शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल कव्हरेजची समस्या सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST

सिरोंचा तालुक्यात बीएसएनएलचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या कंपनीचे तालुक्यात सर्वाधिक ग्राहक आहेत. सिरोंचा, बामणी पोलीस स्टेशन, सिरोंचा बीएसएनएल कार्यालय, पेंटिपाका, आसरअल्ली येथे बीएसएनएलचे केबल टॉवर आहे. तर सिरोंचा जवळील अमरावती व वडदम येथे दोन वायरलेस टॉवर आहेत.

ठळक मुद्देवरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : अंकिसा परिसरातील बीएसएनएलचे ग्राहक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : मोबाईलचा वापर दैनंदिन जीवनासाठी अतिमहत्त्वाचा भाग बनला आहे. यातच मोबाईल क्रांतीने इंटरनेटवर विविध कामे करणे सोयीचे झाल्याने इंटरनेसुद्धा अत्यावश्यक झाले आहे. मात्र सिरोंचा तालुक्यात भ्रमणध्वनी कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहकांना मोबाईलवर संपर्क साधने व ऑनलाईन कामे करणे डोकेदुखी ठरत आहे. मात्र ही सेवा सुधारण्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची दुर्लक्ष आहे.सिरोंचा तालुक्यात बीएसएनएलचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या कंपनीचे तालुक्यात सर्वाधिक ग्राहक आहेत. सिरोंचा, बामणी पोलीस स्टेशन, सिरोंचा बीएसएनएल कार्यालय, पेंटिपाका, आसरअल्ली येथे बीएसएनएलचे केबल टॉवर आहे. तर सिरोंचा जवळील अमरावती व वडदम येथे दोन वायरलेस टॉवर आहेत.तालुक्यात एकूण सहा टॉवर आहेत. या माध्यमातून या माध्यमातून ग्राहकांना सशुल्क सेवा दिली जात आहे. शैक्षणिक तसेच शेतीविषयक बहुतांश कामे ऑनलाईन करावी लागतात. यासाठी इंटरनेटसेवा योग्य असणे तसेच वेगसुद्धा आवश्यक आहे. शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातून विविध प्रकारची दाखले प्राप्त करण्याकरिता सेतू केंद्रातूनच ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. यासाठीसुद्धा इंटरनेटसेवा तीव्र वेगाची व सुरळीत असणे आवश्यक आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून येथील कव्हरेज व इंटरनेटचा बोजवारा उडाला आहे.विद्यार्थी, शेतकरी व ग्राहकांना विविध कामे करण्यासाठी अडचणी येत आहेत. या संदर्भात अनेकदा बीएसएनएलच्या स्थानिक अधिकाऱ्यांना निवेदने देऊन कळविण्यात आले. मात्र त्यांच्यासह वरिष्ठ अधिकारी योग्य सेवा देण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी तालुक्यातील ग्राहक त्रस्त झाले आहेत.खासगी कंपन्यांना परवानगी द्यावीसिरोंचा तालुक्यात बीएसएनएलच्या नेटवर्कचे जाळे पसरले आहे. याचा वापर बहुतांश ग्राहक करीत आहेत. परंतु योग्य सेवा मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. वर्षभरापूर्वी तालुक्यात जिओ कंपनीच्या टॉवरची उभारणी करण्यात आली. परंतु वन विभाग व इतर शासकीय विभागाकडून परवानगी नाकारल्याने ऐनवेळी टॉवर सुरू झाले नाही. सध्या हे टॉवर शोभेची वस्तू ठरत आहे. तेलंगणा राज्याकडून कनेक्शन घेण्याचा प्रयत्नसुद्धा या कंपनीने केला होता. परंतु तेलंगणा सरकारनेसुद्धा याबाबतची परवानगी नाकारली. परिणामी ग्राहकांना खासगी कंपनीची सेवा मिळाली नाही. तालुक्यातील मोबाईल व इंटरनेट सेवेची झालेली दुरवस्था पाहता खासगी कंपन्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी राकाँचे तालुका सचिव रमेश चिंता यांनी केली आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल