शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

मोबाईल कव्हरेजची समस्या सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST

सिरोंचा तालुक्यात बीएसएनएलचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या कंपनीचे तालुक्यात सर्वाधिक ग्राहक आहेत. सिरोंचा, बामणी पोलीस स्टेशन, सिरोंचा बीएसएनएल कार्यालय, पेंटिपाका, आसरअल्ली येथे बीएसएनएलचे केबल टॉवर आहे. तर सिरोंचा जवळील अमरावती व वडदम येथे दोन वायरलेस टॉवर आहेत.

ठळक मुद्देवरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : अंकिसा परिसरातील बीएसएनएलचे ग्राहक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : मोबाईलचा वापर दैनंदिन जीवनासाठी अतिमहत्त्वाचा भाग बनला आहे. यातच मोबाईल क्रांतीने इंटरनेटवर विविध कामे करणे सोयीचे झाल्याने इंटरनेसुद्धा अत्यावश्यक झाले आहे. मात्र सिरोंचा तालुक्यात भ्रमणध्वनी कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहकांना मोबाईलवर संपर्क साधने व ऑनलाईन कामे करणे डोकेदुखी ठरत आहे. मात्र ही सेवा सुधारण्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची दुर्लक्ष आहे.सिरोंचा तालुक्यात बीएसएनएलचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या कंपनीचे तालुक्यात सर्वाधिक ग्राहक आहेत. सिरोंचा, बामणी पोलीस स्टेशन, सिरोंचा बीएसएनएल कार्यालय, पेंटिपाका, आसरअल्ली येथे बीएसएनएलचे केबल टॉवर आहे. तर सिरोंचा जवळील अमरावती व वडदम येथे दोन वायरलेस टॉवर आहेत.तालुक्यात एकूण सहा टॉवर आहेत. या माध्यमातून या माध्यमातून ग्राहकांना सशुल्क सेवा दिली जात आहे. शैक्षणिक तसेच शेतीविषयक बहुतांश कामे ऑनलाईन करावी लागतात. यासाठी इंटरनेटसेवा योग्य असणे तसेच वेगसुद्धा आवश्यक आहे. शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातून विविध प्रकारची दाखले प्राप्त करण्याकरिता सेतू केंद्रातूनच ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. यासाठीसुद्धा इंटरनेटसेवा तीव्र वेगाची व सुरळीत असणे आवश्यक आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून येथील कव्हरेज व इंटरनेटचा बोजवारा उडाला आहे.विद्यार्थी, शेतकरी व ग्राहकांना विविध कामे करण्यासाठी अडचणी येत आहेत. या संदर्भात अनेकदा बीएसएनएलच्या स्थानिक अधिकाऱ्यांना निवेदने देऊन कळविण्यात आले. मात्र त्यांच्यासह वरिष्ठ अधिकारी योग्य सेवा देण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी तालुक्यातील ग्राहक त्रस्त झाले आहेत.खासगी कंपन्यांना परवानगी द्यावीसिरोंचा तालुक्यात बीएसएनएलच्या नेटवर्कचे जाळे पसरले आहे. याचा वापर बहुतांश ग्राहक करीत आहेत. परंतु योग्य सेवा मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. वर्षभरापूर्वी तालुक्यात जिओ कंपनीच्या टॉवरची उभारणी करण्यात आली. परंतु वन विभाग व इतर शासकीय विभागाकडून परवानगी नाकारल्याने ऐनवेळी टॉवर सुरू झाले नाही. सध्या हे टॉवर शोभेची वस्तू ठरत आहे. तेलंगणा राज्याकडून कनेक्शन घेण्याचा प्रयत्नसुद्धा या कंपनीने केला होता. परंतु तेलंगणा सरकारनेसुद्धा याबाबतची परवानगी नाकारली. परिणामी ग्राहकांना खासगी कंपनीची सेवा मिळाली नाही. तालुक्यातील मोबाईल व इंटरनेट सेवेची झालेली दुरवस्था पाहता खासगी कंपन्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी राकाँचे तालुका सचिव रमेश चिंता यांनी केली आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल