शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

वृक्षतोडीची चौकशी संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:45 IST

आरमोरी-जोगीसाखरा रस्त्यालगत असलेल्या नहर व शेतातून अवैधपणे वृक्षांची तोड करण्यात आल्याचे प्रकरण नऊ दिवसांपूर्वी उघडकीस आले. मात्र या प्रकरणाची चौकशी अतिशय संथगतीने सुरू आहे. नऊ दिवसांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात वनविभागाला यश न आल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

ठळक मुद्देजोगीसाखरातील घटना : नऊ दिवस उलटूनही गुन्हा दाखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी-जोगीसाखरा रस्त्यालगत असलेल्या नहर व शेतातून अवैधपणे वृक्षांची तोड करण्यात आल्याचे प्रकरण नऊ दिवसांपूर्वी उघडकीस आले. मात्र या प्रकरणाची चौकशी अतिशय संथगतीने सुरू आहे. नऊ दिवसांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात वनविभागाला यश न आल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनीही नहरातील सागाची झाडे चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. एक झाड विनापरवानगीने तोडले म्हणून वनविभागाने ते झाड जप्त केले व पीआर फाडला. त्यानंतर संबंधित शेतकरी, ठेकेदार, दिवानजी यांचे बयान वनविभागाने नोंदविले. जी सागाची झाडे तोडली गेली, ती झाडे आपल्या मालकीची असल्याचे संबंधित शेतकºयाचे म्हणणे आहे तर दुसरीकडे इटियाडोह प्रकल्पाच्या अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार ती नहरातील झाडे आहेत. नेमकी ही झाडे कुणाच्या मालकीची आहेत, याचा तपास वनविभाग करीत आहे. याप्रकरणी वनविभाग व पोलीस संयुक्तरित्या चौकशी करणार असल्याची माहिती आहे.नऊ दिवसांचा कालावधी उलटूनही चौकशी पूर्ण करून गुन्हा दाखल केला नसल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जात आहे. वनविभागाचे अधिकारी संबंधितांना पाठीशी घालण्यासाठी चौकशीत विलंब करीत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.शिवसेनेचा इशारा धुडकावलाआरमोरी-जोगीसाखरा रस्त्यालगत असलेल्या नहरावरील व शेतातून आंबा, साग आदी झाडांची अवैधपणे तोड करण्यात आली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरीश मने यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी ११ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण चौकशी करून कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, पण प्रत्यक्षात १४ फेब्रुवारी उलटली तरी ना गुन्हा दाखल झाला, ना कोणते आंदोलन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला ऊत येत आहे.