शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

मोबाईल कव्हरेजची समस्या सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST

सिरोंचा तालुक्यात बीएसएनएलचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या कंपनीचे तालुक्यात सर्वाधिक ग्राहक आहेत. सिरोंचा, बामणी पोलीस स्टेशन, सिरोंचा बीएसएनएल कार्यालय, पेंटिपाका, आसरअल्ली येथे बीएसएनएलचे केबल टॉवर आहे. तर सिरोंचा जवळील अमरावती व वडदम येथे दोन वायरलेस टॉवर आहेत.

ठळक मुद्देवरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : अंकिसा परिसरातील बीएसएनएलचे ग्राहक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : मोबाईलचा वापर दैनंदिन जीवनासाठी अतिमहत्त्वाचा भाग बनला आहे. यातच मोबाईल क्रांतीने इंटरनेटवर विविध कामे करणे सोयीचे झाल्याने इंटरनेसुद्धा अत्यावश्यक झाले आहे. मात्र सिरोंचा तालुक्यात भ्रमणध्वनी कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहकांना मोबाईलवर संपर्क साधने व ऑनलाईन कामे करणे डोकेदुखी ठरत आहे. मात्र ही सेवा सुधारण्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची दुर्लक्ष आहे.सिरोंचा तालुक्यात बीएसएनएलचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या कंपनीचे तालुक्यात सर्वाधिक ग्राहक आहेत. सिरोंचा, बामणी पोलीस स्टेशन, सिरोंचा बीएसएनएल कार्यालय, पेंटिपाका, आसरअल्ली येथे बीएसएनएलचे केबल टॉवर आहे. तर सिरोंचा जवळील अमरावती व वडदम येथे दोन वायरलेस टॉवर आहेत.तालुक्यात एकूण सहा टॉवर आहेत. या माध्यमातून या माध्यमातून ग्राहकांना सशुल्क सेवा दिली जात आहे. शैक्षणिक तसेच शेतीविषयक बहुतांश कामे ऑनलाईन करावी लागतात. यासाठी इंटरनेटसेवा योग्य असणे तसेच वेगसुद्धा आवश्यक आहे. शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातून विविध प्रकारची दाखले प्राप्त करण्याकरिता सेतू केंद्रातूनच ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. यासाठीसुद्धा इंटरनेटसेवा तीव्र वेगाची व सुरळीत असणे आवश्यक आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून येथील कव्हरेज व इंटरनेटचा बोजवारा उडाला आहे.विद्यार्थी, शेतकरी व ग्राहकांना विविध कामे करण्यासाठी अडचणी येत आहेत. या संदर्भात अनेकदा बीएसएनएलच्या स्थानिक अधिकाऱ्यांना निवेदने देऊन कळविण्यात आले. मात्र त्यांच्यासह वरिष्ठ अधिकारी योग्य सेवा देण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी तालुक्यातील ग्राहक त्रस्त झाले आहेत.खासगी कंपन्यांना परवानगी द्यावीसिरोंचा तालुक्यात बीएसएनएलच्या नेटवर्कचे जाळे पसरले आहे. याचा वापर बहुतांश ग्राहक करीत आहेत. परंतु योग्य सेवा मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. वर्षभरापूर्वी तालुक्यात जिओ कंपनीच्या टॉवरची उभारणी करण्यात आली. परंतु वन विभाग व इतर शासकीय विभागाकडून परवानगी नाकारल्याने ऐनवेळी टॉवर सुरू झाले नाही. सध्या हे टॉवर शोभेची वस्तू ठरत आहे. तेलंगणा राज्याकडून कनेक्शन घेण्याचा प्रयत्नसुद्धा या कंपनीने केला होता. परंतु तेलंगणा सरकारनेसुद्धा याबाबतची परवानगी नाकारली. परिणामी ग्राहकांना खासगी कंपनीची सेवा मिळाली नाही. तालुक्यातील मोबाईल व इंटरनेट सेवेची झालेली दुरवस्था पाहता खासगी कंपन्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी राकाँचे तालुका सचिव रमेश चिंता यांनी केली आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल