा राज्यात व तेलंगणातील नागरिक महाराष्ट्रामध्ये ये-जा करतात. याचा पुरेपूर फायदा तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाने उचलण्यास सुरूवात केली आहे. तेलंगणा राज्यातील हैदराबाद, करीमनगर, मंचेरिअल, भूपालपल्ली, चेन्नूर, कालेश्वर, महादेवपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये अहेरी उपविभागातील नागरिक नेहमीच ये-जा करतात. या शहरांमध्ये मोठी बाजारपेठ आहे व आरोग्य सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांचा ओढा तेलंगणा राज्याकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा उचलत तेलंगणा सरकारने सिरोंचा, आसरअल्लीपर्यंत दिवसातून सुमारे २० बसफेऱ्या सोडण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही बसफेऱ्या वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सिरोंचा तालुक्यातील नागरिकांकडून आहे. तेलंगणाच्या २० बसफेऱ्यागोदावरी नदीवर पूल झाल्याबरोबर वाढलेल्या आर्थिक व सामाजिक संबंधांचा फायदा तेलंगणा राज्याने उचलण्यास सुरूवात केली आहे. पुलाचे उद्घाटन झाल्याच्या अगदी काही दिवसातच तेलंगणा राज्याने बसफेरी सुरू केली. सद्य:स्थितीत दिवसाच्या २० बसफेऱ्या सिरोंचा तालुक्यात ये-जा करीत आहेत. त्या मानाने एसटीने बसफेऱ्या सुरू करण्याची गरज आहे.ेदुसऱ्या राज्यात २० किमी पेक्षा जास्त अंतरावर बससेवा सुरू करण्यासाठी मंत्रालयस्तरावरून परवानगी घ्यावी लागते. दोन्ही राज्यात करार होणे गरजेचे आहे. राज्याचे उपवाहतूक व्यवस्थापक हैदराबाद येथे जाणार आहेत. जुलै महिन्यापासून नागपूर-कालेश्वर, गडचिरोली-कालेश्वर बसफेरी सुरू होणार आहे. अहेरी-वरंगल, चेन्नूर, हैदराबाद, करीमनगर शहरांपर्यंत बससेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. त्याला तांत्रिक परवानगी मिळायची आहे. सध्या रेगुंठा-कालेश्वर बसफेरी सुरू आहे.- निलेश बेलसरे, विभागीय वाहतूक अधिकारी गडचिरोली