शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

वृक्षतोडीची चौकशी संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:45 IST

आरमोरी-जोगीसाखरा रस्त्यालगत असलेल्या नहर व शेतातून अवैधपणे वृक्षांची तोड करण्यात आल्याचे प्रकरण नऊ दिवसांपूर्वी उघडकीस आले. मात्र या प्रकरणाची चौकशी अतिशय संथगतीने सुरू आहे. नऊ दिवसांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात वनविभागाला यश न आल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

ठळक मुद्देजोगीसाखरातील घटना : नऊ दिवस उलटूनही गुन्हा दाखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी-जोगीसाखरा रस्त्यालगत असलेल्या नहर व शेतातून अवैधपणे वृक्षांची तोड करण्यात आल्याचे प्रकरण नऊ दिवसांपूर्वी उघडकीस आले. मात्र या प्रकरणाची चौकशी अतिशय संथगतीने सुरू आहे. नऊ दिवसांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात वनविभागाला यश न आल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनीही नहरातील सागाची झाडे चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. एक झाड विनापरवानगीने तोडले म्हणून वनविभागाने ते झाड जप्त केले व पीआर फाडला. त्यानंतर संबंधित शेतकरी, ठेकेदार, दिवानजी यांचे बयान वनविभागाने नोंदविले. जी सागाची झाडे तोडली गेली, ती झाडे आपल्या मालकीची असल्याचे संबंधित शेतकºयाचे म्हणणे आहे तर दुसरीकडे इटियाडोह प्रकल्पाच्या अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार ती नहरातील झाडे आहेत. नेमकी ही झाडे कुणाच्या मालकीची आहेत, याचा तपास वनविभाग करीत आहे. याप्रकरणी वनविभाग व पोलीस संयुक्तरित्या चौकशी करणार असल्याची माहिती आहे.नऊ दिवसांचा कालावधी उलटूनही चौकशी पूर्ण करून गुन्हा दाखल केला नसल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जात आहे. वनविभागाचे अधिकारी संबंधितांना पाठीशी घालण्यासाठी चौकशीत विलंब करीत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.शिवसेनेचा इशारा धुडकावलाआरमोरी-जोगीसाखरा रस्त्यालगत असलेल्या नहरावरील व शेतातून आंबा, साग आदी झाडांची अवैधपणे तोड करण्यात आली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरीश मने यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी ११ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण चौकशी करून कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, पण प्रत्यक्षात १४ फेब्रुवारी उलटली तरी ना गुन्हा दाखल झाला, ना कोणते आंदोलन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला ऊत येत आहे.