शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
7
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
8
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
9
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
10
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
11
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
12
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
13
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
14
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
15
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
16
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
17
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
18
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
19
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
20
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

बसफेऱ्या वाढल्यास एसटीला नफा

By admin | Updated: May 30, 2017 00:45 IST

तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्लीपर्यंत दरदिवशी सुमारे २० बसफेऱ्या सुरू केल्या आहेत.

पुलानंतर दळणवळण वाढले : तेलंगणा राज्य परिवहन मंडळ उचलत आहे फायदाप्रतीक मुधोळकर । लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्लीपर्यंत दरदिवशी सुमारे २० बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र महाराष्ट्र शासनाचा एसटी विभाग आवश्यकतेनुसार तेवढ्या बसफेऱ्या सोडण्यास उदासीन असल्याचे दिसून येत आहे. सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर पूल झाल्यापासून तेलंगणा व सिरोंचा तालुक्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सिरोंचालगत कालेश्वर देवस्थान आहे. या देवस्थानाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भाविक जातात. त्यानुसार महाराष्ट्राच्या एसटी विभागाकडून कालेश्वरपर्यंत एक बस सोडण्यात येते. गडचिरोलीवरून सिरोंचा मार्गे एक बस तेलंगणा राज्यात जाते. तर अहेरी आगारातून बस चंद्रपूर मार्गे तेलंगणा राज्यात जाते. पूल झाल्याबरोबर दोन्ही राज्यांमध्ये नागरिकांचे आर्थिक व सामाजिक व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक तेलंगणा राज्यात व तेलंगणातील नागरिक महाराष्ट्रामध्ये ये-जा करतात. याचा पुरेपूर फायदा तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाने उचलण्यास सुरूवात केली आहे. तेलंगणा राज्यातील हैदराबाद, करीमनगर, मंचेरिअल, भूपालपल्ली, चेन्नूर, कालेश्वर, महादेवपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये अहेरी उपविभागातील नागरिक नेहमीच ये-जा करतात. या शहरांमध्ये मोठी बाजारपेठ आहे व आरोग्य सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांचा ओढा तेलंगणा राज्याकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा उचलत तेलंगणा सरकारने सिरोंचा, आसरअल्लीपर्यंत दिवसातून सुमारे २० बसफेऱ्या सोडण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही बसफेऱ्या वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सिरोंचा तालुक्यातील नागरिकांकडून आहे. तेलंगणाच्या २० बसफेऱ्यागोदावरी नदीवर पूल झाल्याबरोबर वाढलेल्या आर्थिक व सामाजिक संबंधांचा फायदा तेलंगणा राज्याने उचलण्यास सुरूवात केली आहे. पुलाचे उद्घाटन झाल्याच्या अगदी काही दिवसातच तेलंगणा राज्याने बसफेरी सुरू केली. सद्य:स्थितीत दिवसाच्या २० बसफेऱ्या सिरोंचा तालुक्यात ये-जा करीत आहेत. त्या मानाने एसटीने बसफेऱ्या सुरू करण्याची गरज आहे.ेदुसऱ्या राज्यात २० किमी पेक्षा जास्त अंतरावर बससेवा सुरू करण्यासाठी मंत्रालयस्तरावरून परवानगी घ्यावी लागते. दोन्ही राज्यात करार होणे गरजेचे आहे. राज्याचे उपवाहतूक व्यवस्थापक हैदराबाद येथे जाणार आहेत. जुलै महिन्यापासून नागपूर-कालेश्वर, गडचिरोली-कालेश्वर बसफेरी सुरू होणार आहे. अहेरी-वरंगल, चेन्नूर, हैदराबाद, करीमनगर शहरांपर्यंत बससेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. त्याला तांत्रिक परवानगी मिळायची आहे. सध्या रेगुंठा-कालेश्वर बसफेरी सुरू आहे.- निलेश बेलसरे, विभागीय वाहतूक अधिकारी गडचिरोली