शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

बसफेऱ्या वाढल्यास एसटीला नफा

By admin | Updated: May 30, 2017 00:45 IST

तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्लीपर्यंत दरदिवशी सुमारे २० बसफेऱ्या सुरू केल्या आहेत.

पुलानंतर दळणवळण वाढले : तेलंगणा राज्य परिवहन मंडळ उचलत आहे फायदाप्रतीक मुधोळकर । लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्लीपर्यंत दरदिवशी सुमारे २० बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र महाराष्ट्र शासनाचा एसटी विभाग आवश्यकतेनुसार तेवढ्या बसफेऱ्या सोडण्यास उदासीन असल्याचे दिसून येत आहे. सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर पूल झाल्यापासून तेलंगणा व सिरोंचा तालुक्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सिरोंचालगत कालेश्वर देवस्थान आहे. या देवस्थानाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भाविक जातात. त्यानुसार महाराष्ट्राच्या एसटी विभागाकडून कालेश्वरपर्यंत एक बस सोडण्यात येते. गडचिरोलीवरून सिरोंचा मार्गे एक बस तेलंगणा राज्यात जाते. तर अहेरी आगारातून बस चंद्रपूर मार्गे तेलंगणा राज्यात जाते. पूल झाल्याबरोबर दोन्ही राज्यांमध्ये नागरिकांचे आर्थिक व सामाजिक व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक तेलंगणा राज्यात व तेलंगणातील नागरिक महाराष्ट्रामध्ये ये-जा करतात. याचा पुरेपूर फायदा तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाने उचलण्यास सुरूवात केली आहे. तेलंगणा राज्यातील हैदराबाद, करीमनगर, मंचेरिअल, भूपालपल्ली, चेन्नूर, कालेश्वर, महादेवपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये अहेरी उपविभागातील नागरिक नेहमीच ये-जा करतात. या शहरांमध्ये मोठी बाजारपेठ आहे व आरोग्य सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांचा ओढा तेलंगणा राज्याकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा उचलत तेलंगणा सरकारने सिरोंचा, आसरअल्लीपर्यंत दिवसातून सुमारे २० बसफेऱ्या सोडण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही बसफेऱ्या वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सिरोंचा तालुक्यातील नागरिकांकडून आहे. तेलंगणाच्या २० बसफेऱ्यागोदावरी नदीवर पूल झाल्याबरोबर वाढलेल्या आर्थिक व सामाजिक संबंधांचा फायदा तेलंगणा राज्याने उचलण्यास सुरूवात केली आहे. पुलाचे उद्घाटन झाल्याच्या अगदी काही दिवसातच तेलंगणा राज्याने बसफेरी सुरू केली. सद्य:स्थितीत दिवसाच्या २० बसफेऱ्या सिरोंचा तालुक्यात ये-जा करीत आहेत. त्या मानाने एसटीने बसफेऱ्या सुरू करण्याची गरज आहे.ेदुसऱ्या राज्यात २० किमी पेक्षा जास्त अंतरावर बससेवा सुरू करण्यासाठी मंत्रालयस्तरावरून परवानगी घ्यावी लागते. दोन्ही राज्यात करार होणे गरजेचे आहे. राज्याचे उपवाहतूक व्यवस्थापक हैदराबाद येथे जाणार आहेत. जुलै महिन्यापासून नागपूर-कालेश्वर, गडचिरोली-कालेश्वर बसफेरी सुरू होणार आहे. अहेरी-वरंगल, चेन्नूर, हैदराबाद, करीमनगर शहरांपर्यंत बससेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. त्याला तांत्रिक परवानगी मिळायची आहे. सध्या रेगुंठा-कालेश्वर बसफेरी सुरू आहे.- निलेश बेलसरे, विभागीय वाहतूक अधिकारी गडचिरोली